शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

रुबेला, गोवर लसीकरणापासून वंचितांच्या आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:34 IST

इर्विन रुग्णालयाने गोवर रुबेला लसीकरणाचे ९० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. पाल्यांच्या भविष्यासाठी हे लसीकरण महत्त्वाचे असल्याने पालकांनी लसीकरणाबाबत कोणताही संभ्रम न ठेवता पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.

ठळक मुद्दे९० टक्के उद्दिष्ट पूर्ण : पालक ठरताहेत पाल्यांच्या भविष्यात खोडा

अमरावती : इर्विन रुग्णालयाने गोवर रुबेला लसीकरणाचे ९० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. पाल्यांच्या भविष्यासाठी हे लसीकरण महत्त्वाचे असल्याने पालकांनी लसीकरणाबाबत कोणताही संभ्रम न ठेवता पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा सामान्य रुग्णालयाला १ लाख १३ हजार ५७ उद्धिष्ट आहे. त्यापैकी १ लाख २०७ जणांना लस देण्यात आली असून, हे प्रमाण ८८.६३ टक्के आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ३ लाख ९२ हजार ७१७ चे उद्दिष्ट आहे. त्यापैकी त्यांनी ३ लाख ४५ हजार १० लसीकरण केले आहेत. त्याचे प्रमाण ८७.८५ टक्के आहे. याशिवाय महापालिकेला १ लाख ६१ हजार १०६ चे उद्दिष्टे देण्यात आले होते. त्यापैकी त्यांनी अमरावती शहरात १ लाख २२ हजार ७४० जणांना लसीकरण केले आहे. हे प्रमाण ७६.१९ आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केले असतानाही काही विशिष्ट विचारसरणीच्या पालकांच्या विरोधामुळे काही मुले लसीकरणापासून अजूनही वंचित आहेत. ही बाब मुलांच्या भविष्यातील आरोग्यासाठी धोका निर्माण करणारी आहे. काही पालकांमधील गैरसमजामुळे त्यांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करून घेतलेले नाहीत. भविष्यात संक्रमणाच्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास ही लस उपयुक्त असल्याने ज्या मुलांचे लसीकरण झाले नाहीत, त्यांना भविष्यातील धोका टाळण्यासाठी ज्या पालकांनी आपल्या मुलांचे रुबेला व गोवरचे लसीकरण केले नाही, त्यांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.लसीकरणाने धोका टळतोएमआर लसीकरण मोहिमेत नऊ महिने पूर्ण आणि १५ वर्षांपेक्षा कमी अशा सर्व बालकांना ही लस दिल्याने गोवर व रुबेला या दोन्ही रोगांपासून संरक्षण मिळते. गोवर व रुबेलाचे रुग्ण वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंतही दिसून येतात. त्यामुळे बालकांना लस दिल्याने आजारावर नियंत्रण मिळवता येते. गर्भवती मातांना वेळेत लसीकरण केल्याने रुबेलाची लागण होऊन बाळ गर्भात दगावण्याचा धोका कमी असतो. ही मोहीम झाल्यानंतर गोवर लसीऐवजी एमआर एक, एमआर दोन अशा पद्धतीने नेहमीच लसीकरण केले जात आहे.गोवर व रुबेला लसीकरणामुळे संक्रमणाचा धोका टळतो. ज्यांनी लसीकरण केले नाही, त्यांनी कोणताही गैरसमज न बाळगता, तत्काळ लसीकरण करून मुलांचे आरोग्य सुरक्षित करावे.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक