शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दळणवळणासाठी जीवनवाहिनी असलेला रस्ता रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST

फोटो पी ०६ चेचरवाडी पान ३ ची बॉटम भातकुली : तालुक्यातील उत्तरेकडील अनेक गावांना भातकुली शहराशी जोडणाऱ्या चेचरवाडी-धामोरी या ...

फोटो पी ०६ चेचरवाडी

पान ३ ची बॉटम

भातकुली : तालुक्यातील उत्तरेकडील अनेक गावांना भातकुली शहराशी जोडणाऱ्या चेचरवाडी-धामोरी या अतिशय महत्त्वाच्या रस्त्याचे काम भातकुलीजवळ रखडल्याने या रस्ता निर्मितीच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. तालुक्यातील लोकांची जीवनवाहिनी असलेल्या या अतिमहत्त्वाच्या रस्त्याच्या कामाकडे आता शासन-प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

भातकुली शहराच्या उत्तरेकडील अनेक गावांना दळणवळणाच्या दृष्टीने धामोरी ते भातकुली हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. सुमारे पन्नास टक्के गावांतील लोक या मार्गावरून ये-जा करू शकतात. या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात डांबरीकरणाचे काम झाले आहे. मात्र, भातकुलीजवळ सुमारे एक किलोमीटर टप्प्याचे काम रखडल्याने या रस्त्याच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता शेतकरी, तालुक्यातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

पावसाळ्यात मोठी कसरत

भातकुली शहरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती या मार्गावर आहे. पावसाळ्यात रखडलेल्या एक किलोमीटर रस्त्यावर खूपच चिखल होत असल्याने शेतकऱ्यांना आपला माल १५ ते २० किमी फेरा करून हरताळा मार्गे आणावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोच, अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता

भातकुली तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतर झाल्याने तालुक्यातील उत्तरेकडील बहुतांश गावातील लोकांना भातकुली येथील विविध कार्यालयांत कामाकरिता येण्यासाठी हा अगदी शॉर्टकट मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित करून नागरिकांसाठी दळणवळणाची सोय करण्याची अत्यंत गरज आहे.

शासन, प्रशासनाने घ्यावी दखल

भातकुली ते धामोरी रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, भातकुली गावाजवळ एक किलोमीटर रस्त्याचे काम रखडले आहे. हा रस्ता तालुक्यातील लोकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे यासंदर्भात आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी, विद्यार्थ्यांसह नागरिकांत व्यक्त केली जात आहे.