शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कृषी समितीत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:12 IST

अमरावती : शेतकऱ्यांच्या हिताचे विषय सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीने ३ डिसेंबर रोजी झालेल्या सभेत एकमताने ठराव पारित ...

अमरावती : शेतकऱ्यांच्या हिताचे विषय सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीने ३ डिसेंबर रोजी झालेल्या सभेत एकमताने ठराव पारित केला. सदर ठराव अध्यक्षांच्या माध्यमातून मार्गी लावण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

कृषी समितीने पारित केलेल्या ठरावानुसार रानडूकर, हरिण, रोही या वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने तात्काळ कार्यवाही करावी, वनप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाची तक्रार शेतकऱ्यास वनविभागाकडे ऑनलाईन पध्दतीने २४ तासांच्या आत वनविभागाच्या संकेतस्थळावर नोंदविणे बंधनकारक आहे. ऑनलाईन पध्दतीने विहित वेळेत अर्ज सादर न केल्यामुळे आपदग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहतो. सदर ऑनलाईन प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे ऑनलाईन अर्जाची अट शिथिल करावी, वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी वैयक्तिक किंवा सामुहिक पध्दतीने सर्व शेतकऱ्यांना शेताला तारेच्या कुंपणासाठी अनुदान योजना शासनाने नव्याने राबवावी, शेतकऱ्यांना किमान काटेरी तार व आवश्यक साहित्याकरिता अनुदान द्यावे, सन २०२० या वर्षात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये लक्षांक प्राप्त नाही. जिल्ह्यात मोठया प्रमाणात संत्रा व फळझाडाची लागवड केली जाते. त्यामुळे ही योजना पूर्वरत सुरू ठेवावी, योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, कोरोना संसर्गामुळे ३३ टक्के निधी उपलब्ध होणार असल्याने कृषी व आरोग्य विभागाचा निधी कपात करू नये, झेडपीच्या अंदाजपत्रकातून यावर्षी निधी कमी प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना पाईप, विद्युत पंपसंच, ताडपत्री, स्प्रेपंप आदी कृषी अनुदानाचा लाभ मागणीनुसार देता येत नाही. त्यामुळे कृषी विभागाला सन २०२०-२१ या वर्षात वाढीव निधी द्यावा, असा ठराव कृषी सभापती विठ्ठल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पारित करण्यात आला आहे. यावेळी सभेला सदस्य प्रताप अभ्यंकर, प्रकाश साबळे, गजानन राठोड, प्रवीण तायडे आदी उपस्थित होते.

बॉक्स

कृषिमंत्र्यांना भेटणार शिष्टमंडळ

शेतकऱ्यांच्या संदर्भातील वरील प्रश्न अवगत करून देण्यासाठी विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मुंबई येथे मंत्रालयात कृषिमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी उपाध्यक्ष तथा कृषी सभापती विठ्ठल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीचे सदस्यांची समिती गठित करण्यात यावी, असा प्रस्ताव अध्यक्ष बबलू देशमुख यांच्याकडे कृषी समितीने लेखीपत्राव्दारे दिला आहे.