शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

कोरोनाकाळात जिल्ह्यात वाढतोय बालविवाहाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

२९ विवाह रोखण्यात यश। ११ प्रकरणात गुन्हा दाखल अमरावती : कोरोनाकाळात धूमधडाक्याने होणाऱ्या लग्न सोहळ्यावर निबंध असताना, दुसरीकडे बालविवाह ...

२९ विवाह रोखण्यात यश। ११ प्रकरणात गुन्हा दाखल

अमरावती : कोरोनाकाळात धूमधडाक्याने होणाऱ्या लग्न सोहळ्यावर निबंध असताना, दुसरीकडे बालविवाह लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मार्च २०२० आतापर्यंत २९ बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीला यश आले आहे. यामध्ये ११ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गतवर्षापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनमुळे लग्न सोहळ्यांवर निर्बंध आले आहेत. मोजक्याच मंडळीच्या उपस्थितीत विवाह होत असल्याने अनेक ठिकाणी बालविवाह घडत आहेत. गावपातळीवर अल्पवयीन प्रेमप्रकरण हीसुद्धा बालविवाहाचे नवे कारण ठरत आहे. काही ठिकाणी निरक्षरता आणि आर्थिक विवंचना यातून पालकांनी आपल्या मुलीचे लग्न उरकून टाकले. आर्थिक ओझे कमी होईल, या कारणांनी विवाह सोहळे पार पडली जात आहेत. मागील दीड वर्षात २९ बाल विवाह रोखण्यात बाल संरक्षण विभागाला यश आले आहे, तर ११ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉक्स

एकूण हजेरी - ४७४९

मुले - २१००

मुली - २६४९

बॉक्स

किती शाळा सुरू - १८२

किती अध्याय बंद - ५६६

बॉक्स

पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे?

नुकत्याच उघडलेल्या शाळांमध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत पटसंख्येत कमालीची घट झाली आहे. विशेषत: यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे. त्यामुळे पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉक्स

अल्पवयीन मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र

१८ वर्षांखालील मुलींचे व २१ वर्षांखालील मुलांचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. यानंतरही काही पालकांनी आपल्या मुलीचा विवाह पार पडले. यामुळे बहुतांश ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसून येते.

बॉक्स

आर्थिक विवंचना हेच कारण

बालविवाह पार पाडण्याच्या मागे विविध कारणे आहेत. परंतु, लॉकडाऊनमध्ये अनेक जण बेरोजगार झाले. त्यामुळे मुलींच्या विवाहाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचार करीत लग्न लावून देण्याचे प्रकार समोर आले आहेत.

कोट

लॉकडाऊनच्या काळात २९ बालविवाह थांबविण्यात आम्हाला यश आले असून, बालविवाह होऊच नयेत, याकरिता आम्ही सूूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक महसुली गावात आम्ही आमच्या गावात बालविवाह होऊच देणार नाही. अशा प्रकारचे ठराव ग्राम बाल संरक्षण समितीकडून घेण्याचे काम सुरू आहेत. यामुळे निश्चितच जिल्ह्यात बालविवाहाला आळा बसेल.

- अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, अमरावती

कोट

बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. सदर अधिनियमाची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे काम जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून सुरू आहे.

- अतुल भंडागे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, अमरावती