शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
3
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
4
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
5
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
6
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
7
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
8
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
9
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?
10
Mumbai on Alert: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
11
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
12
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
13
वॉशिंग्टनमधील मराठी कला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात १५०० भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप 
14
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
15
"चेंगराचेंगरीतून राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही केलं, पण...", 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेलेल्या तुषार कपूरला आला असा अनुभव
16
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
17
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
18
Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक
19
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
20
आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा

माहिती अधिकार बनला ‘वसुली’चा फंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST

धामणगाव रेल्वे : ग्रामीण भागातील रहिवासी नाही तथा ग्रामपंचायतीच्या विकासात कोणत्याही सहभाग नाही. तथापि, शहरात राहून तालुक्यातील सर्वच ...

धामणगाव रेल्वे : ग्रामीण भागातील रहिवासी नाही तथा ग्रामपंचायतीच्या विकासात कोणत्याही सहभाग नाही. तथापि, शहरात राहून तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये माहितीच्या अधिकारान्वये अर्ज टाकून ‘वसुली’चे नवे तंत्र वापरले जात असल्याने ग्रामपंचायती, पंचायत समिती व महसूल विभाग त्रस्त झाला आहे. दरम्यान, कक्षेत बसत नसलेली माहिती ही माहिती अधिकारात न मिळाल्याने खंडणीची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे. या मूठभर लोकांपायी चांगले माहिती अधिकार कार्यकर्तेदेखील बदनाम होत आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांमुळे सर्वांत प्रथम राज्यात माहिती अधिकार कायदा लागू झाला. केंद्र शासनाने माहिती अधिकार अधिनियम २००५ मध्ये हा कायदा मंजूर केला. राज्यात कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर मात्र काही ठिकाणी कायद्याच्या आधारावर ब्लॅकमेलिंगचा धंदा जोरात सुरू झाला आहे. एखाद्या विषयाची माहिती मागणे, तद्नंतर संबंधित अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना फोन करून त्यांच्यावर दबाव टाकणे, प्रशासकीय यंत्रणेतील संबंधितांना दुप्पट-तिप्पट रकमेची मागणी करणे, दिली नाही तर त्या कर्मचाऱ्यांच्या बदनामीचा प्रयत्न करणे असे सर्रास प्रकार तालुक्यात सुरू आहे.

धामणगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये काहींनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणे सुरू केले आहे. यात आपली डाळ शिजत नसल्याचे दिसताच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बनावट तक्रारी केल्या जात असल्याने अनेक कर्मचारी त्रस्त झाले आहेत. एकीकडे प्रशासकीय काम करावे की वारंवार एकच माहिती ही माहिती अधिकार अंतर्गत द्यावी, असा प्रश्न निर्माण होत आहे. महसूल प्रशासन, पंचायत समिती, कृषी विभाग, सहकारी संस्था कार्यालयात एकाच व्यक्तीचे शेकडो आरटीआय अर्ज असल्याचेही निदर्शनास येत आहे.

राज्य माहिती आयोगाने व्हावे सतर्क

एखाद्या प्रकरणात माहिती न मिळाल्यास राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल करता येते. संबंधित एकच व्यक्ती तालुक्यातील अनेक विभागांत अर्ज दाखल करतो. काही ‘व्यवहार’ न झाल्यास राज्य आयोगाकडे धाव घेतो. संबंधित माहिती सामाजिक कार्यासाठी की वैयक्तिक लाभाकरिता आहे, याची तपासणीही राज्य माहिती आयोगाने सतर्क राहून करणे गरजेचे असल्याचे मत अनेक सामाजिक संस्थांनी व्यक्त केले आहे.

कोट

प्रामाणिकपणे माहिती मागणारे कमी आणि ब्लॅकमेलिंग करणारे जास्त आहे. ज्याचा काही संबंध नाही, तो माहिती मागतो अशा लोकांमुळे मानसिक ताण सहन करावा लागतो.

कमलाकर वनवे

जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक युनियन, अमरावती