शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

वरूडकरांना सहा दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 01:30 IST

एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा के ला जात आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे.

वरूड : एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा के ला जात आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे.शहरापासून २६ किमी अंतरावरील जमालपूर येथून शहराला पाणीपुरवठा केला जातो. दरदिवशी ४० लाख लिटर पाणी आवश्यक आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे ते नियोजन कोलमडले. शहरात दोन जलकुंभ असून, त्यांची संचयक्षमता १३ लाख लिटर आहे. नळजोडणी असलेल्या ग्राहकाला पाच ते सहा दिवसानंतर पाणी मिळते. गावाबाहेरील नवीन वसाहतीत पाइप लाइन नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ६५ हजार २२२ असली तरी २०१९ मध्ये ती एक लाखाच्या घरात आहे. शहरात ९५०० वैयक्तिक नळ व ९२ स्टँडपोस्ट आहेत. त्या स्टँडपोस्टवर महिलांमध्ये होणारी शाब्दिक चकमक नित्याचीच झाली आहे. जमालपूर पंपहाऊसवरून होणारा पुरवठा लोणी, पिंपळखुटा मार्गे येतो. मार्गातील काही शेतकऱ्यांनी व्हॉल्व्ह लीक करून पाणी चोरल्याने शहरातील पाणीपुरवठ्यात मोठी घट झाली. परिणामी दोन दिवसांनी येणारे नळ हे पाचव्या ते सहाव्या दिवशी येऊ लागले.शहराबाहेरील वसाहतीमध्ये अद्यापही नळयोजना पोहोचली नसल्याने आणि या परिसरातील विहिरी आटल्याने तेथे नगर परिषदेने तीन टँकर सुरू केले.२०० लिटर पाण्यासाठी ५० रुपये२०० लिटर पाण्याकरिता ५० रुपये मोजावे लागत आहेत. पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. लग्नसमारंभात ३० रुपये प्रतिकॅन पाणी विकत घेतले जात आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडल्याने १५ रुपयांचे बाटलीबंद पाणी २० ते २५ रुपयांमध्ये विकले जात आहे.नागरिकांनी सहकार्य करावेशहरातील विहिरी आटल्याने आणि जमालपूर येथे मुबलक पाणीसाठा नसल्याने काटकसरीने वापर करावा. नळाला तोट्या लावा. पंप बसवून पाणी काढू नये. पाण्याचा अपव्यय टाळा. नवीन बांधकाम पावसाळ्यापर्यत बंद ठेवा, असे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी आवाहन केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई