शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

आरटीई प्रवेशाचा खेळ पुन्हा सुरू

By admin | Updated: November 5, 2015 00:22 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे. तरीही काही संस्था चालकांनी ही प्रवेश प्रक्रिया राबविली नव्हती.

उपयोग काय? : पालकांना दिल्या सूचनाअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे. तरीही काही संस्था चालकांनी ही प्रवेश प्रक्रिया राबविली नव्हती. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया यशस्वी झालेली नसताना उशिरा जाग्या झालेल्या शिक्षण विभागाने आरटीईची दुसऱ्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत काही तांत्रिक चुका असताना त्यामधील त्रुटी दूर करून पालकांना एसएमएसद्वारे प्रवेश घेण्याच्या सूचित केले जात आहे. त्यामुळे शिक्षण समितीने आरटीईनुसार प्रवेश प्रक्रियेला खेळ मांडल्याचे चित्र आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरटीईनुसार शिक्षणाचा लाभ व्हावा, या हेतूने २५ टक्के पाल्यांना अनुदानित, विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देणे बंधनकारक केले. त्यानुसार शिक्षण विभागाने मागील एप्रिल व मे महिन्यात आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर सोडतीद्वारे पालकांना पाल्यांच्या प्रवेशासाठी शाळाही निर्धारित केल्यात. मात्र, शाळांनी नर्सरी व पहिली प्रवेशाचा गोंधळ घालत आरटीईनुसार प्रवेश देण्यास नकार दिला त्यामुळे काही ठिकाणी प्रवेश पूर्ण होऊ शकले नाहीत. काही शाळांनी तर आरटीईनुसार प्रवेशच दिलेले नाहीत. त्यासंदर्भात शिक्षण समितीकडून अहवालही मागविण्यात आलेत. ते अहवाल शिक्षण विभागाकडून उपसंचालकांना देण्यात आले. यामध्ये चालू शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्रही आटोपले. सहामाही परीक्षा सुरू असताना शिक्षण मंडळाने आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे वेळ निघून गेल्यानंतर याचा फायदा काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.