शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पीककर्ज वाटपसंदर्भात आढावा

By admin | Updated: May 29, 2017 00:10 IST

येत्या खरीप हंगामात पीक कर्ज, बी- बियाणे वाटपसंदर्भात खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सांयकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

अधिकाऱ्यांना सूचना : लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या खरीप हंगामात पीक कर्ज, बी- बियाणे वाटपसंदर्भात खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सांयकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पीक कर्जापासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्यात.बैठकीला खा. आनंदराव अडसूळ यांच्यासह आ. वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, माजी आ. संजय बंड, अचलपूरचे नगराध्यक्ष सुनीता फिस्के, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील खराटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, नरेंद्र पडोळे, नाना नागमोते, नगरसेवक नरेंद्र फिस्के, किशोर कासार, बंडु घोम, शोभा लोखंडे, सुनील भालेराव यांच्यासह कृषी, बॅकांचे अधिकार उपस्थित होते. प्रारंभी खासदार अडसूळ यांनी पीक कर्ज, बियाणे संदर्भात प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आणि बँकांचे धोरण यातील माहिती जाणून घेताना एकही शेतकरी यंदा पीक कर्जापासून वंचित राहू नये, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्यात. पीक कर्जासाठी शेतकरी बँकेत आल्यास त्यांच्याशी सौजन्याने वागणूक द्या. बँकेत स्वतंत्र पीक कर्ज सहाय्य कक्ष उघडून मार्गदर्शन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बांगर यांनी बँक अधिकाऱ्यांना दिलेत. ३ टक्के व्याज दराने कर्ज पुरवठ्यातून पात्र शेतकरी वगळू नये, ही बाबदेखील त्यांनी लक्षात आणून दिली. पीक कर्ज वाटप करतावेळी शिबिरातून शेतकरी वंचित राहू नये. पीक कर्जाबाबत प्रचार व प्रसार करण्यासाठी बँकानी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जात वळती करु नये, असे काही उदाहरण समोर आल्यास बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाईल, असेही खा. अडसूळ म्हणाले. जिल्ह्यात बि- बियाणे, रासायनिक खतांची मागणी व पुरवठा याचा आढावा घेताना कृषि अधिकाऱ्यांनी यावेळी बियाणे, खतांचा पुरवठा कमी होणार नाही, ही ग्वाही त्यांनी दिली. तसेच पीक कर्ज नाहकरत प्रमाणपत्रातही शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही. कपाशी, तूर, सोयाबीन आदी बियाणांचा काळाबाजार होणार नाही. त्याकरिता स्वतंत्र पथक गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बांगर यांनी दिलेत. शेतकरी लक्ष ठेवूनच प्रशासनाने भूमिका बजवावी, अशा सूचना खासदार अडसूळ यांनी दिल्यात. दरम्यान कृषि अधिकाऱ्यांनी रासायनिक खताची आवक करताना रेल्वे रॅकचा प्रश्न उपस्थित केला. नरखेड रेल्वे मार्गावर चांदूरबाजार येथे नवीन रेल्वे रॅक निर्माण झाल्यास ग्रामीण भागात खत पुरवठा करतान येणारी अडचण दूर होईल, असे कृषि अधिकारी म्हणाले.