शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

रस्ते, महामार्गांवर अवैध ढाब्यांचा सुळसुळाट

By admin | Updated: June 15, 2016 00:30 IST

जुळ्या शहरातून जाणाऱ्या रस्त्यांवर व राज्य महामार्गावर दिवसेंदिवस अवैध ढाब्यांची वाढ होत आहे. त्यामुळे मागील ...

उभ्या वाहनांमुळे होतात अपघात : अवैध दारुचीही विक्रीसुनील देशपांडे  अचलपूरजुळ्या शहरातून जाणाऱ्या रस्त्यांवर व राज्य महामार्गावर दिवसेंदिवस अवैध ढाब्यांची वाढ होत आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांत सर्वाधिक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला.रस्त्यांना आणि महामार्गांना लागून शहराबाहेर अनेक ढाबे निर्माण झाले आहेत. त्यातील अनेकांना परवाने नाहीत. काहींना केवळ खानावळीचा परवाना असताना तेथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होत असते. तसेच बहुतांश ढाबे रस्त्याला लागूनच असल्याने त्या ढाब्यांच्या जवळपास कितीतरी जड वाहने तासन्तास उभी राहतात. यातील राज्य महामार्ग चिखलदरा रोड, बहिरम रोड, अंजनगाव रोड, रासेगाव रोड आदी रस्त्यांवर अहोरात्र वाहनांची वर्दळ असल्याने रात्री मागून येणारी वाहने या जड वाहनांवर आदळण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा मोठे अपधात होऊन प्राणहानीसुद्धा झाली आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या ढाब्यांवर मद्यप्राशन केल्यानंतर मद्यपी मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर आल्यास भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने अनेकदा त्यांना उडविण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील कित्येक प्रकरणे आपसात मिटविली गेल्याने त्याची नोंद पोलिसात होऊ शकली नाही, अशी माहिती आहे. अचलपूर परतवाडा परिसरात ५० ते ६० ढाबे आहेत. त्यातील बहुतांश रस्त्याला लागूनच आहेत. या मार्गावरील काही ढाब्यांना अन्न प्रशासन विभागाची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे विनापरवाना बिनधास्तपणे सुरु आहेत. काही ढाब्यांवर पोलिसांच्या आशीर्वादाने अवैधरीत्या दारूची विक्री व मादक पदार्थाची सर्रास छुप्या मार्गाने विक्री होत असल्याची चर्चा आहे. काही ढाब्यांचे संचालक गुंड प्रवृत्तीचे असून पोलिसांशी त्यांचे साटेलोटे आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्याची कुणीही हिंमत करीत नाहीत. एखाद्याने आवाज उचलल्यास त्याला बेदम मारहाण करून पद्धतशीरपणे पोलीस कारवाईत अडकविले जात असल्याने कुणीही त्यांच्याविरुध्द 'ब्र' काढण्याचे धाडस दाखवीत नाही.काही दिवसांपूर्वी एका ढाबा संचालकाचा आणि जेवणासाठी आलेल्या दोन व्यक्तींचा पैशांच्या कारणावरून वाद झाला. तेव्हा त्या दोघांना ढाबे संचालक व त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम चोपले होते. ते काही वेळ त्याच्याच ढाब्याबाहेर बेशुद्ध पडले होते. ते दोघेही मद्यधुंद असल्याने पोलिसात जाऊ शकले नाहीत. विशेष म्हणजे या ढाब्यावरअवैध दारू विकली जात असून या ढाबे संचालकाला अभय असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गुप्तचर यंत्रणेमार्फत ढाब्यांवर तपासणी केल्यास सारा प्रकार उजेडात येईल, असे जनतेचे म्हणणे आहे.