शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

व्यापारांच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:34 IST

जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम विदर्भात ख्यातिप्राप्त असलेल्या अमरावती बाजार समितीमध्ये सन २०१९-२० करिता परवाना नूतनीकरण प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होत आहे. यावेळी प्रथमच बाजार समितीद्वारे नव्याने अटी-शर्ती टाकल्याने बनावट परवान्यांना आळा बसणार आहे. एक वर्षाच्या परवान्यावर दुकानदारी थाटून बाजार समितीला चुना लावणाºयांचा बंदोबस्त होणार आहे.

ठळक मुद्देबाजार समितीत बोगस परवाऱ्यांना चाप : नूतनीकरणात नव्याने अटी, शर्ती समाविष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम विदर्भात ख्यातिप्राप्त असलेल्या अमरावती बाजार समितीमध्ये सन २०१९-२० करिता परवाना नूतनीकरण प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होत आहे. यावेळी प्रथमच बाजार समितीद्वारे नव्याने अटी-शर्ती टाकल्याने बनावट परवान्यांना आळा बसणार आहे. एक वर्षाच्या परवान्यावर दुकानदारी थाटून बाजार समितीला चुना लावणाºयांचा बंदोबस्त होणार आहे.बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात नियमन केलेल्या शेती उत्पादनावर व्यवसाय करणारे परवानाधारक अडते, खरेदीदार, वखारवाले हमाल, मापारी व मदतनीस या सर्व घटकांना त्यांच्या परवाना नूतनीकरण करावा लागणार आहे. यावेली अडत्यांकरिता एक लाख, खरेदीदारासाठी दोन लाख सॉल्व्हंसी अथवा बँक गॅरंटी; ती त्रयस्त इसमाची असल्यास २०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर त्या व्यक्तीची हमी असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. विद्युत बिल वा रेशन कार्ड, महापालिकेचा रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड किंवा पारपत्र यापैकी एक रहिवासी पुरावा सादर करावा लागेल. ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, फोटो असलेले बँकेचे पासबूक, वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र यापैकी एक आवश्यक आहे. अर्जदाराकडील बाजार फी, सुपरव्हिजन फी भरलेली असणे आवश्यक आहे. गाळेधारकांचा १०० रुपयांचे स्टॅम्पपेपरवरील करारनामा आवश्यक आहे. त्रयस्थ व्यक्तीने हमी घेतली असल्यास त्या व्यक्तीला स्वत: हजर रहावे लागणार आहे. ज्या परवान्यावर व्यवहार झालेला नाही, त्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. शासन निर्णयानुसार आता शेतकरी मतदान अधिकारानुसार त्या परवानाधारकाकडे शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांच्या नावाची यादी अर्जासोबतच्या नमुन्यात भरावी लागणार आहे. याशिवाय अडत्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा वापरणे अनिवार्य असल्याने या वजनकाट्याशिवाय परवान्याचे नूतनीकरण होणार नसल्याचे बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी सांगितले.अडत्यांची परवान्यासाठी ई-नाम माहिती अनिवार्यअडत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करताना यावेळी प्रथमच ई-नामबाबत माहितीचा नमुना जोडावा लागणार आहे. मोबाइलवर ई-नाम अ‍ॅप आवश्यक आहे. ज्या शेतकºयांनी शेतमालाची विक्री केली, त्यांची विहित नमुन्यात माहिती सादर करावी लागणार आहे. त्याशिवाय परवान्याचे नूतनीकरणच होणार नाही. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा खरेदीची पावती आवश्यक आहे.तक्रार असल्यास खरेदीदारांचा परवाना वांध्यातखरेदीदारांना परवाना नूतनीकरण करतेवेळी ई-नाम योजनेचा अर्ज भरून द्यावा लागणार आहे. यामध्ये बँक खात्याचे तपशीलदेखील हवेत. गतवर्षी अडत्यांची पेमेंट वेळेवर केले नसल्याची तक्रार असल्यास किंवा मातेरा खरेदी-विक्री केल्याचे आढळल्यास परवाना नूतनीकरण होणार नसल्याचे बाजार समितीने बजावले. ज्यांच्याकडे दुकान आहे, त्यांना बाजार समितीकडे भाडे, महापालिका कर, विद्युत बिलाचा भरणा करणे बंधनकारक आहे.शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कुठलाही त्रास होणार नाही व बाजार समितीचा कारभार पारदर्शी राहावा, यासाठी काही अटी-शर्ती नव्याने टाकण्यात आल्यात.- नाना नागमोतेउपसभापती, बाजार समिती