शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

विशेष रेल्वेची लूट; ४४ कि.मी.वरील धामणगावसाठी १०० कि.मी.चे भाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

दुसऱ्या रेल्वेला ४५ रुपये, स्पेशल ट्रेनला १७५ रुपये भाडे अमरावती : कोरोना काळात रेल्वे बंद होत्या. आता काही महिन्यांपासून ...

दुसऱ्या रेल्वेला ४५ रुपये, स्पेशल ट्रेनला १७५ रुपये भाडे

अमरावती : कोरोना काळात रेल्वे बंद होत्या. आता काही महिन्यांपासून विशेष रेल्वे गाड्या सुरू आहेत. मात्र, विशेष रेल्वेच्या नावाखाली १०० अथवा २०० कि.मी.चे भाडे आकारले जात आहे. बडनेरा ते धामणगाव रेल्वे असा प्रवास करायचा असल्यास ४४ कि.मी. अंतरासाठी चक्क १०० कि.मी.चे भाडे प्रवाशांना द्यावे लागत आहे.

रेल्वेच्या या अफलातून निर्णयाने सर्वसामान्य प्रवाशांची लूट होत असल्याचे वास्तव आहे. रेल्वे प्रशासनाने जनरल एक्स्प्रेस, पॅसेंजर बंद केल्यामुळे कमी अंतरावरील रेल्वे स्थानक गाठण्यासाठीही विशेष गाड्यांनीच प्रवास करावा लागतो. पर्याय नसल्याने खिशाला चाट देत लांब कि.मी.चे भाडे देऊन रेल्वेने ये-जा करावी लागत आहे. काही विशेष रेल्वेच्या नियमानुसार १०० अथवा २०० कि.मी.चे भाडे आकारल जात आहे. परिणामी विशेष रेल्वेने प्रवास नकाे रे बाबा, असे म्हणण्याची अनेकांवर वेळ आली आहे.

अकोला, मूर्तिजापूर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे अशा नजीकच्या प्रवासासाठी जादा भाडे मोजावे लागत आहे,

----------

अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे

०२११२ अमरावती- मुंबई एक्स्प्रेस

०२७६६ अमरावती- तिरुपती एक्स्प्रेस

०२११८ अमरावती- पुणे एक्स्प्रेस

०२८१० मुंबई - हावडा मेल

०२१०६ गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस

०२२६० हावडा- मुंबई गीतांजली एक्स्प्रेस

०२२८० हावडा- पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस

----------------

८० टक्के तिकिट जास्त

- ०२ क्रमांकाने प्रारंभ होणाऱ्या रेल्वेला अलीकडे विशेष दर्जा बहाल करण्यात आला आहे. या गाड्यांना १०० ते २०० कि.मी.चे भाडे आकारून आरक्षण तिकीट मिळते. जवळील थांबा असला तरी हेच भाडे अदा करावे लागतात.

- हावडा-पुणे, अहमदाबाद- चैन्नई, हावडा- मुंबई गीतांजली, मुंबई- हावडा मेल, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस या विशेष रेल्वेला ८० टक्के भाडे जास्त

- विशेष रेल्वेचे भाडे परवणारे नाही. त्यामुळे एसटी, खासगी गाड्यांनी गाव जवळ करावे लागते. पॅसेंजर, जनरल रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षा

--------------------------

किमान १००

कमाल २००

कि.मी.चा फाॅर्म्युला

१) बडनेरा येथून चांदूर रेल्वे स्थानकावर जायचे असल्यास ३० कि.मी. अंतरासाठी १०० कि.मी.चे भाडे द्यावे लागते. जनरल रेल्वेसाठी ३० रुपये भाडे लागते. मात्र, विशेष रेल्वेला १७५ रुपये भाडे लागते.

२) बडनेरा ते मूर्तिजापूर हे ३० कि.मी. अंतर आहे. रेल्वे जनरल तिकीट भाडे ३० रुपये लागतात. मात्र, विशेष अथवा सुपरफास्ट रेल्वेसाठी तिप्पट भाडे द्यावे लागत आहे. ही बाब सामान्य प्रवाशांसाठी आर्थिक लूट करणारी आहे.

-------------------

प्रवासी वैतागले

‘‘ विशेष रेल्वे प्रवास भाडेवाढ ही सामान्यांची कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे जनरल, पॅसेंजर गाड्या लवकरच सुरू झाल्या पाहिजे. त्यामुळे नजीकच्या रेल्वे स्थानकावर कमी खर्चात प्रवास करता येईल.

- विकास डोंगरे, प्रवासी

‘‘कोरोना आता कमी होत आहे. त्यामुळे पॅंसेजर रेल्वे सुरू व्हाव्यात, अशी मागणी आहे. विशेष अथवा सुपरफास्ट गाड्यांनी प्रवास करणे शक्य नाही. रेल्वे तिकिट भाडे सामान्य गाड्यांपेक्षा तिप्पट आहे.

- दयाराम ग्वालानी, प्रवासी.

---------------------

ही लूट कधी बंद होणार?

‘‘ रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार विशेष रेल्वेचे भाडे आकारले जात आहे. यात काही रेल्वेंना १०० ते २०० कि.मी.चे भाडे घेण्यात येत आहे. तिकीट केंद्रावर कोणताही कर्मचारी मर्जीप्रमाणे भाडे आकारत नसून, रेल्वेच्या नियमानुसारच भाडे घेत आहे. तूर्त पॅंसेजर, जनरल एक्स्प्रेस गाड्या सुरू होण्याचे आदेश प्राप्त नाही.

- महेंद्र लोहकरे, स्टेशन प्रबंधक, अमरावती