शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

लग्नसराईवर परिणाम मंगल कार्यालये ओस

By admin | Updated: January 3, 2015 00:19 IST

कोरड्या दुष्काळामुळे लग्नसराईवरदेखील परिणाम झाला असून मंगल कार्यालयांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेले शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय पार कोलमडून गेले आहेत.

अमरावती : कोरड्या दुष्काळामुळे लग्नसराईवरदेखील परिणाम झाला असून मंगल कार्यालयांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेले शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय पार कोलमडून गेले आहेत. लग्न जमले, तारखा काढल्या, पण आर्थिक संकटात सापडल्याने लग्नाचा खर्च करावा तरी कसा, असा मोठा प्रश्न वधू-वर पित्यासमोर उभा आहे. काही पालकांनी आपल्या मुला-मुलींचे विवाह काही महिने पुढे ढकलल्याचे वास्तव समोर आले आहे. लग्नाच्या तिथींवर अवलंबून असलेली मंगल कार्यालये, आचारी, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, फुले, वाहन आदी व्यवसायांनाही दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे.तुळशीचे लग्न झाले की लग्नसराईची धूम सुरु होते. मिळेल ते मंगल कार्यालय, मंडप डेकोरेशन, बँड, ढोल ताशाच्या फुलापासून ते आचाऱ्यापर्यंत बुकिंगसाठी वधू-वर पित्यांची घाई असते. यंदा मात्र जमलेले शुभमंगल उरकावे तरी कसे, असा प्रश्न शेतकरी वधु-पित्यांना पडला आहे. अनेक खेड्यात जमलेले विवाह दुष्काळाच्या परिस्थितीमुळे अडचणीत आल्याचे चित्र आहे. काटकसरीने विवाहाचे नियोजनयाच वर्षी लग्न आवश्यक असणाऱ्यांनी काटकसर करुन नियोजनही सुरू केले आहे. ग्रामीण भागातील लग्नाच्या अनेक तारखांचे तक्ते रिकामेच आहेत. आचाऱ्यांच्या हाताला काम नाही. यावर आधारित अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांवर दुष्काळाचे सावट पडले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे रबीसाठी पाण्याची व्यवस्था आहे, त्यांनी रब्बीची पेरणी केली. रबीच्या पिकांवर मुला-मुलींचे विवाह करण्याच्या हेतूने काही पालकांनी मे महिन्याचे मुहूर्त धरले आहेत.