शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक घोषित

By admin | Updated: March 6, 2017 00:08 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले आहेत.

जिल्ह्यातून ५ हजार ३० अर्ज : ७ मार्च रोजी पहिला 'ड्रॉ'अमरावती : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले आहेत. त्यानुसार जिल्हाभरातून सुमारे ५ हजार ३० प्रवेश अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. तसेच शिक्षण विभागांतर्गत आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी ७ मार्च रोजी पहिली सोडत काढण्यात येणार आहे.शालेय शिक्षण विभागातर्फे फेब्रुवारी महिन्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. शिक्षण विभागाच्या संकेस्थळावर २ मार्चपर्यत आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठीची मुदत होती. त्यानुसार पालकांनी आरटीईच्या जागांसाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार नर्सरी, के.जी. १, के.जी.२, प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यात २१४ शाळा पात्र ठरल्या आहेत. आरटीईच्या सर्व प्रवेशासाठी सुमारे ५५०० जागा उपलब्ध आहेत. यासाठी जिल्हाभरातून ५ हजार ३० अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता पालकांचे लक्ष विद्यार्थ्याचे प्रवेशाकङे लागले आहे. शिक्षण विभागाने आरटीईच्या वेळापत्रकही जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार मंगळवार ७ मार्च रोजी पहिला लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवेशासाठी साधारपणे ८ मार्चपासून आरटीईनुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर दुसरी, तिसरी आणि चौथी लॉटरी काढण्यात येणार आहे. यादरम्यान किती विद्यार्थ्याना प्रवेश मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)आॅनलाईन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र२५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी रहिवासी वास्तव्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीज, टेलिफोन बिल, घरपट्टी, पाणीपट्टी बिल, दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा, वाहन चालविण्याचा परवाना, वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग, अपंगत्व प्रमाणपत्र, एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला आर्थिक वर्ष २०१५-१६ चा कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आदी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.भातकुली पं.स. सभागृहात सोडतआरटीनुसार आॅनलाईन प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडे प्राप्त ५ हजार ३० अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची सोडत ७ मार्च रोजी भातकुली पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता काढण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी किशोर पुरी यांनी सांगितले.शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा प्रवेशासाठी जिल्ह्यात २१४ शाळा पात्र ठरल्या आहेत. ५ हजार ३० अर्ज आमच्याकडे आले आहेत. लवकरच वेळापत्रकानुसार लॉटरी पध्दतीने राबविली जाईल- एस. एम. पानझाडे,शिक्षणाधिकारी प्राथमिक