शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

आरटीई प्रवेशाचा खेळ पुन्हा सुरू

By admin | Updated: November 5, 2015 00:22 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे. तरीही काही संस्था चालकांनी ही प्रवेश प्रक्रिया राबविली नव्हती.

उपयोग काय? : पालकांना दिल्या सूचनाअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे. तरीही काही संस्था चालकांनी ही प्रवेश प्रक्रिया राबविली नव्हती. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया यशस्वी झालेली नसताना उशिरा जाग्या झालेल्या शिक्षण विभागाने आरटीईची दुसऱ्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत काही तांत्रिक चुका असताना त्यामधील त्रुटी दूर करून पालकांना एसएमएसद्वारे प्रवेश घेण्याच्या सूचित केले जात आहे. त्यामुळे शिक्षण समितीने आरटीईनुसार प्रवेश प्रक्रियेला खेळ मांडल्याचे चित्र आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरटीईनुसार शिक्षणाचा लाभ व्हावा, या हेतूने २५ टक्के पाल्यांना अनुदानित, विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देणे बंधनकारक केले. त्यानुसार शिक्षण विभागाने मागील एप्रिल व मे महिन्यात आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर सोडतीद्वारे पालकांना पाल्यांच्या प्रवेशासाठी शाळाही निर्धारित केल्यात. मात्र, शाळांनी नर्सरी व पहिली प्रवेशाचा गोंधळ घालत आरटीईनुसार प्रवेश देण्यास नकार दिला त्यामुळे काही ठिकाणी प्रवेश पूर्ण होऊ शकले नाहीत. काही शाळांनी तर आरटीईनुसार प्रवेशच दिलेले नाहीत. त्यासंदर्भात शिक्षण समितीकडून अहवालही मागविण्यात आलेत. ते अहवाल शिक्षण विभागाकडून उपसंचालकांना देण्यात आले. यामध्ये चालू शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्रही आटोपले. सहामाही परीक्षा सुरू असताना शिक्षण मंडळाने आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे वेळ निघून गेल्यानंतर याचा फायदा काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.