शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भय्यू महाराजांची भूमिका कोपर्डीपुरतीच मर्यादित

By admin | Updated: September 21, 2016 00:08 IST

समाजातील काही घटकांनी भय्यू महाराजांवर आरोप करणे सुरू केले असून त्यांची भूमिका कोपर्डीपुरतीच मर्यादित असल्याचा दावा सूर्योदय परिवाराने केला आहे.

सूर्योदय परिवार : मानवतेच्या भूमिकेतून अत्याचाराच्या मुद्याला हातअमरावती : समाजातील काही घटकांनी भय्यू महाराजांवर आरोप करणे सुरू केले असून त्यांची भूमिका कोपर्डीपुरतीच मर्यादित असल्याचा दावा सूर्योदय परिवाराने केला आहे. राज्यात ठिकठिकाणी निघत असलेल्या मराठा मोर्चाशी महाराजांचा संबंध जोडला जात असल्याने ते प्रचंड उद्विग्न झाल्याचे हेमंत देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले.यासंदर्भात भय्यू महाराजांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्याच सूचनेनुसार आपण त्यांच्यावरील आरोपांचा स्पष्ट इन्कार करीत असल्याची भूमिका देशमुख यांनी मांडली. भय्यू महाराजांनी केलेले निवेदनही माध्यमांना देण्यात आले.मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत, ते त्यांनी सरकारशी बोलून सोडवावेत, त्यात हस्तक्षेप करणार नाही. मात्र, कोपर्डीतील त्या अभाग्या मुलीला न्याय मिळावा व दोषींना कडक शिक्षा व्हावी, अशी भय्यू महाराजांची भूमिका असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानवतेच्या भूमिकेतून हाती घेतलेल्या कोपर्डीच्या प्रश्नाला कुणाच्याही स्वार्थापायी विभत्स वळण लागावे, हा त्या मुलीच्या मातेचा व त्या अभागी कन्येच्या वेदनेचा अपमान असल्याचे महाराजांना वाटते. कोपर्डीतील ती घटना समजताच महाराज तातडीने तेथे गेले, त्या दु:खी कुटूंबाला आध्यात्मिक बळ देण्याबरोबरच शाळेत जाण्यास घाबरणाऱ्या तेथील मुलींसाठी चार बसेस दिल्यात. मात्र, त्यांच्यावर प्रसिद्धी, पैसा व श्रेय लाटण्यासोबतच भांडवलदारीचे खोटे आरोप करण्यात आलेत. ते आरोप सिद्ध करावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याचे आव्हान महाराजांनी दिल्याचे यावेळी पत्रपरिषदेत सांगण्यात आले.आमचा अजेंडा कोपर्डीचआमचा अजेंडा कोपर्डीच होता आणि कोपर्डीच राहणार. नंतर जोडल्या गेलेल्या मागण्या या मराठा समाजाच्या सामूहिक वेदनेच्या आहेत. तो प्रश्न मराठा समाजाने वेगळा सोडवावा,अशी स्पष्ट भूमिका भय्यू महाराजांनी घेतल्याचे हेमंत देशमुख यांच्यासह डॉ.राजेश शेरेकर, राजू सुंदरकर, जयसिंग देशमुख, ऋषिकेश वैद्य, रवि देशमुख यांनी यावेळी सांगितले.