शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

वरूडकरांना सहा दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 01:30 IST

एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा के ला जात आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे.

वरूड : एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा के ला जात आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे.शहरापासून २६ किमी अंतरावरील जमालपूर येथून शहराला पाणीपुरवठा केला जातो. दरदिवशी ४० लाख लिटर पाणी आवश्यक आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे ते नियोजन कोलमडले. शहरात दोन जलकुंभ असून, त्यांची संचयक्षमता १३ लाख लिटर आहे. नळजोडणी असलेल्या ग्राहकाला पाच ते सहा दिवसानंतर पाणी मिळते. गावाबाहेरील नवीन वसाहतीत पाइप लाइन नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ६५ हजार २२२ असली तरी २०१९ मध्ये ती एक लाखाच्या घरात आहे. शहरात ९५०० वैयक्तिक नळ व ९२ स्टँडपोस्ट आहेत. त्या स्टँडपोस्टवर महिलांमध्ये होणारी शाब्दिक चकमक नित्याचीच झाली आहे. जमालपूर पंपहाऊसवरून होणारा पुरवठा लोणी, पिंपळखुटा मार्गे येतो. मार्गातील काही शेतकऱ्यांनी व्हॉल्व्ह लीक करून पाणी चोरल्याने शहरातील पाणीपुरवठ्यात मोठी घट झाली. परिणामी दोन दिवसांनी येणारे नळ हे पाचव्या ते सहाव्या दिवशी येऊ लागले.शहराबाहेरील वसाहतीमध्ये अद्यापही नळयोजना पोहोचली नसल्याने आणि या परिसरातील विहिरी आटल्याने तेथे नगर परिषदेने तीन टँकर सुरू केले.२०० लिटर पाण्यासाठी ५० रुपये२०० लिटर पाण्याकरिता ५० रुपये मोजावे लागत आहेत. पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. लग्नसमारंभात ३० रुपये प्रतिकॅन पाणी विकत घेतले जात आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडल्याने १५ रुपयांचे बाटलीबंद पाणी २० ते २५ रुपयांमध्ये विकले जात आहे.नागरिकांनी सहकार्य करावेशहरातील विहिरी आटल्याने आणि जमालपूर येथे मुबलक पाणीसाठा नसल्याने काटकसरीने वापर करावा. नळाला तोट्या लावा. पंप बसवून पाणी काढू नये. पाण्याचा अपव्यय टाळा. नवीन बांधकाम पावसाळ्यापर्यत बंद ठेवा, असे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी आवाहन केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई