शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

आरटीई अनुदानाला शासनाने लावली कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दुर्बल व वंचित घटकांच्या २५ टक्के जागांवर खासगी शाळांमध्ये प्रवेश ...

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दुर्बल व वंचित घटकांच्या २५ टक्के जागांवर खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क प्रतिपूर्ती अनुदान निम्म्याने कमी करून आठ हजार रुपये करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

राज्य शासन स्वत:चा आर्थिक भार कमी करत असताना, राज्यातील बालकांवरील शुल्काचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मात्र प्रयत्न करताना दिसून येत नाही. यामुळे शासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप पालक संघटनांकडून होत आहे. शासनाने कमी केलेली रक्कम सामान्य विद्यार्थ्यांकडून वसूल केली जाण्याची भीती पालकांमधून व्यक्त होत आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी बुधवारी परिपत्रकाद्वारे आरटीई अंतर्गत प्रतीविद्यार्थी खासगी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती प्रसिद्ध केली. त्यानुसार २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी ही शैक्षणिक प्रतिपूर्तीची रक्कम प्रतिविद्यार्थी आठ हजार रुपये केली आहे. वर्षभरापासून शाळा बंद असून, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम कमी केल्याचे शालेय शिक्षण विभागाचे सूत्रांनी सांगितले. घरी बसून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही शुल्क दिलासा देण्यात आलेला नाही. शासनाच्या तिजोरीतून आरटीईसाठी शुल्क प्रतिकृती अनुदानाची रक्कम देण्याची वेळ आल्यावर ती रक्कम मात्र कमी केली. सरकारने पालकांही शुल्क दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

बॉक्स

सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शुल्क कमी का केले नाही?

राज्य शासनाने आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुदानाच्या रकमेत कपात केली आहे. त्याप्रमाणे खाजगी शाळांमध्ये शिकण्याच्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क कमी का केले नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. शासनाने कमी केलेली रक्कम सामान्य विद्यार्थ्यांकडून वसूल केली जाण्याची भीती पालकांमधून व्यक्त होत आहे.