शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

वरूड येथे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: November 16, 2015 00:18 IST

विश्रामगृहापासून तर इंदिरा चौकापर्यंत अनेक शाळा महाविद्यालये आहेत. वाहनांची वाढती संख्या आणि पोलीस प्रशासनाचे वाहतुकीवर दुर्लक्ष असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

चौक बनले अपघाताचे केंद्र : प्रशासनाचे नियंत्रण नाहीवरूड : विश्रामगृहापासून तर इंदिरा चौकापर्यंत अनेक शाळा महाविद्यालये आहेत. वाहनांची वाढती संख्या आणि पोलीस प्रशासनाचे वाहतुकीवर दुर्लक्ष असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे अनेक अपघात या मार्गावर घडत आहेत. अनियंत्रित वाहतुकीमुळे पादचाऱ्यांनासुध्दा तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनियंत्रित वाहतुकीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.शहरातील शासकीय विश्रामगृह, बसस्थानक परिसर, आरटीओ तपासणी नाका, पांढुर्णा चौक, जायन्टस चौक, इंदिरा चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. आरटीओ तपासणी नाक्यासमोर पांढुर्णा आणि अमरावतीकडून येणारी जड वाहने येतात. राज्य महामार्गावरून गतिमर्यादित न ठेवता भरधाव वाहने ेजात असल्याने अनेक दुचाकीचे अपघात याच चौकात झाल्याने अनेकांना अपंगत्व आले आहे. अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गतिरोधकाची मागणी करूनही गतिरोधक लावण्यात आले नाही. राज्य महामार्गावर महात्मा फुले महाविद्यालय, महिला महाविद्यालय, न्यू.आॅरेंजसिटी कॉन्व्हेंट, न्यू, इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल, आयएमएस महाविद्यालय, एन.टी.आर. हायस्कूल, एवढेच नव्हे, तर अनेक शिकवणी वर्ग याच मार्गावर होत आहेत.दरदिवसाला १० ते १२ हजार विद्यार्थ्यांची वर्दळ असते. परंतु वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे. आरटीओ चौक परिसर आणि पांढुर्णा चौक, जायन्ट्स चौक अपघाताचे स्थळ बनले आहे. महिन्याकाठी १० ते १५ अपघात येथे घडतात. काहींची नोंद पोलीस ठाण्यात होते, तर काही आपसी तडजोड करून निघून जातात. या चौकात गतिरोधक लावण्याकरिता पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली. परंतु अद्यापही तो दिवस उजाडला नाही. जिल्हास्तरीय समिती याबाबत निर्णय घेत नसल्याने गतिरोधकाचा प्रश्न रखडला आहे. (तालुका प्रतिनिधी)