शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

नगरपंचायतीसाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक

By admin | Updated: May 29, 2014 01:35 IST

जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्‍वर), धारणी व भातकुली या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायतींचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्‍वर), धारणी व भातकुली या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायतींचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विषयी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्धी देण्यात आली आहे. या विषयी आता संबंधित ग्रामपंचायतींच्या मासिक सभा व विशेष ग्रामसभा बोलावून संयुक्तिक व सर्मथनीय अभिप्राय शासनाने सात दिवसांच्या आत मागविले आहेत. विधानसभा निवडणूक पूर्व नगरपंचायतीचा तिढा सुटावा यासाठी नगरविकास व ग्रामविकास विभागाच्या हालचाली सुरु

तालुक्याचे मुख्यालय असणार्‍या तिवसा, नांदगाव (खंडेश्‍वर), भातकुली व धारणी या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत. नगरपरिषदेसाठी २५ हजारांच्यावर लोकसंख्येच्या निकषात ही गावे मोडत नसल्यामुळे शासनाने या ठिकाणी ‘क’ वर्ग दर्जा असणारी नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतला. या विषयीचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. विधानसभेत घोषणा केली.

१ मार्च २0१४ रोजी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केला व यावर ३0 दिवसांच्या आत आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. परंतु ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयास मुदतीच्या अवधित प्राप्त झाली नाही.

याविषयी ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे उपसचिव नरेश गिते यांनी ३ मे २0१४ रोजी विभागीय आयुक्तांना पत्र देऊन या सर्व ग्रामपंचायतींची विशेष ग्रामसभा व मासिक सभा बोलावून सात दिवसांच्या आत सर्मथनीय ठराव व अहवाल पाठविण्याचे स्पष्ट केले. तसेच या ग्रामपंचायतच्या संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशिल विहित प्रपत्रात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागविला आहे.