शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

रस्ता अपघातात ६६४ सापांचा चिरडून मृत्यू

By admin | Updated: July 17, 2017 00:14 IST

आॅगस्ट २०१६ ते १० जुलै २०१७ या कालावधीत सर्पमित्रांनी केलेल्या सर्वेक्षणात रस्ता अपघातात वाहनांखाली चिरडून

सर्पमित्रांचे सर्वेक्षण : वर्षभराची आकडेवारी, वडाळी मार्गावर सर्वाधिक घटनालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आॅगस्ट २०१६ ते १० जुलै २०१७ या कालावधीत सर्पमित्रांनी केलेल्या सर्वेक्षणात रस्ता अपघातात वाहनांखाली चिरडून जिल्ह्यातील ६६४ सापांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भातील सापांच्या मृत्यूच्या नोंदी घेऊन ते वसा ग्रुपच्या माध्यमातून ब्रेक फॉर स्नेक या प्रकल्पाला देण्यात आला आहे. वातावरणात सतत बदल होत असल्याने प्रत्येक सजीवाला त्यांच्या राहणीमानात करावा लागत आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला वातावरणात अतुलनीय बदल घडून येतात. यातून भूगर्भाच्या आंतरिक तापमानातून वाढ झाल्याने बिळात राहणारे प्राणी कोरड्या वातारणाच्या शोधात बाहेर पडतात. अशातच साप व इतर सरपटणाऱ्या प्राणी डांबरी रस्त्याचावर येऊन चिरडल्या जातात, असे मत सर्पमित्र भूषण सायंके यांनी व्यक्त केले. बडनेरा - यवतमाळ मार्गावर ४६ सापांचा अपघातात मृत्यू झाला आहे. वडाळी - चांदूररेल्वे मार्गावर २२८ साप मृत्यूमुखी पडलेत. दस्तुरनगर चौक ते उतखेड मार्गावर १८७, विद्यापीठ ते केकतपूर रस्त्यावर ३८,पंचवटीचौक ते नांदगाव मार्गावर ५६, काठोरा नाका ते वलगाव १०९, आदी ठिकाणी रस्ता अपघातात सांपाचा बळी गेला आहे. सदर सर्वेक्षण हे सर्पमित्र अभिदानी, अक्षय चांबटकर, शुभम सायंके, गणेश अकर्ते,रत्नदीप वानखडे, मुकेल वाघमारे, प्रतिक तिवारी, धिरज शिंदे, ऋषिकेश देशमुख, सायलस शिंदे, सुरज लव्हाळे, जय सोहणे, अनिकेत देशमुख आदींनी केले आहे.