शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारांच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:34 IST

जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम विदर्भात ख्यातिप्राप्त असलेल्या अमरावती बाजार समितीमध्ये सन २०१९-२० करिता परवाना नूतनीकरण प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होत आहे. यावेळी प्रथमच बाजार समितीद्वारे नव्याने अटी-शर्ती टाकल्याने बनावट परवान्यांना आळा बसणार आहे. एक वर्षाच्या परवान्यावर दुकानदारी थाटून बाजार समितीला चुना लावणाºयांचा बंदोबस्त होणार आहे.

ठळक मुद्देबाजार समितीत बोगस परवाऱ्यांना चाप : नूतनीकरणात नव्याने अटी, शर्ती समाविष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम विदर्भात ख्यातिप्राप्त असलेल्या अमरावती बाजार समितीमध्ये सन २०१९-२० करिता परवाना नूतनीकरण प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होत आहे. यावेळी प्रथमच बाजार समितीद्वारे नव्याने अटी-शर्ती टाकल्याने बनावट परवान्यांना आळा बसणार आहे. एक वर्षाच्या परवान्यावर दुकानदारी थाटून बाजार समितीला चुना लावणाºयांचा बंदोबस्त होणार आहे.बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात नियमन केलेल्या शेती उत्पादनावर व्यवसाय करणारे परवानाधारक अडते, खरेदीदार, वखारवाले हमाल, मापारी व मदतनीस या सर्व घटकांना त्यांच्या परवाना नूतनीकरण करावा लागणार आहे. यावेली अडत्यांकरिता एक लाख, खरेदीदारासाठी दोन लाख सॉल्व्हंसी अथवा बँक गॅरंटी; ती त्रयस्त इसमाची असल्यास २०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर त्या व्यक्तीची हमी असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. विद्युत बिल वा रेशन कार्ड, महापालिकेचा रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड किंवा पारपत्र यापैकी एक रहिवासी पुरावा सादर करावा लागेल. ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, फोटो असलेले बँकेचे पासबूक, वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र यापैकी एक आवश्यक आहे. अर्जदाराकडील बाजार फी, सुपरव्हिजन फी भरलेली असणे आवश्यक आहे. गाळेधारकांचा १०० रुपयांचे स्टॅम्पपेपरवरील करारनामा आवश्यक आहे. त्रयस्थ व्यक्तीने हमी घेतली असल्यास त्या व्यक्तीला स्वत: हजर रहावे लागणार आहे. ज्या परवान्यावर व्यवहार झालेला नाही, त्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. शासन निर्णयानुसार आता शेतकरी मतदान अधिकारानुसार त्या परवानाधारकाकडे शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांच्या नावाची यादी अर्जासोबतच्या नमुन्यात भरावी लागणार आहे. याशिवाय अडत्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा वापरणे अनिवार्य असल्याने या वजनकाट्याशिवाय परवान्याचे नूतनीकरण होणार नसल्याचे बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी सांगितले.अडत्यांची परवान्यासाठी ई-नाम माहिती अनिवार्यअडत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करताना यावेळी प्रथमच ई-नामबाबत माहितीचा नमुना जोडावा लागणार आहे. मोबाइलवर ई-नाम अ‍ॅप आवश्यक आहे. ज्या शेतकºयांनी शेतमालाची विक्री केली, त्यांची विहित नमुन्यात माहिती सादर करावी लागणार आहे. त्याशिवाय परवान्याचे नूतनीकरणच होणार नाही. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा खरेदीची पावती आवश्यक आहे.तक्रार असल्यास खरेदीदारांचा परवाना वांध्यातखरेदीदारांना परवाना नूतनीकरण करतेवेळी ई-नाम योजनेचा अर्ज भरून द्यावा लागणार आहे. यामध्ये बँक खात्याचे तपशीलदेखील हवेत. गतवर्षी अडत्यांची पेमेंट वेळेवर केले नसल्याची तक्रार असल्यास किंवा मातेरा खरेदी-विक्री केल्याचे आढळल्यास परवाना नूतनीकरण होणार नसल्याचे बाजार समितीने बजावले. ज्यांच्याकडे दुकान आहे, त्यांना बाजार समितीकडे भाडे, महापालिका कर, विद्युत बिलाचा भरणा करणे बंधनकारक आहे.शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कुठलाही त्रास होणार नाही व बाजार समितीचा कारभार पारदर्शी राहावा, यासाठी काही अटी-शर्ती नव्याने टाकण्यात आल्यात.- नाना नागमोतेउपसभापती, बाजार समिती