शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST

अमरावती : राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा अर्थात (आरटीई) अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेवर ...

अमरावती : राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा अर्थात (आरटीई) अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेवर होत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गतवर्षीही कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये हे प्रवेश लांबणीवर पडले होते. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहिली. यंदासुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढण्यात आली. १५ एप्रिलला सोडतीत पात्र असलेल्या पाल्याच्या पालकांना एसएमएसव्दारे प्रवेशाची तारीख कळविण्यात आली होती. त्यानुसार १९ एप्रिलपासून प्रवेश निश्चिती सुरू होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू झाल्याने आरटीई प्रवेशाला ब्रेक लागला. दरम्यान संचारबंदी लागू होण्यापूर्वी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने पालक व्हाॅट्सॲप किंवा ई-मेल कागदपत्रांच्या प्रती पाठवू शकतात तसेच ई स्वरूपातच कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर शुल्क भरून तात्पुरता प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. आता थेट संचारबंदीचे निर्बंध उठल्यानंतर प्रवेशासंदर्भातील निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ई स्वरूपातील कागदपत्रे पडताळणी रखडणार आहे.

बॉक्स

पालकांमध्ये संभ्रम

गतवर्षीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेश प्रक्रिया रेंगाळलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू असल्याने प्रवेश निश्चितीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच आरटीई पोर्टलवर संचारबंदी नंतरच प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.