शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

रुबेला, गोवर लसीकरणापासून वंचितांच्या आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:34 IST

इर्विन रुग्णालयाने गोवर रुबेला लसीकरणाचे ९० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. पाल्यांच्या भविष्यासाठी हे लसीकरण महत्त्वाचे असल्याने पालकांनी लसीकरणाबाबत कोणताही संभ्रम न ठेवता पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.

ठळक मुद्दे९० टक्के उद्दिष्ट पूर्ण : पालक ठरताहेत पाल्यांच्या भविष्यात खोडा

अमरावती : इर्विन रुग्णालयाने गोवर रुबेला लसीकरणाचे ९० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. पाल्यांच्या भविष्यासाठी हे लसीकरण महत्त्वाचे असल्याने पालकांनी लसीकरणाबाबत कोणताही संभ्रम न ठेवता पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा सामान्य रुग्णालयाला १ लाख १३ हजार ५७ उद्धिष्ट आहे. त्यापैकी १ लाख २०७ जणांना लस देण्यात आली असून, हे प्रमाण ८८.६३ टक्के आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ३ लाख ९२ हजार ७१७ चे उद्दिष्ट आहे. त्यापैकी त्यांनी ३ लाख ४५ हजार १० लसीकरण केले आहेत. त्याचे प्रमाण ८७.८५ टक्के आहे. याशिवाय महापालिकेला १ लाख ६१ हजार १०६ चे उद्दिष्टे देण्यात आले होते. त्यापैकी त्यांनी अमरावती शहरात १ लाख २२ हजार ७४० जणांना लसीकरण केले आहे. हे प्रमाण ७६.१९ आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केले असतानाही काही विशिष्ट विचारसरणीच्या पालकांच्या विरोधामुळे काही मुले लसीकरणापासून अजूनही वंचित आहेत. ही बाब मुलांच्या भविष्यातील आरोग्यासाठी धोका निर्माण करणारी आहे. काही पालकांमधील गैरसमजामुळे त्यांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करून घेतलेले नाहीत. भविष्यात संक्रमणाच्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास ही लस उपयुक्त असल्याने ज्या मुलांचे लसीकरण झाले नाहीत, त्यांना भविष्यातील धोका टाळण्यासाठी ज्या पालकांनी आपल्या मुलांचे रुबेला व गोवरचे लसीकरण केले नाही, त्यांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.लसीकरणाने धोका टळतोएमआर लसीकरण मोहिमेत नऊ महिने पूर्ण आणि १५ वर्षांपेक्षा कमी अशा सर्व बालकांना ही लस दिल्याने गोवर व रुबेला या दोन्ही रोगांपासून संरक्षण मिळते. गोवर व रुबेलाचे रुग्ण वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंतही दिसून येतात. त्यामुळे बालकांना लस दिल्याने आजारावर नियंत्रण मिळवता येते. गर्भवती मातांना वेळेत लसीकरण केल्याने रुबेलाची लागण होऊन बाळ गर्भात दगावण्याचा धोका कमी असतो. ही मोहीम झाल्यानंतर गोवर लसीऐवजी एमआर एक, एमआर दोन अशा पद्धतीने नेहमीच लसीकरण केले जात आहे.गोवर व रुबेला लसीकरणामुळे संक्रमणाचा धोका टळतो. ज्यांनी लसीकरण केले नाही, त्यांनी कोणताही गैरसमज न बाळगता, तत्काळ लसीकरण करून मुलांचे आरोग्य सुरक्षित करावे.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक