शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

उत्पन्नाला बाधा असल्यास ठराव शासनाला पाठविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:13 IST

अमरावती : महापालिकेची पाच व्यापारी संकुले व मुख्य इमारतीमधील एका बँकेच्या भाडेपट्टीची लीज तीन वर्षांपूर्वी संपुष्टात आलेली आहे. जिल्हा ...

अमरावती : महापालिकेची पाच व्यापारी संकुले व मुख्य इमारतीमधील एका बँकेच्या भाडेपट्टीची लीज तीन वर्षांपूर्वी संपुष्टात आलेली आहे. जिल्हा समितीने रेडीरेकनरनुसार या मालमत्तांची भाडेवाढ केलेली आहे व या मालमत्तांच्या मुदतवाढीच्या विषयाला सभापतींनी या आमसभेत स्थगिती दिलेली आहे. यासंदर्भातील ठराव अद्याप प्रशासनाला अप्राप्त आहे. हा ठराव जर महापालिकेच्या उत्पन्नाला बाधा आणत असेल तर शासनाकडे पाठविण्यात येण्याची तयारी प्रशासनाने केल्याची माहिती आहे.

सभागृहातील विषयावर सभागृहाबाहेर बोलण्यास आयुक्तांची चुप्पी आहे. एकूण या प्रकरणात त्यांनी ‘वेट ॲण्ड वॉच’ ही भूमिका घेतल्याचे दिसून येते. विरोधकांनी रान उठविलेल्या महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या विषयावर सत्तापक्षातील अनेक सदस्यांनीदेखील सहमती असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शासनाने १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या निर्देशान्वये महापालिकेच्या मालमत्तांचे भाडेपट्टा नूतनीकरण अथवा हस्तांतरणासाठी नियम तयार केलेले आहेत व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त महापालिका व सह जिल्हा निबंधक यांची त्रिसदस्यीय समिती गठीत केलेली आहे. या समितीची बैठक ९ जुलै २०२१ रोजी झाली व यामध्ये रेडीरेकनरनुसार भाडे निश्चित करण्यात आलेले आहे व हे भाडे लीज संपल्याच्या दिवसापासून लागू होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या आमसभेत या विषयावर चांगलाच गदारोळ झाला. उत्पन्नवाढीच्या विषयाला आमसभेत स्थगिती देण्यात येऊन यावर शासनाने मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय झाल्याने सत्तापक्षात अनेक आरोप होत आहेत.

बॉक्स

डिझेलअभावी वाहन उभे

अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता उर्वरित वाहने डिझेलअभावी उभी आहेत, पंपावर या वाहनांना डिझेल नाकारण्याची नामुश्की महापालिका प्रशासनावर ओढावलेली आहे. अशा परिस्थितीत लीज संपलेल्या संकुलांची भाडेवाढ तीन वर्षांपासून रखडलेली आहे व किमान १२ कोटींचे भाडे वसुलीदेखील झाली नसल्याची बाब उघड झालेली आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीच्या मुद्द्यावर सत्तापक्षाला घेरण्यात येत असल्याचे दिसून येते.