शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

दळणवळणासाठी जीवनवाहिनी असलेला रस्ता रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST

फोटो पी ०६ चेचरवाडी पान ३ ची बॉटम भातकुली : तालुक्यातील उत्तरेकडील अनेक गावांना भातकुली शहराशी जोडणाऱ्या चेचरवाडी-धामोरी या ...

फोटो पी ०६ चेचरवाडी

पान ३ ची बॉटम

भातकुली : तालुक्यातील उत्तरेकडील अनेक गावांना भातकुली शहराशी जोडणाऱ्या चेचरवाडी-धामोरी या अतिशय महत्त्वाच्या रस्त्याचे काम भातकुलीजवळ रखडल्याने या रस्ता निर्मितीच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. तालुक्यातील लोकांची जीवनवाहिनी असलेल्या या अतिमहत्त्वाच्या रस्त्याच्या कामाकडे आता शासन-प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

भातकुली शहराच्या उत्तरेकडील अनेक गावांना दळणवळणाच्या दृष्टीने धामोरी ते भातकुली हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. सुमारे पन्नास टक्के गावांतील लोक या मार्गावरून ये-जा करू शकतात. या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात डांबरीकरणाचे काम झाले आहे. मात्र, भातकुलीजवळ सुमारे एक किलोमीटर टप्प्याचे काम रखडल्याने या रस्त्याच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता शेतकरी, तालुक्यातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

पावसाळ्यात मोठी कसरत

भातकुली शहरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती या मार्गावर आहे. पावसाळ्यात रखडलेल्या एक किलोमीटर रस्त्यावर खूपच चिखल होत असल्याने शेतकऱ्यांना आपला माल १५ ते २० किमी फेरा करून हरताळा मार्गे आणावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोच, अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता

भातकुली तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतर झाल्याने तालुक्यातील उत्तरेकडील बहुतांश गावातील लोकांना भातकुली येथील विविध कार्यालयांत कामाकरिता येण्यासाठी हा अगदी शॉर्टकट मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित करून नागरिकांसाठी दळणवळणाची सोय करण्याची अत्यंत गरज आहे.

शासन, प्रशासनाने घ्यावी दखल

भातकुली ते धामोरी रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, भातकुली गावाजवळ एक किलोमीटर रस्त्याचे काम रखडले आहे. हा रस्ता तालुक्यातील लोकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे यासंदर्भात आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी, विद्यार्थ्यांसह नागरिकांत व्यक्त केली जात आहे.