शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपसंदर्भात आढावा

By admin | Updated: May 29, 2017 00:10 IST

येत्या खरीप हंगामात पीक कर्ज, बी- बियाणे वाटपसंदर्भात खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सांयकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

अधिकाऱ्यांना सूचना : लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या खरीप हंगामात पीक कर्ज, बी- बियाणे वाटपसंदर्भात खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सांयकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पीक कर्जापासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्यात.बैठकीला खा. आनंदराव अडसूळ यांच्यासह आ. वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, माजी आ. संजय बंड, अचलपूरचे नगराध्यक्ष सुनीता फिस्के, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील खराटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, नरेंद्र पडोळे, नाना नागमोते, नगरसेवक नरेंद्र फिस्के, किशोर कासार, बंडु घोम, शोभा लोखंडे, सुनील भालेराव यांच्यासह कृषी, बॅकांचे अधिकार उपस्थित होते. प्रारंभी खासदार अडसूळ यांनी पीक कर्ज, बियाणे संदर्भात प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आणि बँकांचे धोरण यातील माहिती जाणून घेताना एकही शेतकरी यंदा पीक कर्जापासून वंचित राहू नये, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्यात. पीक कर्जासाठी शेतकरी बँकेत आल्यास त्यांच्याशी सौजन्याने वागणूक द्या. बँकेत स्वतंत्र पीक कर्ज सहाय्य कक्ष उघडून मार्गदर्शन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बांगर यांनी बँक अधिकाऱ्यांना दिलेत. ३ टक्के व्याज दराने कर्ज पुरवठ्यातून पात्र शेतकरी वगळू नये, ही बाबदेखील त्यांनी लक्षात आणून दिली. पीक कर्ज वाटप करतावेळी शिबिरातून शेतकरी वंचित राहू नये. पीक कर्जाबाबत प्रचार व प्रसार करण्यासाठी बँकानी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जात वळती करु नये, असे काही उदाहरण समोर आल्यास बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाईल, असेही खा. अडसूळ म्हणाले. जिल्ह्यात बि- बियाणे, रासायनिक खतांची मागणी व पुरवठा याचा आढावा घेताना कृषि अधिकाऱ्यांनी यावेळी बियाणे, खतांचा पुरवठा कमी होणार नाही, ही ग्वाही त्यांनी दिली. तसेच पीक कर्ज नाहकरत प्रमाणपत्रातही शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही. कपाशी, तूर, सोयाबीन आदी बियाणांचा काळाबाजार होणार नाही. त्याकरिता स्वतंत्र पथक गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बांगर यांनी दिलेत. शेतकरी लक्ष ठेवूनच प्रशासनाने भूमिका बजवावी, अशा सूचना खासदार अडसूळ यांनी दिल्यात. दरम्यान कृषि अधिकाऱ्यांनी रासायनिक खताची आवक करताना रेल्वे रॅकचा प्रश्न उपस्थित केला. नरखेड रेल्वे मार्गावर चांदूरबाजार येथे नवीन रेल्वे रॅक निर्माण झाल्यास ग्रामीण भागात खत पुरवठा करतान येणारी अडचण दूर होईल, असे कृषि अधिकारी म्हणाले.