शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ग्रामीण, दुर्गम भागात हातभट्ट्या पेटल्या

By admin | Updated: April 17, 2017 00:01 IST

हायवेपासून ५०० मीटरच्या अंतरावरील सर्वप्रकारची दारू दुकाने बंद करण्याच्या न्यायालयाच्या निकालामुळे शहरी व ग्रामीण भागात दारू मिळणे जिकरीचे झाले आहे.

मद्यपींनी लढविली क्लृप्ती : ‘५०० मीटर‘च्या निर्बंधाने ‘गावठी’ला पुन्हा सुगीचे दिवसअमरावती : हायवेपासून ५०० मीटरच्या अंतरावरील सर्वप्रकारची दारू दुकाने बंद करण्याच्या न्यायालयाच्या निकालामुळे शहरी व ग्रामीण भागात दारू मिळणे जिकरीचे झाले आहे. आता दारूसाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागत असल्याने अनेकांनी ‘थोडी थोडी पिया करो’ चा मार्ग अवलंबून गावठी दारूकडे मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागात पुन्हा हातभट्ट्या धगधगू लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार देशभरातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या पाचशे मीटर आत असलेली दारुची सर्व दुकाने बंद झाली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दुकानांना सील करून कागदोपत्री बंद केले आहे. अर्थात कायदेशीररित्या ही दुकाने बंद झाली असली तरी नियमबाह्य चोरीछुप्या मार्गाने दारूविक्री सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी चोरट्या मार्गाने दारूविक्री होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील दारू दुकाने बंद झाल्याने हातभट्ट्या पुन्हा पेटू लागल्या असून आदिवासी भागातील हातभट्ट्यांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. हातभट्ट्यांनी पेट घेतल्याने ‘गुळ व नवसागर’च्या मागणीत वाढ झाली आहे. मोहाच्या फुलांचाही भाव तेजीत आहे. शहरी व ग्रामीण भागातील महामार्गावरील दारूविक्रीची दुकाने न्यायालयाच्या निर्णयानुसार १ एप्रिलपासून बंद झाल्याने विदेशी दारू मिळणे कठीण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक गावपाड्यात हातभट्ट्यांवर तयार होणाऱ्या गावठी दारूला पुन्हा सुगीचे दिवस येणार असल्याचे चित्र आहे. मद्यपींनीच शोधला फंडाअमरावती : मद्यपींची दारूसाठी सुरू असलेली तगमग, शहरातील मोजक्या शिल्लक राहिलेल्या दारू दुकानांमधील मद्यपींची वाढती गर्दी, यातून उदभवणारे वादाचे प्रसंग लक्षात घेता मद्यपींनीच यावर ‘गावठी’चा तोडगा शोधला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तुलनेने कमी दरात उपलब्ध होणारी गावठी दारू पिण्यासाठी आता शहरातील मद्यपीनी देखील ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविल्यास आश्चर्य वाटू नये. (प्रतिनिधी)