शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

धामणगाव तालुक्यातील रस्ते अतिक्रमणात

By admin | Updated: July 22, 2015 00:47 IST

शासकीय जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात ...

समित्या अद्यापही स्थापन नाही : ग्रामविकास खात्याच्या आदेशाला के राची टोपली धामणगाव रेल्वे : शासकीय जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात ग्रामविकास खात्याचा आदेश असताना या आदेशाला धामणगाव तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे. परिणामी शासकीय जागा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे.शासकीय जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश काढून प्रत्येक गावात ग्रामसभेत अतिक्रमण हटाव समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्व पंचायत समित्यांद्वारे ग्रामपंचायतींना दिले होते़ या समितीमध्ये सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते, वकील यांचा समावेश करण्याचे आदेशात म्हटले होते़ गावात ज्यांनी अतिक्रमण केले त्यांना प्रथम सूचना करणे, नोटीस बजावणे त्यानंतरही अतिक्रमण न काढल्यास पोलीस ठाण्याला माहिती देऊन तालुका प्रशासनाच्या पुढाकाराने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे आदेशात नमूद केले आहे़ परंतु धामणगाव तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींत अतिक्रमण हटाव समित्या स्थापन करण्यात आल्या नसल्याची बाब पुढे आली आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील गावे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहेत़गाव पुढाऱ्यांचेच अतिक्रमणआपल्या गावात सर्वसामान्य माणसावर रूबाब दाखविणाऱ्या गाव पुढाऱ्याने ग्रामपंचायत हद्दीतील ही शासकीय जागा अनधीकृतपणे ताब्यात घेतली आहे़ गावातील ग्रामसेवकांनी संबंधितांना एखादी नोटीस बजावली तर वरिष्ठ नेत्यांकडून दडपण टाकण्याचा प्रकार यापूर्वी घडले असल्यामुळे रस्त्यावरील अथवा शासकीय जागेवरील हे अतिक्रमण काढण्यास स्थानिक यंत्रणा पुढाकार घेत नाही़ ही वस्तुस्थिती असल्याचे अतिक्रमण केलेल्या गावातील ग्रामसेवकांनी सांगितले़तहसील कार्यालयात तक्रारी गावात रस्त्यावर व खाली जागेवर संबंधित व्यक्तीने अतिक्रमण केल्याच्या तक्रारी तहसील व पंचायत समिती कार्यालयात आठवड्यातून एक किंवा दोन अर्ज येत असल्याचे दिसत आहे़ विशेषत: अतिक्रमणा संदर्भात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच दिवाणी न्यायालयात अनेक प्रकरणे अद्यापही सुरू आहे़ न्यायालयाने निर्णय दिल्यास तेवढ्यापुरते अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येते. (तालुका प्रतिनिधी)तालुका प्रशासन कधी घेणार पुढाकार ?शेतातील पांदण रस्ते महसूल विभागाने राबविलेल्या राजस्व अभियानातून मोकळे झाले आहेत़ शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी हे रस्ते मोकळी केले आहेत़ परंतु दैनंदिन जीवनात ज्या भागात वास्तव्य करावे लागतात त्या भागातील रस्ते अरूंद झाल्याने गावात आता राजस्व अभियानाद्वारे शासकीय अतिक्रमित जागा मोक ळ्या करण्याचे अभियान राबविणे गरजेचे आहे़ प्रत्येक गावातील अतिक्रमण वाढू न देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असते़ त्यासंदर्भात तालुका प्रशासन व पोलिसांचे सहकार्य लागल्यास आम्ही त्यांना मदत करण्यास तयार आहेत़ ग्रामपंचायतीने आता आपली जबाबदारी ओळखून गावांना मोकळा श्वास घेण्यासाठी हे गावातील अतिक्रमण हटवावे.- श्रीकांत घुगे, तहसीलदार, धामणगाव रेल्वे.पंचायत समितीत अशा अतिक्रमणाच्या तक्रारी येताच त्वरित कार्यवाही करण्यात येते़ ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत़ जे ग्रामसेवक सूचनेचे पालन करणार नाही त्यांच्याविरूध्द प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे़- बंडू घुगे,गटविकास अधिकारी, प़ंस़धामणगाव रेल्वे.