शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

महसूल अधिकाऱ्यांचे होणार मूल्यमापन

By admin | Updated: June 19, 2015 00:34 IST

पुणे येथे पार पडलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेतील निर्णयानुसार महसूल विभागातील जिल्हाधिकारी ...

पत्रपरिषद : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती अमरावती : पुणे येथे पार पडलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेतील निर्णयानुसार महसूल विभागातील जिल्हाधिकारी ते नायब तहसीलदारांच्या महसूल विभागाशी संबंधित कामांचे मूल्यमापन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.राज्य शासनाच्या महसूल विभागाने प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी नवे धोरण अमलात आणले आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्याच्या परिषदेत महसूल विभागातील सर्वच अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजातील गतिमानता वाढणार असून दप्तरदिरंगाईचे प्रकार थांबण्यास मदत होणार आहे.यामध्ये १५ एरिया आणि ७७ विषयाचा समावेश आहे. डिसेंबर २०१४ मध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्हयातील नियोजनाबाबत बैठक घेतली होती. यानुसार महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी पुढाकार घेत येत्या १ आॅगस्टपासून राजस्व सुर्वण जयंती अभियानाच्या धर्तीवर महाराजस्व अभियान राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. महसुली उद्दिष्ट वाढणार अमरावती : यामध्ये विविध प्रकारचे दाखले, विस्तारित समाधान योजना, लोकअदालत, प्रलंबित असलेले महसूल विभागातील सहा महिन्यांपेक्षा अधिकचे दावे निकाली काढणे, भोगवटदार दोन मधून १ मध्ये वर्ग करणे, गौण खनिज, रेती घाटाचे लिलाव करण्यासाठी वेळापत्रक तयार करून जुलै ते आॅगस्ट महिन्यात आटोपून १ सप्टेंबरपासून प्रक्रिया राबविली जाणार आहे. केबल सर्वेक्षण करून महसूल उत्पन्न वाढविले जाणार आहेत. महसूल सुनावणी एक व दुसऱ्या टप्यात उजळणी अशा दोनच टप्प्यात निकाली काढले जाणार आहे. शासकीय जमिनीची इत्थंभूत माहिती एकत्र केली जाणार आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. अशा विविध दहा प्रकारची कामे या अभियानाच्या माध्यमातून राबविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले उत्पन्नवाढीसाठी नियोजन जिल्ह्याला मागील वर्षी महसूल उत्पन्नवाढीसाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्य शासनाने महसूल, वाढविण्यावर भर दिला असून अमरावती जिल्ह्याला मागील वर्षी ८६ कोटींचे उदिष्ट्य दिले होते ते आता पुढील वर्षी १०० कोटी एवढे राहणार असल्याने महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी आतापासून नियोजन केले जाणार आहे.आता रेतीघाट लिलावाचे वेळापत्रकमागील वर्षी जिल्ह्यात रेतीसाठवणुकीमुळे रेतीघाटाचे लिलाव होऊ शकले नाहीत. मात्र आता शासनाने गौण खनिज व रेती घाटाच्या लिलावासाठी वेळापत्रक ठरवून दिले आहे. यानुसार जुलै व आॅगस्ट महिन्यात लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रेती साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी गित्ते यांनी सांगितले.