शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

अतिक्रमणात हरविले रस्ते

By admin | Updated: January 11, 2016 00:09 IST

गावाच्या विकासासाठी नगरपालिका योग्य निर्णय घेत नसल्यास याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

चांदूरबाजारमधील स्थिती : पालिकेची मालमत्ता अतिक्रमणातसुमित हरकुट चांदूरबाजारगावाच्या विकासासाठी नगरपालिका योग्य निर्णय घेत नसल्यास याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. याचा प्रत्यय स्थानिक नगरपालिका हद्दीची बाजारपेठ पाहिल्यावर लक्षात येते. येथील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असताना अतिक्रमण काढण्यास नगरपालिकेच्यावतीने कोणतीही ठोस कार्यवाही करीत नाही. चांदूरबाजार हे गाव परतवाडा-मोर्शी तसेच अमरावती व मध्य प्रदेश सीमेच्या मधोमध आहे. येथील बाजारपेठ मोठी आहे. या गावाला जवळपास ६० ते ७० खेडे लागून असल्याने येथे नेहमीच ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी रेलचेल असते. मात्र येथील अतिक्रमण रहदारीस अडचण निर्माण करीत आहे. अतिक्रमणाची ही समस्या अनेक वर्षांपासून असूनही ते काढण्यास पालिका प्रशासनातर्फे कोणतीच ठोस कार्यवाही करण्यात येत नाही. स्थानिक नगरपालिका मुख्याधिकारी तसेच जनप्रतिनिधी अतिक्रमण काढण्याबाबत मौन असल्याने सामान्य जनतेला बाजारपेठात पायदळ चालणेसुध्दा दुरापास्त झाले आहे. विशेष म्हणजे गावातील अतिक्रमण न काढण्याचा व अतिक्रमण करणाऱ्यांना सहयोग करण्याचा विडाच काही पालिका सदस्यांनी उचललेला आहे. आपले मताचे राजकारण तसेच अर्थकारणामुळे काही नगरसेवकांनी शहराला कुरुपतेची चादर पांघरुण शहरातील नागरिकांना वेठीस धरले आहे. शहराच्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर एवढे अतिक्रमण वाढले आहे की, अनेकांनी अर्ध्या रस्त्यावर दुकाने थाटली आहे. रस्ते अरुंद झाले आहेत. तसेच शहरात दिवसेंदिवस लोकांची रहदारी वाढलीच आहे. तालुक्यातील ही सर्वात मोठी बाजारपेठ असून गावाचा विकास अतिक्रमणामुळे खुंटत चालला आहे. याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने लोकप्रतिनिधीविरुद्ध असंतोष खदखदत आहे. त्यामुळे या अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न जिल्हाधिकारी, अमरावती यांनीच सोडवावा, अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे.