शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

कोरोनाकाळात जिल्ह्यात वाढतोय बालविवाहाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

२९ विवाह रोखण्यात यश। ११ प्रकरणात गुन्हा दाखल अमरावती : कोरोनाकाळात धूमधडाक्याने होणाऱ्या लग्न सोहळ्यावर निबंध असताना, दुसरीकडे बालविवाह ...

२९ विवाह रोखण्यात यश। ११ प्रकरणात गुन्हा दाखल

अमरावती : कोरोनाकाळात धूमधडाक्याने होणाऱ्या लग्न सोहळ्यावर निबंध असताना, दुसरीकडे बालविवाह लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मार्च २०२० आतापर्यंत २९ बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीला यश आले आहे. यामध्ये ११ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गतवर्षापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनमुळे लग्न सोहळ्यांवर निर्बंध आले आहेत. मोजक्याच मंडळीच्या उपस्थितीत विवाह होत असल्याने अनेक ठिकाणी बालविवाह घडत आहेत. गावपातळीवर अल्पवयीन प्रेमप्रकरण हीसुद्धा बालविवाहाचे नवे कारण ठरत आहे. काही ठिकाणी निरक्षरता आणि आर्थिक विवंचना यातून पालकांनी आपल्या मुलीचे लग्न उरकून टाकले. आर्थिक ओझे कमी होईल, या कारणांनी विवाह सोहळे पार पडली जात आहेत. मागील दीड वर्षात २९ बाल विवाह रोखण्यात बाल संरक्षण विभागाला यश आले आहे, तर ११ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉक्स

एकूण हजेरी - ४७४९

मुले - २१००

मुली - २६४९

बॉक्स

किती शाळा सुरू - १८२

किती अध्याय बंद - ५६६

बॉक्स

पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे?

नुकत्याच उघडलेल्या शाळांमध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत पटसंख्येत कमालीची घट झाली आहे. विशेषत: यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे. त्यामुळे पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉक्स

अल्पवयीन मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र

१८ वर्षांखालील मुलींचे व २१ वर्षांखालील मुलांचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. यानंतरही काही पालकांनी आपल्या मुलीचा विवाह पार पडले. यामुळे बहुतांश ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसून येते.

बॉक्स

आर्थिक विवंचना हेच कारण

बालविवाह पार पाडण्याच्या मागे विविध कारणे आहेत. परंतु, लॉकडाऊनमध्ये अनेक जण बेरोजगार झाले. त्यामुळे मुलींच्या विवाहाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचार करीत लग्न लावून देण्याचे प्रकार समोर आले आहेत.

कोट

लॉकडाऊनच्या काळात २९ बालविवाह थांबविण्यात आम्हाला यश आले असून, बालविवाह होऊच नयेत, याकरिता आम्ही सूूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक महसुली गावात आम्ही आमच्या गावात बालविवाह होऊच देणार नाही. अशा प्रकारचे ठराव ग्राम बाल संरक्षण समितीकडून घेण्याचे काम सुरू आहेत. यामुळे निश्चितच जिल्ह्यात बालविवाहाला आळा बसेल.

- अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, अमरावती

कोट

बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. सदर अधिनियमाची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे काम जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून सुरू आहे.

- अतुल भंडागे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, अमरावती