शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

‘कॅफो’विरुद्ध सत्ताधारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:30 IST

जिल्हा परिषदेची आर्थिक तिजोरी सांभाळणाऱ्या वित्त विभागाने निधी वळता केल्याचे प्रकरण काही महिन्यांपासून चांगलेच गाजत आहे. अशातच आता विकासकामांच्या फायलींवर तातडीने निपटारा केला जात नसल्याने कॅफो रवींद्र येवले यांच्या कार्यप्रणालीवर सत्ताधारी पक्षाची नाराजी अधिकच वाढली आहे. त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देविकासकामाच्या फायलींना ब्रेक : अध्यक्षांनी विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेची आर्थिक तिजोरी सांभाळणाऱ्या वित्त विभागाने निधी वळता केल्याचे प्रकरण काही महिन्यांपासून चांगलेच गाजत आहे. अशातच आता विकासकामांच्या फायलींवर तातडीने निपटारा केला जात नसल्याने कॅफो रवींद्र येवले यांच्या कार्यप्रणालीवर सत्ताधारी पक्षाची नाराजी अधिकच वाढली आहे. त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हा परिषद वित्त विभागाने पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवत सुमारे १६० कोटी रूपयांच्या ठेवी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून काढत राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवीच्या स्वरूपात वळत्या केल्या आहेत. यावर जिल्हा परिषदेच्या स्थायी, सर्वसधारण सभेत हा मुद्दा चांगलाचा गाजाला. परिणामी, पदाधिकारी व अधिकाऱ्यात हमरी तुमरीपर्यंत हा विषय पोहोचला होता. अशातच आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्ष विकासकामे आचारसंहीतेपूर्वी व आर्थिक वर्ष संपण्याच्या आत विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे रेटा वाढविला जात आहे. जिल्हा निधी, जनसुविधा, ३०-५४ आणि ५०-५४ ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग, लोकोपयोगी कामे २५-१५ यांसारख्या विकासकामासंदर्भात प्रशासनाकडून आवश्यक ते सोपस्कार विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी दररोज यंत्रणेच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी खटाटोप करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार संंबंधित विभागाचे खातेप्रमुख कामेही करत आहेत. त्यानंतर कामांच्या फायली वित्त विभागाच्या संबंधित प्रशासकीय कारवाईकरिता सादर केल्यानंतर त्याचा निपटारा विनाविलंब करीत नसल्याचा आरोप पदाधिकारी करीत आहे.विकासकामे वेळीच निकाली न काढता त्यावर त्रुटींचाच शेरा अधिक उमटत असल्याने कामे खोळंबली जात असल्याने पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या फाईल नियमानुसार विविध विभागाकडून सादर केल्यानंतरही कारण नसताना वित्त विभागात आडकाठी आणली जात असल्याने जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. विकासाच्या फाईल व अन्य मुद्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी ९ जानेवारी रोजी कॅफो येवले यांना लेखी पत्राव्दारे १६० कोटी रूपये वळते करण्याच्या मुद्यावर इत्यंभूत माहिती मागितली आहे. त्यावर आता वित्तविभागाकडून काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ठेवीचा इत्थंभूत माहिती मागितलीजिल्हा परिषदेला विविध विकासकामे, योजना आणि वेतनाचा सुमारे १६० कोटी रुपयांची एफडी जिल्हा बँकेत न करता प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवत राष्ट्रीयीकृत बँकेत केल्याच्या मुद्यावर पुन्हा झेडपी अध्यक्षांनी ९ जानेवारी रोजी मुख्यलेखा व वित्त अधिकाऱ्यांना पत्राव्दारे इत्थंभूत माहिती मागितली. कित्येक वर्षांपासून झेडपीला प्राप्त होणारा शासनाचा कोट्यवधींचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवी स्वरुपात ठेवला जातो. मात्र, झेडपीच्या वित्त विभागाने सीईओंचा आदेश पुढे करीत १६० कोटींचा निधीची राष्ट्रीयीकृत बँकेत एफडी केली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २५ कोटी व एसबीआय बँकेतील ७५ कोटी रूपयांचा यात समावेश होता. याप्रकरणी अध्यक्षांनी पत्राव्दारे माहिती विचारली आहे.यावर कॅफो येवले काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे.वित्त विभागात विकासकामांच्या फायली कारण नसताना अडकून ठेवल्या जात आहे. परिणामी, कामे मार्गी लागण्याऐवजी रखडली जातात. यापूर्वी झेडपीच्या १६० कोटीच्या ठेवी परस्परच वळते केल्यात. त्यामुळे कॅफो येवले यांचा मनमानी कारभार बंद करावा.- नितीन गोंडाणेअध्यक्ष, जिल्हा परिषदवित्त विभागात कुठल्याही विकासाच्या फायली पेडींग नाहीत. नियमसंगत नसलेल्या फायलीच निकाली काढण्यास अडचणी येतात. २५ कोटींच्याच ठेवी जिल्हा बँकेतून काढल्या. ठेवीची मुदत संपताच त्याबाबत प्रशासन फेरविचार करते. त्यामुळे रोष व्यक्त करण्याचा प्रश्नच नाही.- रवींद्र येवले,मुख्यलेखा व वित्त अधिकारी