शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाचा खेळ पुन्हा सुरू

By admin | Updated: November 5, 2015 00:22 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे. तरीही काही संस्था चालकांनी ही प्रवेश प्रक्रिया राबविली नव्हती.

उपयोग काय? : पालकांना दिल्या सूचनाअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे. तरीही काही संस्था चालकांनी ही प्रवेश प्रक्रिया राबविली नव्हती. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया यशस्वी झालेली नसताना उशिरा जाग्या झालेल्या शिक्षण विभागाने आरटीईची दुसऱ्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत काही तांत्रिक चुका असताना त्यामधील त्रुटी दूर करून पालकांना एसएमएसद्वारे प्रवेश घेण्याच्या सूचित केले जात आहे. त्यामुळे शिक्षण समितीने आरटीईनुसार प्रवेश प्रक्रियेला खेळ मांडल्याचे चित्र आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरटीईनुसार शिक्षणाचा लाभ व्हावा, या हेतूने २५ टक्के पाल्यांना अनुदानित, विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देणे बंधनकारक केले. त्यानुसार शिक्षण विभागाने मागील एप्रिल व मे महिन्यात आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर सोडतीद्वारे पालकांना पाल्यांच्या प्रवेशासाठी शाळाही निर्धारित केल्यात. मात्र, शाळांनी नर्सरी व पहिली प्रवेशाचा गोंधळ घालत आरटीईनुसार प्रवेश देण्यास नकार दिला त्यामुळे काही ठिकाणी प्रवेश पूर्ण होऊ शकले नाहीत. काही शाळांनी तर आरटीईनुसार प्रवेशच दिलेले नाहीत. त्यासंदर्भात शिक्षण समितीकडून अहवालही मागविण्यात आलेत. ते अहवाल शिक्षण विभागाकडून उपसंचालकांना देण्यात आले. यामध्ये चालू शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्रही आटोपले. सहामाही परीक्षा सुरू असताना शिक्षण मंडळाने आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे वेळ निघून गेल्यानंतर याचा फायदा काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.