शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

ग्रामीण भागातील प्रतिभा प्रकाशात आली

By admin | Updated: September 27, 2015 00:15 IST

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विद्यार्थिनींनी जिल्हा पातळीवर संपन्न झालेल्या विज्ञान प्रेरणा पुरस्कार ...

विज्ञान प्रेरणा पुरस्कार : सातेगाव, दहिगाव, विहिगाव, कापूसतळणीच्या मुलींची निवड अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विद्यार्थिनींनी जिल्हा पातळीवर संपन्न झालेल्या विज्ञान प्रेरणा पुरस्कार प्रदर्शनीत आपल्या प्रतिभाशक्तीचे प्रदर्शन केले. तालुक्यातील ५५ प्रतिकृतींपैकी चार प्रतिकृतींच्या निवड राज्यस्तरावर आयोजित प्रदर्शनासाठी करण्यात आली. या चारही प्रतिकृती विद्यार्थिर्नंनी तयार केल्या होत्या, हे विशेष. यावरून विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनी अभ्यासासोबतच प्रतिभाशक्तीतही अव्वल आहेत, हे दिसून आले. पंचफुलाबाई हरणे विद्यालयाची विद्यार्थिनी व सातेगाव येथील श्यामली अंकुश बोबडे, निर्मला विद्यालय कापूसतळणीची कल्याणी उमेश बोंडे, महात्मा फुले विद्यालय, विहिगावची महिमा राजेंद्र गवई आणि इंदिरा गांधी विद्यालय, दहिगाव रेचा येथील वृषाली रवींद्र गव्हाळे या विद्यार्थिनींनी आपल्या वैज्ञानिक प्रतिकृतीचे गुरुनानक अभियांत्रिकी महाविद्यालय, कळमेश्वर (नागपूर) येथे प्रदर्शन केले.पंचफुलाबाई हरणे विद्यालयाचे शिक्षक संजय शेळके यांनी श्यामली बोबडे या विद्यार्थिनीस मार्गदर्शन करून अपघातमुक्त रहदारीचा प्रकल्प तयार केला होता. निर्मला विद्यालय, कापूसतळणीचे शिक्षक एस.एम. रडके यांनी कल्याणी बोंडे या विद्यार्थिनीस मार्गदर्शन करून घरगुती एसी हा प्रकल्प तयार केला. महात्मा फुले विद्यालय, विहिगाव येथील शिक्षक अशोक मसने यांनी महिमा गवई हिला मार्गदर्शन करुन सौर बाबा गाडी हा प्रकल्प तयार केला. इंदिरा गांधी विद्यालय, दहिगाव रेचा येथील शिक्षक सूरज पटेल यांनी वृषाली गव्हाळे या विद्यार्थिनीस मार्गदर्शन करून वायूची गती मोजण्याचा प्रकल्प तयार केला होता. प्रदर्शन सहभागातून अनेक शाळा वंचितप्रत्येक शाळेला दरवर्षी जुलै महिन्यात या प्रदर्शनाच्या सहभागासाठी एक विशिष्ट रक्कम दिली जाते. काही शाळांना ही रक्कम प्राप्तच झाली नाही असाही एक आरोप झाला आहे. हा एक प्रशासकीय दिरंगाईचा भाग असला तरी ही रक्कम मागेपुढे कधीतरी भेटनेच आहे. मुद्दा प्रदर्शनातील सहभागाचा आहे व सहभाग शाळेच्या आणि संबंधीत शिक्षकांच्या सक्रियतेचा आहे. पदरमोड करुनही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना या संकल्पनेत सहभागी करुन घेऊ शकतात. शिकवणीच्या भरोश्यावर अतिरिक्त उत्पन्न मिळविणाऱ्या शिक्षकांनी या समस्येकडे लक्ष देऊन आपल्या शाळेचा सहभाग प्रदर्शनात केला असता तर विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा आनंद घेता आला असता. ३० पर्यंत आॅनलाईन नोंदणीतालुक्यातील अनेक शाळा या प्रदर्शनीत सहभागी होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांची वैज्ञानिक संकल्पना पाठ करुन त्याचा आनंद विद्यार्थ्यांना देण्याचीही बहुमोल संधी या शाळांनी गमावली आहे. सोबतच विद्यार्थ्यांचेही नुकसान केले. यावर्षी ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन नोेंदणी करून शाळा आपल्या विद्यार्थ्यांचे शोधप्रकल्प या योजनेत पाठवू शकतात.