शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

६५ ग्रामपंचायती पाठविणार राज्य शासनाला ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:13 IST

धामणगाव रेल्वे : सन २०११ च्या जनगणना सर्वेक्षणाच्या वेळी टीव्ही, फ्रीज, दुचाकी बाळगत असल्याचे सांगितल्याने ‘ड’ यादीतील लाभार्थींची दोन ...

धामणगाव रेल्वे : सन २०११ च्या जनगणना सर्वेक्षणाच्या वेळी टीव्ही, फ्रीज, दुचाकी बाळगत असल्याचे सांगितल्याने ‘ड’ यादीतील लाभार्थींची दोन हजार घरकुले रद्द करण्यात आली. लाभार्थींची रद्द न करता गरजूंना तात्काळ घरकुल द्यावे, या मागणीचे तालुक्यातील ६५ ग्रामपंचायती ग्रामसभेत ठराव घेऊन राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याला पाठविणार आहेत. दरम्यान, लोकमतच्या वृत्ताची दखल घेत सरपंचांच्या सभेत ‘ड’ यादीचा मुद्दा गाजला.

घरी टीव्ही, फ्रीज, दुचाकी, चारचाकी शेती असल्याची माहिती सन २०११ च्या जनगणनेच्या वेळी घेण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील दोन हजार घरकुले रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत तालुक्यातील सर्व सरपंचांची सभा पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. पंचायत समितीचे सभापती महादेव समोसे, उपसभापती माधुरी दुधे, सदस्य शुभम भोंगे, राजकुमार केला, गटविकास अधिकारी माया वानखडे, विस्तार अधिकारी किशोर चव्हाण, मिलिंद ठुनुकले यांची उपस्थिती होती. अनेक वर्षापासून कैक कुटुंबांना घरे नाहीत. अशावेळी ‘ड’ यादीतील गरजूंची नावे रद्द होणे अन्यायकारक असल्याचे मत या सरपंचांनी व्यक्त केले. ‘ब’ यादी अद्यापही पूर्ण झाली नाही. अनेकांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही, असे मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले.

आगामी काळात सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन हा ‘ड’ यादीतील नावे रद्द करू नये, असा ठराव राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याला पाठविण्याचे एकमताने बैठकीत ठरविण्यात आले. गावातील गरजूंची घरकुल यादी तयार करण्याचा अधिकार ग्रामसभेला द्यावा तसेच ई-क्लास जागा उपलब्ध करून द्यावी. अनेक कुटुंब विभक्त आहे. त्यातील गरजूंना घरे नाहीत. त्यासाठी शासन स्तरावर त्वरित उपाययोजना राबविण्यात यावे, अशी मागणीही या सरपंचांनी बैठकीत केली. ग्रामविकासासाठी सरपंचांची भूमिका व्यापक व्हावी व कृती समिती तयार करावी, असे या बैठकीत ठरविण्यात आले. संचालन विशाल सुटे व आभार प्रदर्शन जळगावचे सरपंच मनोज शिवणकर यांनी केले.

-------------------

आयएसओकडे करा वाटचाल

हिंगणगाव, मंगरूळ दस्तगीर ग्रामपंचायत आयएसओचा दर्जा मिळाल्याने इतर ग्रामपंचायतीने ही पुढाकार घ्यावा. कोरोनामुळे दोन वर्षांपासून थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी सहकार्य करावे, आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी केले.