शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

अंगणवाडीत रंगला उंदीर-नागिणीचा खेळ

By admin | Updated: September 17, 2016 00:28 IST

मेळघाटातील शाळा व अंगणवाडी केंद्राच्या इमारती वेळेपूर्वीच जिर्ण होत असल्याने त्यामध्ये साप, उंदीर, घुशी आदी सरपटणारे प्राणी निघत असल्याचे नित्याचे झाले आहे.

चिमुकल्यांमध्ये दहशत : मेळघाटच्या कालापाणी येथील घटनानरेंद्र जावरे  परतवाडामेळघाटातील शाळा व अंगणवाडी केंद्राच्या इमारती वेळेपूर्वीच जिर्ण होत असल्याने त्यामध्ये साप, उंदीर, घुशी आदी सरपटणारे प्राणी निघत असल्याचे नित्याचे झाले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता चिखलदरा तालुक्याच्या कालापाणी गावातील अंगणवाडी केंद्रात नागिण आणि उंदीराचा खेळ अर्धा तास रंगला.चिखलदरा तालुक्यातील कालापाणी गावात अंगणवाडी केंद्रात नेहमीप्रमाणे मुले उसळ, खिचडीसह बडबड गिते आणि खेळण्यासाठी आली होती. अंगणवाडी सेविका पार्वती भुसूम पोषण आहाराच्या कामात व्यस्त असताना अचानक चिमुकल्या मुलांचा अंगणवाडी केंद्रात हलकल्लोळ माजला. जीवाच्या आतंकाने धावत सुटलेला उंदीर त्याचा पाठलाग करीत असलेली नागिण आणि त्यामागे ओरडत सुटलेली मुले, असा काहीसा हा क्षण होता. विद्यार्थ्यांचा गलबला ऐकून अंगणवाडी सेविका पार्वती भुसूम तेथे पोहचल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी क्षणाचा विलंब न करता त्या नागिणला काठ्यांनी मारुन ठार केले. गावकऱ्यांपुढेच नागिणीने शेवटच्या प्रयत्नात उंदीराला तोंडात पकडण्यात यश मिळविले होते. मात्र दुसऱ्याच क्षणात तोंडात उंदराची पकडलेली शिकार पोटात जाण्यापूर्वीच त्याला जीव गमवावा लागला. आदिवासींमध्ये संतापअंगणवाडी केंद्राची नवीन इमारत दोन वर्षापूर्वीच नवीन बांधण्यात आली. मात्र निकृष्ठ कामामुळे ती वेळेपूर्वीच जिर्ण झाली. यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी दिल्या. मात्र प्रशासनाच्या कमिशनखोर वृत्तीमुळे त्यांचा आवाज दाबण्यात आल्याचे नामदेव धांडे, अनिल बेलसरे, रामलाल धांडे, पुंडलिक सुरले, विलास, विजय बेलसरे, विनोद भुसूम, विकास झाडखंडे, प्रवीण बेलसरे आदी संतप्त आदिवासींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बदनापुरची पुनरावृत्ती गत महिन्यात बदनापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात चक्क नागराजाने दर्शन दिले होते. त्यानंतर सुद्धा अंगणवाडी आणि शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत.धान्यामुळे उंदीर-सापांचा सुळसुळाटकालापाणी अंगणवाडी केंद्राचा परिसर स्वच्छ नव्हता तर इमारतीला ठिकठिकाणी छिद्र पडलेली होती. दुसरीकडे अंगणवाडी केंद्रामध्ये चवळी, मटकीसह उसळ, खिचडीचा तांदूळ आदी धान्यसाठा ठेवण्यात येतो त्यासाठी उंदराचा शिरकाव आणि उंदराची शिकार करून सापांचे राज्य अशी अन्नसाखळी मेळघाटातील चिमुकल्यासाठी जिवघेणी ठरली आहे. चिखलदरा आणि धारणी अशा दोन्ही तालुक्यातील आश्रम शाळा आणि वसतीगृहांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात कालापाणीच सारखीच आहे.