शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

अंगणवाडीत रंगला उंदीर-नागिणीचा खेळ

By admin | Updated: September 17, 2016 00:28 IST

मेळघाटातील शाळा व अंगणवाडी केंद्राच्या इमारती वेळेपूर्वीच जिर्ण होत असल्याने त्यामध्ये साप, उंदीर, घुशी आदी सरपटणारे प्राणी निघत असल्याचे नित्याचे झाले आहे.

चिमुकल्यांमध्ये दहशत : मेळघाटच्या कालापाणी येथील घटनानरेंद्र जावरे  परतवाडामेळघाटातील शाळा व अंगणवाडी केंद्राच्या इमारती वेळेपूर्वीच जिर्ण होत असल्याने त्यामध्ये साप, उंदीर, घुशी आदी सरपटणारे प्राणी निघत असल्याचे नित्याचे झाले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता चिखलदरा तालुक्याच्या कालापाणी गावातील अंगणवाडी केंद्रात नागिण आणि उंदीराचा खेळ अर्धा तास रंगला.चिखलदरा तालुक्यातील कालापाणी गावात अंगणवाडी केंद्रात नेहमीप्रमाणे मुले उसळ, खिचडीसह बडबड गिते आणि खेळण्यासाठी आली होती. अंगणवाडी सेविका पार्वती भुसूम पोषण आहाराच्या कामात व्यस्त असताना अचानक चिमुकल्या मुलांचा अंगणवाडी केंद्रात हलकल्लोळ माजला. जीवाच्या आतंकाने धावत सुटलेला उंदीर त्याचा पाठलाग करीत असलेली नागिण आणि त्यामागे ओरडत सुटलेली मुले, असा काहीसा हा क्षण होता. विद्यार्थ्यांचा गलबला ऐकून अंगणवाडी सेविका पार्वती भुसूम तेथे पोहचल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी क्षणाचा विलंब न करता त्या नागिणला काठ्यांनी मारुन ठार केले. गावकऱ्यांपुढेच नागिणीने शेवटच्या प्रयत्नात उंदीराला तोंडात पकडण्यात यश मिळविले होते. मात्र दुसऱ्याच क्षणात तोंडात उंदराची पकडलेली शिकार पोटात जाण्यापूर्वीच त्याला जीव गमवावा लागला. आदिवासींमध्ये संतापअंगणवाडी केंद्राची नवीन इमारत दोन वर्षापूर्वीच नवीन बांधण्यात आली. मात्र निकृष्ठ कामामुळे ती वेळेपूर्वीच जिर्ण झाली. यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी दिल्या. मात्र प्रशासनाच्या कमिशनखोर वृत्तीमुळे त्यांचा आवाज दाबण्यात आल्याचे नामदेव धांडे, अनिल बेलसरे, रामलाल धांडे, पुंडलिक सुरले, विलास, विजय बेलसरे, विनोद भुसूम, विकास झाडखंडे, प्रवीण बेलसरे आदी संतप्त आदिवासींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बदनापुरची पुनरावृत्ती गत महिन्यात बदनापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात चक्क नागराजाने दर्शन दिले होते. त्यानंतर सुद्धा अंगणवाडी आणि शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत.धान्यामुळे उंदीर-सापांचा सुळसुळाटकालापाणी अंगणवाडी केंद्राचा परिसर स्वच्छ नव्हता तर इमारतीला ठिकठिकाणी छिद्र पडलेली होती. दुसरीकडे अंगणवाडी केंद्रामध्ये चवळी, मटकीसह उसळ, खिचडीचा तांदूळ आदी धान्यसाठा ठेवण्यात येतो त्यासाठी उंदराचा शिरकाव आणि उंदराची शिकार करून सापांचे राज्य अशी अन्नसाखळी मेळघाटातील चिमुकल्यासाठी जिवघेणी ठरली आहे. चिखलदरा आणि धारणी अशा दोन्ही तालुक्यातील आश्रम शाळा आणि वसतीगृहांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात कालापाणीच सारखीच आहे.