शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

वरूड येथे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: November 16, 2015 00:18 IST

विश्रामगृहापासून तर इंदिरा चौकापर्यंत अनेक शाळा महाविद्यालये आहेत. वाहनांची वाढती संख्या आणि पोलीस प्रशासनाचे वाहतुकीवर दुर्लक्ष असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

चौक बनले अपघाताचे केंद्र : प्रशासनाचे नियंत्रण नाहीवरूड : विश्रामगृहापासून तर इंदिरा चौकापर्यंत अनेक शाळा महाविद्यालये आहेत. वाहनांची वाढती संख्या आणि पोलीस प्रशासनाचे वाहतुकीवर दुर्लक्ष असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे अनेक अपघात या मार्गावर घडत आहेत. अनियंत्रित वाहतुकीमुळे पादचाऱ्यांनासुध्दा तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनियंत्रित वाहतुकीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.शहरातील शासकीय विश्रामगृह, बसस्थानक परिसर, आरटीओ तपासणी नाका, पांढुर्णा चौक, जायन्टस चौक, इंदिरा चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. आरटीओ तपासणी नाक्यासमोर पांढुर्णा आणि अमरावतीकडून येणारी जड वाहने येतात. राज्य महामार्गावरून गतिमर्यादित न ठेवता भरधाव वाहने ेजात असल्याने अनेक दुचाकीचे अपघात याच चौकात झाल्याने अनेकांना अपंगत्व आले आहे. अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गतिरोधकाची मागणी करूनही गतिरोधक लावण्यात आले नाही. राज्य महामार्गावर महात्मा फुले महाविद्यालय, महिला महाविद्यालय, न्यू.आॅरेंजसिटी कॉन्व्हेंट, न्यू, इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल, आयएमएस महाविद्यालय, एन.टी.आर. हायस्कूल, एवढेच नव्हे, तर अनेक शिकवणी वर्ग याच मार्गावर होत आहेत.दरदिवसाला १० ते १२ हजार विद्यार्थ्यांची वर्दळ असते. परंतु वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे. आरटीओ चौक परिसर आणि पांढुर्णा चौक, जायन्ट्स चौक अपघाताचे स्थळ बनले आहे. महिन्याकाठी १० ते १५ अपघात येथे घडतात. काहींची नोंद पोलीस ठाण्यात होते, तर काही आपसी तडजोड करून निघून जातात. या चौकात गतिरोधक लावण्याकरिता पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली. परंतु अद्यापही तो दिवस उजाडला नाही. जिल्हास्तरीय समिती याबाबत निर्णय घेत नसल्याने गतिरोधकाचा प्रश्न रखडला आहे. (तालुका प्रतिनिधी)