शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या प्रवासात उमेदवारांना ठोकावा लागला मुक्काम

By admin | Updated: May 12, 2014 23:06 IST

केंद्र शासनाच्या टपाल विभागातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या विविध पदांच्या परीक्षेसाठी विदर्भात नागपूर येथे एकमेव परीक्षा केंद्र देण्यात आले होते.

अमरावती : केंद्र शासनाच्या टपाल विभागातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या विविध पदांच्या परीक्षेसाठी विदर्भात नागपूर येथे एकमेव परीक्षा केंद्र देण्यात आले होते. उमेदवारांनी परीक्षेसाठी जाताना एसटी व रेल्वे गाड्यांत एकच गर्दी केली असताना सायंकाळी ४ वाजता पेपर संपताच परतीच्या प्रवासाला निघालेल्या काही उमेदवारांना वाहन मिळाले नाही. बसस्थानक, रेल्वेस्थानकावर मुक्काम ठोकून सोमवारी सकाळी परतीचा प्रवास त्यांना करावा लागला.

केंद्रीय

टपाल विभागामार्फत पोस्टल सहायक, शॉर्टिंंग सहायक, पोस्टल सहायक (बचत बँक) अशा विविध सुमारे एक हजार पदांकरिता राज्यात एकाच वेळी रविवार ११ मे रोजी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत राज्यातील पाच परीक्षा केंद्रांवर लाखो उमेदवारांनी या पदासाठी परीक्षा दिली. टपाल विभागाने जाहीर केलेल्या राज्यातील पाच परीक्षा केंद्रांपैकी विदर्भात एकमात्र परीक्षा केंद्र नागपुरात देण्यात आले होते. त्यामुळे सोयीचे परीक्षा केंद्र म्हणून अनेक उमेदवारांनी नागपूर येथील केंद्राला पसंती दिली होती. तसा उल्लेखही अर्ज सादर करताना नोंदविला. रविवार सुटीचा दिवस अन् त्यातही टपाल विभागाचा पेपर दुपारी २ ते ४ यावेळेत असल्याने अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतील उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी सकाळी पाच वाजतापासून परीक्षेला जाण्यास सुरुवात केली. त्यासाठी नियोजनही केले; मात्र अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची तुडूंब गर्दी होती. याशिवाय रेल्वेस्थानकावर हीच परिस्थिती होती. त्यामुळे कधी नव्हे एवढी उमेदवारांची प्रवासासाठीची गर्दी एसटी महामंडळाला वाहतूक करण्यासाठी दमछाक करणारी ठरली.

महामंडळाने

जादा बसेस सोडल्यानंतरही मिळेल त्या वाहतूक सुविधेने प्रवास करण्याची इच्छा मनात असतानाही वाहतूक सुविधा तोकडी पडल्याचे चित्र आहे. मात्र कशाही पद्धतीने उमेदवारांनी परीक्षा केंद्र गाठून परीक्षेत सहभाग नोंदविला. हीच गर्दी परतीच्या प्रवासात पहावयास मिळाली असताना टपाल विभागाची परीक्षा देऊन घराची आस धरणार्‍या अनेक उमेदवारांना रात्री उशिरापर्यंंत परतीचा प्रवास करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करूनही वाहतूक सुविधा अपुरी पडत असल्याने बसस्थानक, रेल्वेस्थानक, नातेवाईक यांचेकडे मुक्काम ठोकून मंगळवारी नाईलाजास्तव परतीचा प्रवास करावा लागला. (प्रतिनिधी)