लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शेतकºयांनी केलेल्या आत्महत्या या आत्महत्या नसून शासनाच्या धोरणाने त्यांची हत्या केली आहे. सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे. यामुळे शेतकºयांनी आता एकजूट व्हावे व शासनाच्या धोरणाचा विरोध करावा. तेव्हाच शेतकºयांचे अच्छे दिन येतील. शासनाने कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखविले आहे, अशी टीका अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केली.ते दर्यापूर तालुक्यातील भुईखेड येथे एका जनसभेत शेतकºयांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी भुईखेड येथे प्रहार जनशक्ती शाखेचे उद्घाटन करण्यात आले. जनसेभेदरम्यान त्यानी शेतकºयांच्या प्रश्नावर सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. रयतेला एकत्र येण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला तालुक्यातील म्हैसांग, करतखेळा, रुस्तनपूर, चांदोळा, लासूर, रामतीर्थ परिसरातील जनसमुदाय जमला होता.दर्यापूर तालुका प्रहार सचिव अनुराग मानकर, तालुका अध्यक्ष सुधीर पवित्रकार, सुरेश मानकर, ज्ञानेश्वर खंडारे, बाबूरावजी लोडम, राजूभाऊ दमे, दादाराव खेडकर, अनुप गावंडे, उज्वल खेडकर, आशीष उमाळे, विजय टिवर, बालकिसन चव्हाण, शरद पवार, देवा खेडकर, नितीन लोडम, शरद लोडम, सचिन गावंडे, रितेश काळे, बबन मानकर, विजय मानकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख महेश कुरळकर यांनी केले, तर प्रास्ताविक आगरकर यांनी केले.
शेतकºयांनी एकजूट होण्याची हीच योग्य वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:38 IST
शेतकºयांनी केलेल्या आत्महत्या या आत्महत्या नसून शासनाच्या धोरणाने त्यांची हत्या केली आहे. सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे.
शेतकºयांनी एकजूट होण्याची हीच योग्य वेळ
ठळक मुद्देबच्चू कडू : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीकास्त्र