शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत पाठ्यपुस्तकांचा यंदा पुनर्वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST

अमरावती : समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके दिली जातात. एकदा पुस्तके ...

अमरावती : समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके दिली जातात. एकदा पुस्तके दिल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याचा वापर होत नाही. त्यामुळे यावर्षीपासून पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. जुन्या विद्यार्थ्यांची चांगल्या अवस्थेतील पाठ्यपुस्तके पुढील सत्रातील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. त्यामुळे शासनाच्या पुस्तकांच्या निर्मितीवर होणाऱ्या खर्चाला आळा बसणार आहे. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी शाळांना दिले आहेत.

पाठ्यपुस्तकातून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पुस्तकांचा पुनर्वापर करण्यात येत असल्याचा दाखला शिक्षण विभागाकडून दिला जात आहे. मोफत पाठ्यपुस्तकांवर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. काही विद्यार्थी पाठ्यपुस्तके सुस्थितीत ठेवतात. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ ते ८च्या १,५८६ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना गतवर्षी जूनमध्ये लाखो पाठ्यपुस्तकांचे संच वितरित केले होते. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी तर पाठ्यपुस्तके उघडूनही बघितलेली नाहीत. अशा विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके पुढच्या सत्रात शाळा परत घेणार आहेत. चांगल्या अवस्थेत असलेली पुस्तके नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना वितरीत केली जाणार आहेत. याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परिपत्रक काढून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला तसे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालकांना व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून पाठ्यपुस्तके जमा करण्याचे आवाहन शिक्षकांमार्फत केले जात आहे. यादरम्यान पालक व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून सांगितले जात आहे. मात्र, पुस्तके जमा करण्याची सक्ती करू नये, अशी सूचना शिक्षण विभागाने दिली आहे.

बॉक्स

संच परतीचे चित्र स्पष्ट होणार

शिक्षण विभागाने आगामी शैक्षणिक सत्रापासून यांची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील किती विद्यार्थी मोफत पाठपुस्तकांचे संच परत करतात, याबाबतचे चित्र नवे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर दिसून येणार आहे.

कोट

समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके दिली जातात. या पुस्तकांचा पुनर्वापर करावा, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार अंमलबजावणी निर्देश शाळांना दिले आहेत.

ई. झेड. खान

शिक्षणाधिकारी प्राथमिक