शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कृषी समितीत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:12 IST

अमरावती : शेतकऱ्यांच्या हिताचे विषय सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीने ३ डिसेंबर रोजी झालेल्या सभेत एकमताने ठराव पारित ...

अमरावती : शेतकऱ्यांच्या हिताचे विषय सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीने ३ डिसेंबर रोजी झालेल्या सभेत एकमताने ठराव पारित केला. सदर ठराव अध्यक्षांच्या माध्यमातून मार्गी लावण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

कृषी समितीने पारित केलेल्या ठरावानुसार रानडूकर, हरिण, रोही या वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने तात्काळ कार्यवाही करावी, वनप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाची तक्रार शेतकऱ्यास वनविभागाकडे ऑनलाईन पध्दतीने २४ तासांच्या आत वनविभागाच्या संकेतस्थळावर नोंदविणे बंधनकारक आहे. ऑनलाईन पध्दतीने विहित वेळेत अर्ज सादर न केल्यामुळे आपदग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहतो. सदर ऑनलाईन प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे ऑनलाईन अर्जाची अट शिथिल करावी, वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी वैयक्तिक किंवा सामुहिक पध्दतीने सर्व शेतकऱ्यांना शेताला तारेच्या कुंपणासाठी अनुदान योजना शासनाने नव्याने राबवावी, शेतकऱ्यांना किमान काटेरी तार व आवश्यक साहित्याकरिता अनुदान द्यावे, सन २०२० या वर्षात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये लक्षांक प्राप्त नाही. जिल्ह्यात मोठया प्रमाणात संत्रा व फळझाडाची लागवड केली जाते. त्यामुळे ही योजना पूर्वरत सुरू ठेवावी, योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, कोरोना संसर्गामुळे ३३ टक्के निधी उपलब्ध होणार असल्याने कृषी व आरोग्य विभागाचा निधी कपात करू नये, झेडपीच्या अंदाजपत्रकातून यावर्षी निधी कमी प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना पाईप, विद्युत पंपसंच, ताडपत्री, स्प्रेपंप आदी कृषी अनुदानाचा लाभ मागणीनुसार देता येत नाही. त्यामुळे कृषी विभागाला सन २०२०-२१ या वर्षात वाढीव निधी द्यावा, असा ठराव कृषी सभापती विठ्ठल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पारित करण्यात आला आहे. यावेळी सभेला सदस्य प्रताप अभ्यंकर, प्रकाश साबळे, गजानन राठोड, प्रवीण तायडे आदी उपस्थित होते.

बॉक्स

कृषिमंत्र्यांना भेटणार शिष्टमंडळ

शेतकऱ्यांच्या संदर्भातील वरील प्रश्न अवगत करून देण्यासाठी विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मुंबई येथे मंत्रालयात कृषिमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी उपाध्यक्ष तथा कृषी सभापती विठ्ठल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीचे सदस्यांची समिती गठित करण्यात यावी, असा प्रस्ताव अध्यक्ष बबलू देशमुख यांच्याकडे कृषी समितीने लेखीपत्राव्दारे दिला आहे.