शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, महामार्गांवर अवैध ढाब्यांचा सुळसुळाट

By admin | Updated: June 15, 2016 00:30 IST

जुळ्या शहरातून जाणाऱ्या रस्त्यांवर व राज्य महामार्गावर दिवसेंदिवस अवैध ढाब्यांची वाढ होत आहे. त्यामुळे मागील ...

उभ्या वाहनांमुळे होतात अपघात : अवैध दारुचीही विक्रीसुनील देशपांडे  अचलपूरजुळ्या शहरातून जाणाऱ्या रस्त्यांवर व राज्य महामार्गावर दिवसेंदिवस अवैध ढाब्यांची वाढ होत आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांत सर्वाधिक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला.रस्त्यांना आणि महामार्गांना लागून शहराबाहेर अनेक ढाबे निर्माण झाले आहेत. त्यातील अनेकांना परवाने नाहीत. काहींना केवळ खानावळीचा परवाना असताना तेथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होत असते. तसेच बहुतांश ढाबे रस्त्याला लागूनच असल्याने त्या ढाब्यांच्या जवळपास कितीतरी जड वाहने तासन्तास उभी राहतात. यातील राज्य महामार्ग चिखलदरा रोड, बहिरम रोड, अंजनगाव रोड, रासेगाव रोड आदी रस्त्यांवर अहोरात्र वाहनांची वर्दळ असल्याने रात्री मागून येणारी वाहने या जड वाहनांवर आदळण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा मोठे अपधात होऊन प्राणहानीसुद्धा झाली आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या ढाब्यांवर मद्यप्राशन केल्यानंतर मद्यपी मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर आल्यास भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने अनेकदा त्यांना उडविण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील कित्येक प्रकरणे आपसात मिटविली गेल्याने त्याची नोंद पोलिसात होऊ शकली नाही, अशी माहिती आहे. अचलपूर परतवाडा परिसरात ५० ते ६० ढाबे आहेत. त्यातील बहुतांश रस्त्याला लागूनच आहेत. या मार्गावरील काही ढाब्यांना अन्न प्रशासन विभागाची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे विनापरवाना बिनधास्तपणे सुरु आहेत. काही ढाब्यांवर पोलिसांच्या आशीर्वादाने अवैधरीत्या दारूची विक्री व मादक पदार्थाची सर्रास छुप्या मार्गाने विक्री होत असल्याची चर्चा आहे. काही ढाब्यांचे संचालक गुंड प्रवृत्तीचे असून पोलिसांशी त्यांचे साटेलोटे आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्याची कुणीही हिंमत करीत नाहीत. एखाद्याने आवाज उचलल्यास त्याला बेदम मारहाण करून पद्धतशीरपणे पोलीस कारवाईत अडकविले जात असल्याने कुणीही त्यांच्याविरुध्द 'ब्र' काढण्याचे धाडस दाखवीत नाही.काही दिवसांपूर्वी एका ढाबा संचालकाचा आणि जेवणासाठी आलेल्या दोन व्यक्तींचा पैशांच्या कारणावरून वाद झाला. तेव्हा त्या दोघांना ढाबे संचालक व त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम चोपले होते. ते काही वेळ त्याच्याच ढाब्याबाहेर बेशुद्ध पडले होते. ते दोघेही मद्यधुंद असल्याने पोलिसात जाऊ शकले नाहीत. विशेष म्हणजे या ढाब्यावरअवैध दारू विकली जात असून या ढाबे संचालकाला अभय असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गुप्तचर यंत्रणेमार्फत ढाब्यांवर तपासणी केल्यास सारा प्रकार उजेडात येईल, असे जनतेचे म्हणणे आहे.