शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अतिउष्णतेमुळे संत्रा फळांच्या गळतीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 05:00 IST

तालुक्यात ८२० हेक्टर संत्रा फळबाग आहे. आंबिया बहराची आवळ्याच्या आकाराची फळे झाडावर आहेत.  हवामानात बदल होऊन उष्णतामान वाढल्याने संत्रा फळे गळत आहे.  या शेतकऱ्यानी हवामानावर आधारित पीक विमा काढला आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम फळे व पिकांवर होत असून, संत्रा बागायतदार हवालदिल झाले आहेत. या बदलामुळे आंब्याचा मोहोर व फळांची गळती होत आहे.

ठळक मुद्देनांदगाव खंडेश्वरमधील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : संत्राबागेतील आंबिया बहराची फळे अतिउष्णतेमुळे गळत आहे. १५ दिवसांपूर्वी तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे उष्णतामान कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता. पण, आता एकाएकी उष्णतामान वाढल्याने हवामानातील या बदलातील परिणामामुळे संत्रा झाडावरील फळे गळत आहे.तालुक्यात ८२० हेक्टर संत्रा फळबाग आहे. आंबिया बहराची आवळ्याच्या आकाराची फळे झाडावर आहेत.  हवामानात बदल होऊन उष्णतामान वाढल्याने संत्रा फळे गळत आहे.  या शेतकऱ्यानी हवामानावर आधारित पीक विमा काढला आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम फळे व पिकांवर होत असून, संत्रा बागायतदार हवालदिल झाले आहेत. या बदलामुळे आंब्याचा मोहोर व फळांची गळती होत आहे. या वातावरणामुळे खरबूज व टरबुजावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. बदलते हवामान भाजीपाला, फळे व पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. विदर्भात सध्या गहू व हरभरा पिकांची काढणी सुरू आहे. जवळपास ७० टक्के काढणी झाली आहे. उर्वरित ३० टक्के पिकाला याचा फटका बसत आहे. शासनाने या शेतकऱ्यांचा विचार करण्याची मागणी होत आहे.

येणस येथील शिवारात पाच एकर संत्राबाग आहे. त्यावर आवळ्याच्या आकाराची आंबिया बहराची संत्री फळे आहे. अतिउष्ण तापमानामुळे झाडावरची फळे गळत आहे. जवळपास झाडावरील अर्धा फळांचा माल गळाला. तालुक्यातील संत्राबागांतील जवळपास हीच परिस्थिती आहे.- मनोज कडू, शेतकरी, येनस

 

टॅग्स :agricultureशेती