शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

रस्ते फुलले, चैतन्य परतले, अर्थचक्राला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST

अमरावती : चार महिन्यांपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेली संचारबंदी बुधवारपासून शिथिल केल्याने बाजारपेठेत चैतन्य परतले आहे. सायंकाळनंतरही रस्ते गर्दीने ...

अमरावती : चार महिन्यांपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेली संचारबंदी बुधवारपासून शिथिल केल्याने बाजारपेठेत चैतन्य परतले आहे. सायंकाळनंतरही रस्ते गर्दीने फुलल्यामुळे बाजारपेठेत चहलपहल वाढली. यामुळे जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झालेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा अनलॉक होण्याची प्रतीक्षा सर्व स्तरात होती. यंदाच्या लग्नसराईचा मुख्य सिझन लॉकडाऊनमध्ये पार बुडाल्याने कापड व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मात्र, आता १२ तासांची मुभा मिळाल्याने या चेहऱ्यांवर आता चैतन्य आले आहे.

मोठे व्यापारीच नव्हे तर लहान दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. दोन महिन्याच्या कठोर निर्बंधानंतर आजचा दिवस हा त्यांच्यासाठी उष:काल ठरला आहे. बिगर जीवनावश्यक दुकानदारांसमोर दुकानाचे भाडे कसे द्यावे, हा प्रश्न निर्माण झाला होता.

सवार्धिक गती कापड उद्योगाला आलेली आहे. विदर्भात पहिल्या क्रमांकावर येथील मार्केट आहे. दुपारनंतर येथे खऱ्या अर्थाने बहर येतो दोन महिन्यापासून व्यवहार बंद, त्याही सुरू झाले तर दुपारी २ च्या आता सर्व बंद करावे लागत होते. आता कालावधी वाढल्याने या व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

कोट

वीज बिलात सूट द्यावी

जिल्हा अनलॉक केल्याबाबत प्रशासनाचे आभार, चार महिन्यांपासून व्यवहार ठप्प आहे. त्यामुळे व्यावासयिकांचे वीजबिल थकलेले आहेत. यात काही प्रमाणात सूट मिळण्याची मागणी आम्ही करीत आहोत.

- पप्पू गगलानी,

सचिव, तखतमल मार्केट असो.

कोट

सीझन संपल्यावर नव्याने सुरुवात

कोरोनाकाळात शासन, प्रशासनाने उल्लेखनीय कार्य केले. यंदाचा हंगाम संपल्यावर आता व्यवसायाची सुरुवात होत आहे. नुकसान झालेलेेच आहे. मात्र, कोरोना नियमांचे पालन करू.

- किशन कोटवानी,

सिटीलॅन्ड सोशल फोरम

कोट

१४ पैकी ६ महिने व्यवसाय बंद

कोरोनाकाळात १४ पैकी सहा महिने व्यवसाय बंद राहिला. दोन्ही वर्षे महत्त्वाच्या वेळी दुकाने बंद ठेवावे लागल्याने मोठे नुकसान झाले. आता नव्या जोमाने व्यवसाय करू.

- विजय भुतडा,

अध्यक्ष, बिझिलॅन्ड असोसीएशन