शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

नगरपंचायतीसाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक

By admin | Updated: May 29, 2014 01:35 IST

जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्‍वर), धारणी व भातकुली या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायतींचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्‍वर), धारणी व भातकुली या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायतींचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विषयी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्धी देण्यात आली आहे. या विषयी आता संबंधित ग्रामपंचायतींच्या मासिक सभा व विशेष ग्रामसभा बोलावून संयुक्तिक व सर्मथनीय अभिप्राय शासनाने सात दिवसांच्या आत मागविले आहेत. विधानसभा निवडणूक पूर्व नगरपंचायतीचा तिढा सुटावा यासाठी नगरविकास व ग्रामविकास विभागाच्या हालचाली सुरु

तालुक्याचे मुख्यालय असणार्‍या तिवसा, नांदगाव (खंडेश्‍वर), भातकुली व धारणी या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत. नगरपरिषदेसाठी २५ हजारांच्यावर लोकसंख्येच्या निकषात ही गावे मोडत नसल्यामुळे शासनाने या ठिकाणी ‘क’ वर्ग दर्जा असणारी नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतला. या विषयीचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. विधानसभेत घोषणा केली.

१ मार्च २0१४ रोजी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केला व यावर ३0 दिवसांच्या आत आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. परंतु ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयास मुदतीच्या अवधित प्राप्त झाली नाही.

याविषयी ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे उपसचिव नरेश गिते यांनी ३ मे २0१४ रोजी विभागीय आयुक्तांना पत्र देऊन या सर्व ग्रामपंचायतींची विशेष ग्रामसभा व मासिक सभा बोलावून सात दिवसांच्या आत सर्मथनीय ठराव व अहवाल पाठविण्याचे स्पष्ट केले. तसेच या ग्रामपंचायतच्या संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशिल विहित प्रपत्रात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागविला आहे.