शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियान फार्स !

By admin | Updated: January 23, 2016 00:42 IST

दहा ते २४ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे; ...

अमरावती : दहा ते २४ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे; तथापि वाहतूक विभाग, एसटी, आरटीओ, शाळा, शासकीय रुग्णालये वगळता इतरांनी मात्र या अभियानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. रस्ता सुरक्षा अभियानात राज्य शासनाने शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, केमिकल कंपनीचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन आरोग्य विभाग, शिक्षण, वाहनचालक, टॅक्सी संघटना, आॅटोरिक्षा संघटना, हॉटेल मालक, वाहतूक संघटनांचे पदाधिकारी, प्राथमिक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा सहभाग अनिवार्य केला आहे. प्रत्यक्षात मात्र शहर आणि ग्रामीण पोलीस दल, प्रादेशिक परिवहन विभाग, मोजक्या शाळा, इर्विनचे दोन-चार डॉक्टर आणि वाहनचालकांचाच या सुरक्षा अभियानात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येत आहे. निदान महापालिकेने तरी या पंधरवड्यात वाहतूक विभागाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, पालिकेने शहरात कुठेही रस्त्यांवर पांढरे पट्टे मारले नाहीत. धोक्याचे इशारे देणारे फलकही लावलेले नाहीत. याशिवाय संबंधित विभागाने रस्ता दुभाजकांची दुरुस्तीही केलेली नाही. एसटी महामंडळाचे अधिकारी त्यांची स्वतंत्र यंत्रणा राबवून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करीत आहेत. अमरावती जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सुरक्षा अभियानापासून कोसो दूर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता सुरक्षा अभियानाचे काहीच देणेघेणे असल्याचे दिसत नाही मग, रस्ता सुरक्षा अभियानाची अंमलबजावणीची जबाबदारी फक्त आमच्याच विभागाची आहे का, हा वाहतूक शाखेने उपस्थित केलेला प्रश्नच या अभियानाचे वास्तव मांडण्यास पुरेसा आहे. वाहनचालकांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम महापालिकेकडे जाते. मात्र, रस्त्यावर साधे पट्टे मारण्याची तसदीही महापालिका प्रशासन घेत नाही, हे या अभियानाच्या निमित्ताने उघड झाले. दरवर्षी वाहन अपघतात शेकडो, हजारोंचे बळी जातात. सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाते. मात्र, या पार्श्वभूमिवर सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाबाबत अनेक विभागांना फारशी आस्था नसल्याचे दिसत आहे.