शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विभागात १५ लाख वृक्षलागवडीचा संकल्प

By admin | Updated: June 17, 2016 00:18 IST

विभागात १५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व विभागाला वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे.

पर्यावरण संतूलन गरजेचे : विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांची माहितीअमरावती : विभागात १५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व विभागाला वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीस जनआंदोलनाचे स्वरुप येण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने किमान एक तरी रोपटे लावण्याचा संकल्प करावा असे आवाहन विभागीय आयुक्त राजूरकर यांनी केले आहे.समाजातील प्रत्येक घटक, संस्था, व्यक्ती, राजकीय पक्ष व सर्वांनीच या वृक्ष लागवडीत सहभाग द्यावा. पर्यावरणाचा संतूलन राखण्यासाठी हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने विभागातील सर्वच जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. १ जुलै रोजी राज्यात एकाच दिवसी २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहेव यामध्ये विभागात १५ लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी घेण्यात आलेल्या आहेत व जिल्हास्तर समितीचे गठन करण्यात आले आहे. दर मंगळवारी या समितीची बैठक घेऊन आढावा घेण्यात येतो. तसेच तालुकास्तरावर दर सोमवारी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठकी घेण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.प्रत्येक शासकीय कार्यालयांनी त्यांना निर्धारीत केलेल्या लक्ष्यानुसार रोपांची मागणी नोंदविली आहे. वृृक्षारोपण झाल्यानंतर प्रत्येक झाडाचा हिशेब ठेवण्यात येणार आहे. किती झाडे लावली, किती जगली याची कारणमिमांसा करण्यात येणार आहे. या वृक्षलागवड महोत्सवात बीडीओंचा महत्त्वाचा वाटा राहणार आहे. शाळा, रस्ते, नदी-नाले, जलयुक्त शिवार कामांचा परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात तसेच मोकळ्या व पडीक शासकीय जागेवर ही वृक्षलागवड करण्यात येईल. शेताच्या बांधावरदेखील वृक्षलागवड करण्यात येणार असल्याची माहिती राजूरकर यांनी दिली. वृक्षलागवडीत या विभागाचा सहभागया वृक्षलागवडीमध्ये जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालय, महापालिका, सहसंचालक तंत्रशिक्षण, आरटीओ, शिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, जलसंपदा विभाग, विद्युत विभाग, आरोग्य, समाज कल्याण, जिल्हा माहिती कार्यालय, कृषी विभाग आदी विभागांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक गटास २०० वृक्षलागवडीचे ‘लक्ष्य’वृक्षलागवडीमध्ये ५ ते ७ फूट उंचीची व दीर्घायुषी असणारी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या झाडांमुळे सावली मिळते व पर्यावरणाचा समतोल राखला जातो. प्रत्येक गावात ३० गट तयार करण्यात आली आहेत व प्रत्येक गटास २०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.