शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धारणीतील रेती तस्करांना महसूलचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST

पान २ ची लिड घोळ उघड, वाहतुकीचे नियम न पाळल्यास कारवाई पंकज लायदे धारणी : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गौण खनिजाची ...

पान २ ची लिड

घोळ उघड, वाहतुकीचे नियम न पाळल्यास कारवाई

पंकज लायदे

धारणी : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गौण खनिजाची वाहतूक करताना मध्यप्रदेश सरकारकडून प्राप्त केलेल्या रॉयल्टीत वाहतुकीचे अंतर व वेळेत प्रचंड घोळ घालून एका रॉयल्टीवर दिवसभरात तीन ते चार ट्रिप अवैधरीत्या रेती वाहतूक सुरू होती. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. त्यावर वाहतुकीचे नियम ठरवून देणारी जाहीर नोटीस तहसीलदारांनी काढली आहे.

धारणीपासून १८ किलोमीटर अंतरावर आंतरराज्यीय सीमा आहे. त्याअनुषंगाने मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गौन खनिज वाहतूक करताना महाखनिज पोर्टलवर नोंदणी करून गौण खनिजांची वाहतून करणे अनिवार्य आहे. त्यानुसारच महाराष्ट्रात रेती वाहतूक करता येते. त्याच्या आधारावर धारणीतील काही रेती तस्करांनी मध्यप्रदेशातील बोगस रॉयल्टीआधारे धारणी तालुक्यात रेती वाहतूक सुरू केली. पण मध्यप्रदेशातील रॉयल्टीत वाहतुकीचे अंतर व वेळेत घोळ निर्माण करून रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले. यासह मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात यायचे असेल तर कोविड तपासणी करूनच यावे लागते, त्याची भोकरबर्डी येथील वनविभागाच्या नाक्यावर नोंद करणे गरजेचे आहे. त्यातही काही रेती तस्करांनी वनविभागाचे नाके मॅनेज केले. त्याबाबत वृत्त प्रकाशित होताच त्याची दखल जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतली. त्यानुसार धारणीचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी रेती तस्करी रोखण्याकरिता जाहीर नोटीस काढली आहे.

बॉक्स

रॉयल्टीतील वेळ, अंतरात होता घोळ

मध्यप्रदेशातील रत्नापूर, देशघाट, मेलचुका, तुकइथड, देडतलाई धारणी हे अंतर २५ किलोमीटर आहे. आणि हे अंतर गाठण्याकरिता वाहनाला फक्त एक तासाचा कालावधी लागतो. परंतु, मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर रत्नापूर ते अमरावती धारणी हे अंतर १५८ ते १६० किलोमीटरचे आहे. ते गाठण्याकरिता आठ तासांचा कालावधी लागतो. असा घोळ करून धारणीतील रेती तस्कर वनविभागाचे नाके मॅनेज करून व महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून रेती वाहतूक करीत होते. याकडे प्रसार माध्यमांनी लक्ष दिल्यानंतरच तहसीलदारांनी रेती वाहतुकीवर निर्बंध लावण्याकरिता जाहीर नोटीस काढली आहे.

बॉक्स

कव्हर देत करत होते रेती वाहतूक

धारणीतील रेती तस्कर मध्यप्रदेशातून रेती वाहतूक करताना वाहन कुणी अडवू नये, म्हणून समोर स्वत:चे चारचाकी वाहन त्यामागे रेती वाहतुकीचे तीन ते चार टिप्पर, आणखी त्यामागे रेती तस्कराच्या नातेवाईकांचे चारचाकी वाहन, असे रेतीच्या वाहनांना कव्हर देणे रेती वाहतूक तस्करांकडून सुरू होते. नाक्यावर ट्रॅक्टरचालक वाहन हे रॉयल्टी व कोरोना चाचणीचा अहवाल स्वत: दाखवत नव्हते तर रेती तस्कर त्यांनी मॅनेज केलेल्या वनविभागाच्या नाक्यावर दाखवत होते. तेथे उपस्थित कर्मचारी ‘ऑल इज वेल’चा संदेश देत वाहन सोडून देत होते.

बाईट

रेती वाहतूक करताना रॉयल्टीची तपासणी केली असता त्यावर वाहतुकीच्या अंतरात व वेळेत घोळ आढळून आला. ती रेती वाहतूक अवैध असल्याचे दिसून आल्याने वाहतूकदारांकरिता जाहीर नोटीस काढण्यात आली. त्याप्रमाणे वाहतूक न झाल्यास यापुढे कारवाई करण्यात येणार आहे.

- अतुल पाटोळे,

तहसीलदार, धारणी

----------------