शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

आरटीई प्रवेशासाठी सोडत निघाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:14 IST

अमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्हाभरातील २ हजार ७६ जागांसाठी तब्बल ...

अमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्हाभरातील २ हजार ७६ जागांसाठी तब्बल ५ हजार ९२२ अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर आरटीई प्रवेशासाठी अर्ज सादर केलेल्या पालकांना सोडतीची प्रतीक्षा लागली होती. त्यानुसार बुधवार, ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता पुणे येथे राज्यस्तरीय ऑनलॉनईन सोडत काढण्यात आली. त्यामुळे आता प्रवेशास पात्र ठरलेल्या पाल्यांना प्रवेशाबाबतचे मेसेज येत्या १५ एप्रिलपासून मिळणार असल्याची माहिती स्थानिक प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिली.

शैक्षणिक सत्र २०२१-२२ करिता आरटीई प्रवेशासाठी ३ ते २१ मार्च ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. सुरुवातीला अर्जासाठी दिलेल्या मुदतीत तांत्रिक अडचणी आल्यामुळे पालकांना अर्ज भरण्यास अडचणी आल्या होत्या. अर्ज सादर करण्यासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील २४४ शाळांनी नोंदणी केली. या शाळांमध्ये २५ टक्के राखीव असलेल्या २ हजार ७६ जागा आहेत. यासाठी जिल्हाभरातून ५,९२२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठी गत वर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावर सोडत काढण्यात आली. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागांवर आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. त्यानुसार आरटीई सोडतीत प्रवेशपात्र पाल्यांना प्रवेशाबाबतचे मेसेज १५ एप्रिलपासून मिळणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

बॉक्स

पडताळणी समितीकडे सादर करावे लागणार कागदपत्र

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी सोडत जाहीर झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतचे मेसेज येणार आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना लॉटरीत संधी मिळाली अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी रहिवाशांचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीचा दाखला, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावर स्थापन केलेल्या पडताळणी समितीकडे सादर करावे लागणार आहेत.