शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

‘रोहयो’चा पूरक कृती आराखडा १०२२ कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा परिषदेने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा चालू आर्थिक वर्ष सन २०२०-२२चा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जिल्हा परिषदेने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा चालू आर्थिक वर्ष सन २०२०-२२चा सुमारे १,०२२ कोटी ०२ लाख ४१ हजार रूपयांचा पूरक कृती आराखडा तयार केला आहे. तर सन २०२१-२२ या वर्षाचा मूळ कृती आराखडा ४३९३.३३ लाख ४४ हजार रूपयांचा तयार केला आहे. या आराखड्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या आराखडयात शेततळी, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, सिंचन विहीर, पाझर तलाव दुरूस्ती, अंगणवाडी बांधकाम, गाेठा, गांडूळ खत अशी पूरक आराखड्यातील ९१,०५० एवढी कामे प्रस्तावित केली आहेत. यामुळे ३ कोटी ०१ लाख ७९ हजार ८११ संभाव्य मनुष्य दिन निर्मिती होणार असून, हा आराखडा १,०२२ कोटींचा पूरक आराखडा आहे. याशिवाय सन २०२१-२२ या वर्षाच्या मूळ कृती आराखडयात २ लाख ७३ हजार ०७ एवढी कामे प्रस्तावित केली आहेत. यामुळे २० कोटी ४१ लाख २२ हजार ४४४ संभाव्य मनुष्य दिन निर्मिती होणार आहे. हा मूूळ आराखडा ४,३९३ कोटी ३३ लाख ४४ हजारांचा आहे. यामुळे जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पुढील वर्षातील कामांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यात रस्ते, वृक्षलागवड व संगोपन, सिंचन विहीर, जलसंधारणविषयक कामे (सीसीटी, लूजबोल्डर, शेतबांध बंदिस्त) फळबाग, रेशीम लागवड, रोपवाटिका, गांडूळ खत प्रकल्प, गोठे, शेळीपालन, कुक्कटपालन शेड, घरकुल, शौचालय अंतर्गत कामे यासोबतच अन्य कामेदेखील करण्यात येणार आहेत.

बॉक्स

गत दहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शासनाने रोजगार हमी योजनेला मंज़ुरी दिल्याने ग्रामीण भागात उदरनिर्वाहासाठी हाताला काम मिळणार आहे. सध्या अर्थचक्र मंदावल्यामुळे या कामांना गती मिळावी, म्हणून शासनाने ‘रोहयो’ची कामे सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळणार असून, या कामांचा गावांना फायदा होणार आहे.

कोट

जिल्ह्यात ‘रोहयो’ची कामे सुरू झाली आहेत. या कामांच्या माध्यमातून सर्वस्तरातील मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये मजुरांना कामाची आवश्यकता आहे, त्यांना मागणीनुसार कामे उपलब्ध करून देऊ.

प्रवीण सिन्नारे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

रोहयो विभाग, जिल्हा परिषद