शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतरही रोहयोच्या तिजोरीत ठणठणाट

By admin | Updated: February 1, 2017 00:06 IST

रोजगार हमी योजनेच्या कामावर लागणाऱ्या साहित्याची देयके अदा करण्यासाठी आलेल्या राज्याच्या खात्यात दोन महिन्यांपासून ठणठणाट आहे.

कामे थांबली : दोन महिन्यांपासून राज्याच्या खात्यात निधीची वानवाअमरावती : रोजगार हमी योजनेच्या कामावर लागणाऱ्या साहित्याची देयके अदा करण्यासाठी आलेल्या राज्याच्या खात्यात दोन महिन्यांपासून ठणठणाट आहे. निधीच नसल्याने बांधकाम साहित्य आणखी किती दिवस उधारीवर घ्यावे, काम कसे पूर्ण करावेत, याविवंचनेत शासनाच्या विविध यंत्रणांवरील वैयक्तिक लाभार्थी आहेत. त्याचा सर्वाधिक फटका घरकूल आणि सिंचन विहीर लाभार्थींना बसत आहे. रोहयोच्या मंजूर कामासाठी राज्य आणि केंद्र शासनाचे स्वतंत्र खाते आहे. त्या खात्यात निधी जमा ठेवला जातो. तो निधी कामावर खर्चाच्या देयकानुसार अदा करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना आहेत. मजुरांना मोबदला देण्यासाठी आणि त्या कामासाठी लागणाऱ्या साहित्याचे देयक अदा करण्यासाठी स्वतंत्र खाती आहेत. त्यापैकी साहित्य म्हणजे, कुशल कामाची देयके अदा करण्यासाठी असलेल्या शासनाच्या खात्यात निधीच जमा झालेला नाही. सिंचन विहिरींची कामे रखडली अमरावती : रोजगार हमी योजनेच्या कामावर लागणारे सिमेंट, लोखंड, वाळू, विटा व इतर साहित्याची देयके स्वतंत्रपणे तयार होते. त्यासाठी केंद्र शासनाकडून हा निधी दिला जातो. मात्र, मजुरीच्या देयकासाठी हा निधी नाही. परिणामी साहित्याच्या देयकासोबतच अकुशल कामाचा मोबदला देण्यासाठी निधी नसल्याने मागील दोन महिन्यांपासून वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांसोबतच साहित्याचा अभाव असल्याने सुरू असलेली सिंचन विहिरीची कामे रखडून पडली आहेत. परिणामी देयके मिळत नसलयाने साहित्य आणि मजुरी कशी अदा करावी, असा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेसोबतच लाभार्थ्यांना पडला आहे. सिंचन विहिरींसाठी मोठी कसरतरोजगार हमी योजनेतून मंजूर विहिरींच्या कुशल आणि अकुशल कामांची देयके राज्याच्या खात्यातून अदा केली जातात. मात्र, विहिरींच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य कोठून आणावे आणि कुशल कामाचा मोबदला कसा द्यावा, असा पेच निर्माण झाला आहे. सिंचन विहिरींच्या लाभार्थींना एकाचवेळी दोन्ही कामांची देयके मिळणे आवश्यक आहे. मात्र, कुशल व अकुशल या दोन्ही कामांची देयके मिळत नसल्याने काम कसे करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. घरकूल लाभार्थ्यांचा ‘वांधा’शासनाने ग्रामीण भागात मंजूर केलेल्या घरकुलाच्या एकूण अनुदानातील रकमेपैकी वाढीव १८ हजार रुपये मजुरीच्या स्वरुपात लाभार्थी कुटुुंबाला मिळतात. मात्र, घरकुलाचे काम केल्यानंतरच ते दिले जातात. जिल्ह्यातील अनेक घरकूल लाभार्थींनाही रक्कम मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. निधी मिळण्यासाठी राज्यस्तरावरून केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. कुशल व अकुशल कामांची देयके अदा करण्यासाठी थोडा अवधी मिळू शकतो. त्याभरवशावर कामे सुरू आहेत.- आर.डी.काळे, उपजिल्हाधिकारी, रोहयो