शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

माहिती अधिकार बनला ‘वसुली’चा फंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST

धामणगाव रेल्वे : ग्रामीण भागातील रहिवासी नाही तथा ग्रामपंचायतीच्या विकासात कोणत्याही सहभाग नाही. तथापि, शहरात राहून तालुक्यातील सर्वच ...

धामणगाव रेल्वे : ग्रामीण भागातील रहिवासी नाही तथा ग्रामपंचायतीच्या विकासात कोणत्याही सहभाग नाही. तथापि, शहरात राहून तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये माहितीच्या अधिकारान्वये अर्ज टाकून ‘वसुली’चे नवे तंत्र वापरले जात असल्याने ग्रामपंचायती, पंचायत समिती व महसूल विभाग त्रस्त झाला आहे. दरम्यान, कक्षेत बसत नसलेली माहिती ही माहिती अधिकारात न मिळाल्याने खंडणीची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे. या मूठभर लोकांपायी चांगले माहिती अधिकार कार्यकर्तेदेखील बदनाम होत आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांमुळे सर्वांत प्रथम राज्यात माहिती अधिकार कायदा लागू झाला. केंद्र शासनाने माहिती अधिकार अधिनियम २००५ मध्ये हा कायदा मंजूर केला. राज्यात कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर मात्र काही ठिकाणी कायद्याच्या आधारावर ब्लॅकमेलिंगचा धंदा जोरात सुरू झाला आहे. एखाद्या विषयाची माहिती मागणे, तद्नंतर संबंधित अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना फोन करून त्यांच्यावर दबाव टाकणे, प्रशासकीय यंत्रणेतील संबंधितांना दुप्पट-तिप्पट रकमेची मागणी करणे, दिली नाही तर त्या कर्मचाऱ्यांच्या बदनामीचा प्रयत्न करणे असे सर्रास प्रकार तालुक्यात सुरू आहे.

धामणगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये काहींनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणे सुरू केले आहे. यात आपली डाळ शिजत नसल्याचे दिसताच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बनावट तक्रारी केल्या जात असल्याने अनेक कर्मचारी त्रस्त झाले आहेत. एकीकडे प्रशासकीय काम करावे की वारंवार एकच माहिती ही माहिती अधिकार अंतर्गत द्यावी, असा प्रश्न निर्माण होत आहे. महसूल प्रशासन, पंचायत समिती, कृषी विभाग, सहकारी संस्था कार्यालयात एकाच व्यक्तीचे शेकडो आरटीआय अर्ज असल्याचेही निदर्शनास येत आहे.

राज्य माहिती आयोगाने व्हावे सतर्क

एखाद्या प्रकरणात माहिती न मिळाल्यास राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल करता येते. संबंधित एकच व्यक्ती तालुक्यातील अनेक विभागांत अर्ज दाखल करतो. काही ‘व्यवहार’ न झाल्यास राज्य आयोगाकडे धाव घेतो. संबंधित माहिती सामाजिक कार्यासाठी की वैयक्तिक लाभाकरिता आहे, याची तपासणीही राज्य माहिती आयोगाने सतर्क राहून करणे गरजेचे असल्याचे मत अनेक सामाजिक संस्थांनी व्यक्त केले आहे.

कोट

प्रामाणिकपणे माहिती मागणारे कमी आणि ब्लॅकमेलिंग करणारे जास्त आहे. ज्याचा काही संबंध नाही, तो माहिती मागतो अशा लोकांमुळे मानसिक ताण सहन करावा लागतो.

कमलाकर वनवे

जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक युनियन, अमरावती