शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

‘रोहयो’चा पूरक कृती आराखडा १०२२ कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा परिषदेने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा चालू आर्थिक वर्ष सन २०२०-२२चा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जिल्हा परिषदेने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा चालू आर्थिक वर्ष सन २०२०-२२चा सुमारे १,०२२ कोटी ०२ लाख ४१ हजार रूपयांचा पूरक कृती आराखडा तयार केला आहे. तर सन २०२१-२२ या वर्षाचा मूळ कृती आराखडा ४३९३.३३ लाख ४४ हजार रूपयांचा तयार केला आहे. या आराखड्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या आराखडयात शेततळी, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, सिंचन विहीर, पाझर तलाव दुरूस्ती, अंगणवाडी बांधकाम, गाेठा, गांडूळ खत अशी पूरक आराखड्यातील ९१,०५० एवढी कामे प्रस्तावित केली आहेत. यामुळे ३ कोटी ०१ लाख ७९ हजार ८११ संभाव्य मनुष्य दिन निर्मिती होणार असून, हा आराखडा १,०२२ कोटींचा पूरक आराखडा आहे. याशिवाय सन २०२१-२२ या वर्षाच्या मूळ कृती आराखडयात २ लाख ७३ हजार ०७ एवढी कामे प्रस्तावित केली आहेत. यामुळे २० कोटी ४१ लाख २२ हजार ४४४ संभाव्य मनुष्य दिन निर्मिती होणार आहे. हा मूूळ आराखडा ४,३९३ कोटी ३३ लाख ४४ हजारांचा आहे. यामुळे जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पुढील वर्षातील कामांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यात रस्ते, वृक्षलागवड व संगोपन, सिंचन विहीर, जलसंधारणविषयक कामे (सीसीटी, लूजबोल्डर, शेतबांध बंदिस्त) फळबाग, रेशीम लागवड, रोपवाटिका, गांडूळ खत प्रकल्प, गोठे, शेळीपालन, कुक्कटपालन शेड, घरकुल, शौचालय अंतर्गत कामे यासोबतच अन्य कामेदेखील करण्यात येणार आहेत.

बॉक्स

गत दहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शासनाने रोजगार हमी योजनेला मंज़ुरी दिल्याने ग्रामीण भागात उदरनिर्वाहासाठी हाताला काम मिळणार आहे. सध्या अर्थचक्र मंदावल्यामुळे या कामांना गती मिळावी, म्हणून शासनाने ‘रोहयो’ची कामे सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळणार असून, या कामांचा गावांना फायदा होणार आहे.

कोट

जिल्ह्यात ‘रोहयो’ची कामे सुरू झाली आहेत. या कामांच्या माध्यमातून सर्वस्तरातील मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये मजुरांना कामाची आवश्यकता आहे, त्यांना मागणीनुसार कामे उपलब्ध करून देऊ.

प्रवीण सिन्नारे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

रोहयो विभाग, जिल्हा परिषद