शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून पीक कर्ज वितरणाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:10 IST

शेतकरी बांधवांची अडवणूक करू नका, संवेदनशीलता बाळगून कामे करण्याचे निर्देश अमरावती : खरीप हंगाम तोंडावर असताना पीक कर्ज ...

शेतकरी बांधवांची अडवणूक करू नका, संवेदनशीलता बाळगून कामे करण्याचे निर्देश

अमरावती : खरीप हंगाम तोंडावर असताना पीक कर्ज वितरण गतीने होणे आवश्यक आहे. कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ असावी. शेतकरी बांधवांची अडवणूक होता कामा नये. बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता बाळगून कामे करावी व कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी खरीप कर्ज वितरणाचा आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, अग्रणी बँक व्यवस्थापक एल.के. झा आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, गतवर्षापासून कोरोना साथीचा कठीण वेळ आला आहे. कृषिक्षेत्र अडचणीत आहे. या काळात खरीप हंगामात बियाणे निविष्ठा व इतर कामांसाठी शेतकरी बांधवांना पीक कर्ज वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संवेदनशीलता बाळगून प्रत्येक गरजू शेतकऱ्याला कर्जाचा लाभ मिळवून द्यावा. पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या शेतकरी बांधवांना संपूर्ण माहिती द्यावी. त्यांना अर्ज मिळण्यासाठी सहकार्य करावे. एकही पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. शेतकरी बांधवांना कर्ज मिळण्यासाठी चकरा माराव्या लागतात, अशाही तक्रारी आहेत. तसे घडू नये. कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ असणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी यापूर्वीच प्रशासनाने दिली आहे. त्याव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे मागू नये. शेतकरी बांधवांची अनावश्यकरीत्या अडवणूक केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बॉक्स

खरीप हंगामासाठी दीड हजार कोटी कर्जाचे उद्दिष्ट

विविध योजनांचा निधी बँकाच्या माध्यमातून लाभार्थींपर्यंत पोहचवला जातो. त्याचे वितरण वेळेत झाले पाहिजे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे पैसे बँकेत येतात, पण ते शेतकरी बांधवांना वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. असे यापुढे कधीही घडता कामा नये, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा खरीपासाठी दीड हजार कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते पूर्ण व्हावे, यादृष्टीने वेगाने कर्ज वितरण करण्याचे निर्देशही पालकमंत्री ठाकूर यांनी दिले.