शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

रस्ता सुरक्षा अभियान फार्स !

By admin | Updated: January 23, 2016 00:42 IST

दहा ते २४ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे; ...

अमरावती : दहा ते २४ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे; तथापि वाहतूक विभाग, एसटी, आरटीओ, शाळा, शासकीय रुग्णालये वगळता इतरांनी मात्र या अभियानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. रस्ता सुरक्षा अभियानात राज्य शासनाने शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, केमिकल कंपनीचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन आरोग्य विभाग, शिक्षण, वाहनचालक, टॅक्सी संघटना, आॅटोरिक्षा संघटना, हॉटेल मालक, वाहतूक संघटनांचे पदाधिकारी, प्राथमिक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा सहभाग अनिवार्य केला आहे. प्रत्यक्षात मात्र शहर आणि ग्रामीण पोलीस दल, प्रादेशिक परिवहन विभाग, मोजक्या शाळा, इर्विनचे दोन-चार डॉक्टर आणि वाहनचालकांचाच या सुरक्षा अभियानात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येत आहे. निदान महापालिकेने तरी या पंधरवड्यात वाहतूक विभागाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, पालिकेने शहरात कुठेही रस्त्यांवर पांढरे पट्टे मारले नाहीत. धोक्याचे इशारे देणारे फलकही लावलेले नाहीत. याशिवाय संबंधित विभागाने रस्ता दुभाजकांची दुरुस्तीही केलेली नाही. एसटी महामंडळाचे अधिकारी त्यांची स्वतंत्र यंत्रणा राबवून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करीत आहेत. अमरावती जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सुरक्षा अभियानापासून कोसो दूर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता सुरक्षा अभियानाचे काहीच देणेघेणे असल्याचे दिसत नाही मग, रस्ता सुरक्षा अभियानाची अंमलबजावणीची जबाबदारी फक्त आमच्याच विभागाची आहे का, हा वाहतूक शाखेने उपस्थित केलेला प्रश्नच या अभियानाचे वास्तव मांडण्यास पुरेसा आहे. वाहनचालकांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम महापालिकेकडे जाते. मात्र, रस्त्यावर साधे पट्टे मारण्याची तसदीही महापालिका प्रशासन घेत नाही, हे या अभियानाच्या निमित्ताने उघड झाले. दरवर्षी वाहन अपघतात शेकडो, हजारोंचे बळी जातात. सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाते. मात्र, या पार्श्वभूमिवर सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाबाबत अनेक विभागांना फारशी आस्था नसल्याचे दिसत आहे.