शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पीक पैसेवारी समितीत सरपंचांची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: September 19, 2016 00:23 IST

पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे बहुतांश सोयाबीन पीक करपले.

वस्तुनिष्ठ अहवालासाठी आवश्यक : समितीत आठ सदस्यअमरावती : पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे बहुतांश सोयाबीन पीक करपले. अशा अवस्थेत पैसेवारी काढण्यासाठी स्थानिक पातळीवरून वस्तुनिष्ठ अहवाल तहसीलदारांना सादर होणे आवश्यक आहे. यासाठी आठ सदस्यीय ग्राम पैसेवारी समितीत समावेश करण्यासाठी सरपंचांनी तहसीलदारांना पत्र देणे महत्त्वाचे आहे. बहुतांश शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना पैसेवारी काढण्याची पद्धत माहिती नसते, तर कधी पैसेवारी काढण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष केले जाते. याचाच फायदा घेऊन महसूल यंत्रणा शासनाला सोईची असणारी पैसेवारी काढतात. शासनाकडे खोटे अहवाल पाठवितात व शेतकऱ्यांची फसवणूक करतात. यासाठी पीक पैसेवारी समितीत प्रत्येक ग्राम पंचायतीचे ३ अभ्यासू शेतकरी पाठवून समितीत शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण करणे महत्वाचे आहे. जमीन महसूल कायदा १९६६ मधील तरतुदीनुसार महसूल विभागाचे ४ मार्च १९८९ च्या निर्णयानुसार दरवर्षी खरीप व रबी पिकांची पैसेवारी ग्राम पंचायत स्तरावर काढण्यात येते. त्याकरिता ग्राम पैसेवारी समितीची स्थापना दरवर्षी करण्यात येते. यामध्ये तीन शासीय व पाच शेतकरी प्रतिनिधी असतात. सरपंच व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. एक प्रगतिशील शेतकरी व दोन अल्पभूधारक शेतकरी यापैकी शक्यतोवर एक महिला सदस्य असावी व त्याची निवड प्रत्येक ग्राम पंचायतीने दरवर्षी करून त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी तहसीलदारांना द्यावयाची असतात. जर ग्राम पंचायतीने शेतकरी प्रतिनिधिची नावे न पाठविल्यास उर्वरित दोन सदस्य पैसेवारी निश्चित करतील व त्यावर हरकत घेता येणार आहे. विदर्भ व मराठवाड्या हंगामी पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येते. तत्पूर्वी महसूल कर्मचाऱ्यांद्वारा २५ सप्टेंबर दरम्यान पैसेवारी समितीच्या बैठकी घेतात. यासाठी ग्रा.पं.नी तीन सदस्यांची निवड करून पैसेवारी काढण्यापूर्वी तहसीलदारांना देणे महत्त्वाचे ठरते. अशी आहे ग्राम पैसेवारी समिती जिल्हाधिकाऱ्यांद्वारा दरवर्षी ग्राम पैसेवारी समिती गठित करण्यात येते. राजस्व निरीक्षक या समितीचे अध्यक्ष असतात. ग्रामसेवक, सरपंच, प्रगतिशील शेतकरी, सेवा सोसायटीचे अध्यक्ष, दोन अल्पभूधारक शेतकरी, तलाठी, कृषी सहायक हे या समितीचे सदस्य असतात. यापैकी प्रगतिशील शेतकरी व दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांची निवड संबंधित ग्रामपंचायतींनी करावी. ही निवड वेळेवर न झाल्यास उरलेल्या सदस्यांची समिती अस्तित्वात राहील व ती कामकाज पाहील, असे शासन निर्णयात नमूद आहे. गावपातळीवर वस्तुनिष्ठ पैसेवारी निश्चित व्हावी. यासाठी सरपंच व शेतकरी प्रतिनिधिंनी दक्ष राहणे गरजेचे आहे. यासाठी त्वरित शेतकरी प्रतिनिधींची निवड करून तहसीलदारांना यादी देणे महत्त्वाचे आहे. - भाई रजनीकांत, संयोजक, शेतकरी बचाओ आंदोलन