शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

लग्नसराईवर परिणाम मंगल कार्यालये ओस

By admin | Updated: January 3, 2015 00:19 IST

कोरड्या दुष्काळामुळे लग्नसराईवरदेखील परिणाम झाला असून मंगल कार्यालयांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेले शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय पार कोलमडून गेले आहेत.

अमरावती : कोरड्या दुष्काळामुळे लग्नसराईवरदेखील परिणाम झाला असून मंगल कार्यालयांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेले शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय पार कोलमडून गेले आहेत. लग्न जमले, तारखा काढल्या, पण आर्थिक संकटात सापडल्याने लग्नाचा खर्च करावा तरी कसा, असा मोठा प्रश्न वधू-वर पित्यासमोर उभा आहे. काही पालकांनी आपल्या मुला-मुलींचे विवाह काही महिने पुढे ढकलल्याचे वास्तव समोर आले आहे. लग्नाच्या तिथींवर अवलंबून असलेली मंगल कार्यालये, आचारी, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, फुले, वाहन आदी व्यवसायांनाही दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे.तुळशीचे लग्न झाले की लग्नसराईची धूम सुरु होते. मिळेल ते मंगल कार्यालय, मंडप डेकोरेशन, बँड, ढोल ताशाच्या फुलापासून ते आचाऱ्यापर्यंत बुकिंगसाठी वधू-वर पित्यांची घाई असते. यंदा मात्र जमलेले शुभमंगल उरकावे तरी कसे, असा प्रश्न शेतकरी वधु-पित्यांना पडला आहे. अनेक खेड्यात जमलेले विवाह दुष्काळाच्या परिस्थितीमुळे अडचणीत आल्याचे चित्र आहे. काटकसरीने विवाहाचे नियोजनयाच वर्षी लग्न आवश्यक असणाऱ्यांनी काटकसर करुन नियोजनही सुरू केले आहे. ग्रामीण भागातील लग्नाच्या अनेक तारखांचे तक्ते रिकामेच आहेत. आचाऱ्यांच्या हाताला काम नाही. यावर आधारित अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांवर दुष्काळाचे सावट पडले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे रबीसाठी पाण्याची व्यवस्था आहे, त्यांनी रब्बीची पेरणी केली. रबीच्या पिकांवर मुला-मुलींचे विवाह करण्याच्या हेतूने काही पालकांनी मे महिन्याचे मुहूर्त धरले आहेत.