शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी रेस्टॉरेंट संचालक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:01 IST

दीड वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या दुकानदारांनी व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला. मात्र, हॉटेल, रेस्टॉरंटचे निर्बंध तसेच कायम ठेवत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यास सांगितले.  या निर्णयावर हॉटेल रेस्टॉरंट व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली. आम्हालाही रात्री ११ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यापारी आणि दुकानदारांत समाधानाचे वातावरण असले तरी हॉटेल, रेस्टॉरेंट व्यावसायिक मात्र नाराज झाले आहेत. वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शहरातील शेकडो हॉटेल, रेस्टॉरेंटचे संचालक एकवटले होते. यावेळी रेस्टॉरेंट ॲण्ड लाॅजिंग असोसिएशन, जिल्हा परमीट रूम असोसिएशनच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीसमोर धरणे देऊन या अन्यायाकडे शासनाचे लक्ष वेधले. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी पवनित कौर यांना निवेद देऊन हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ सकाळी ११ ते सांयकाळी ११ वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली. याचवेळी आंदोलकांनी आपल्या हॉटेल, रेस्टाॅरंटच्या चाव्या गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचेकडे सुपूर्द केल्या.  कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही दिवसापूर्वी ठराविक जिल्ह्यातील कोविड निर्बंध शिथिल केले. त्यामध्ये दुकाने उघडी ठेवण्याबाबतचे सर्व निर्बंध  ८ रात्री वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे दीड वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या दुकानदारांनी व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला. मात्र, हॉटेल, रेस्टॉरंटचे निर्बंध तसेच कायम ठेवत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यास सांगितले.  या निर्णयावर हॉटेल रेस्टॉरंट व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली. आम्हालाही रात्री ११ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. आंदोलनात नितीन मोहोड, आशिष देशमुख, रवींद्रसिंग सलुजा, सारंग राऊत, नितीन कदम, नितीन देशमुख, गजानन राजगुरे, नितीन गुडधे, प्रवीण अळसपुरे, मदन जयस्वाल, नंदकिशाेर जयस्वाल, गुडू धर्माळे, नीलेश जयस्वाल, विशाल तरडेजा, पडाेळे, हर्षद देशमुख, अजय गुल्हाने आदी सहभागी झाले होते.

आजी-माजी लोप्रतिनिधींचा पाठिंबाजिल्ह्यातील हॉटेल, रेस्टाॅरेंट संचालकांनी व्यवसायासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी साठी शुक्रवारी आपल्या व्यवसाय बंद ठेवून हॉटेल, रेस्टॉरंटच्या चाव्या जिल्हा प्रशासनाकडे एकदिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, युवा स्वाभिमानच्यावतीने खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर यांनी समर्थन दिले. शासनाने वरील व्यावसायिकांना वेळ वाढविण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. याकरिता पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

दीड वर्षात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसानलॉकडाऊनमुळे दीड वर्षात हॉटेल रेस्टॉरंट. व्यावसायिकांची मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुकानदाराप्रमाणे सरकारने हॉटेल, रेस्टॉरेंट व लॉजिंग व्यावसायिकांचाही विचार करावा. वेळ वाढवून न दिल्यास नाईलाजाने आम्हाला अन्यायाविरुद्ध लढा तीव्र करावा लागेल, असा इशारा नितीन मोहोड, रविंद्रसिंग सलुजा, सारंग राऊत, गुड्डू धर्माळे, नितीन कदम व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेल