शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

महसूल अधिकाऱ्यांचे होणार मूल्यमापन

By admin | Updated: June 19, 2015 00:34 IST

पुणे येथे पार पडलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेतील निर्णयानुसार महसूल विभागातील जिल्हाधिकारी ...

पत्रपरिषद : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती अमरावती : पुणे येथे पार पडलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेतील निर्णयानुसार महसूल विभागातील जिल्हाधिकारी ते नायब तहसीलदारांच्या महसूल विभागाशी संबंधित कामांचे मूल्यमापन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.राज्य शासनाच्या महसूल विभागाने प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी नवे धोरण अमलात आणले आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्याच्या परिषदेत महसूल विभागातील सर्वच अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजातील गतिमानता वाढणार असून दप्तरदिरंगाईचे प्रकार थांबण्यास मदत होणार आहे.यामध्ये १५ एरिया आणि ७७ विषयाचा समावेश आहे. डिसेंबर २०१४ मध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्हयातील नियोजनाबाबत बैठक घेतली होती. यानुसार महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी पुढाकार घेत येत्या १ आॅगस्टपासून राजस्व सुर्वण जयंती अभियानाच्या धर्तीवर महाराजस्व अभियान राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. महसुली उद्दिष्ट वाढणार अमरावती : यामध्ये विविध प्रकारचे दाखले, विस्तारित समाधान योजना, लोकअदालत, प्रलंबित असलेले महसूल विभागातील सहा महिन्यांपेक्षा अधिकचे दावे निकाली काढणे, भोगवटदार दोन मधून १ मध्ये वर्ग करणे, गौण खनिज, रेती घाटाचे लिलाव करण्यासाठी वेळापत्रक तयार करून जुलै ते आॅगस्ट महिन्यात आटोपून १ सप्टेंबरपासून प्रक्रिया राबविली जाणार आहे. केबल सर्वेक्षण करून महसूल उत्पन्न वाढविले जाणार आहेत. महसूल सुनावणी एक व दुसऱ्या टप्यात उजळणी अशा दोनच टप्प्यात निकाली काढले जाणार आहे. शासकीय जमिनीची इत्थंभूत माहिती एकत्र केली जाणार आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. अशा विविध दहा प्रकारची कामे या अभियानाच्या माध्यमातून राबविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले उत्पन्नवाढीसाठी नियोजन जिल्ह्याला मागील वर्षी महसूल उत्पन्नवाढीसाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्य शासनाने महसूल, वाढविण्यावर भर दिला असून अमरावती जिल्ह्याला मागील वर्षी ८६ कोटींचे उदिष्ट्य दिले होते ते आता पुढील वर्षी १०० कोटी एवढे राहणार असल्याने महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी आतापासून नियोजन केले जाणार आहे.आता रेतीघाट लिलावाचे वेळापत्रकमागील वर्षी जिल्ह्यात रेतीसाठवणुकीमुळे रेतीघाटाचे लिलाव होऊ शकले नाहीत. मात्र आता शासनाने गौण खनिज व रेती घाटाच्या लिलावासाठी वेळापत्रक ठरवून दिले आहे. यानुसार जुलै व आॅगस्ट महिन्यात लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रेती साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी गित्ते यांनी सांगितले.