शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

पुनर्वसितांना जमीन निवडीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:01 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात पुनर्वसित भागातून मूळ गावी परतलेल्या आदिवासींशी शुक्रवारी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संवाद साधला.

ठळक मुद्देआदिवासींशी संवाद : खासदार, पालकमंत्री, आमदारांचा संयुक्त दौरा

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात पुनर्वसित भागातून मूळ गावी परतलेल्या आदिवासींशी शुक्रवारी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संवाद साधला. आदिवासींना जमीन निवडण्याची संधी शासनाने दिली असल्याचे यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितले.चिखलदरा तालुक्यातील केलपाणी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजतानंतर आदिवासी व प्रशासनात संवाद साधण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, अचलपूरचे आमदार बच्चू कडू, अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.मी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधीअमरावती येथे शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर सायंकाळी पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी मेळघाटाकडे कूच केली. पालकमंत्री पोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिनिधी असल्याचा दाखला दिला.ते म्हणाले, आदिवासींच्या जमिनीची मागणी पूर्ण करण्यासाठी शासननिर्णय काढण्यात आला आहे. अमरावती व अकोला या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वाटपासाठीची जमीन निश्चित करण्यात आली आहे. या जमिनीपैकी योग्य वाटेल ती जमीन निवडण्याची संधीही पुनर्वसितांना मिळेल. पुनर्वसन पॅकेज दिल्यानंतर पुन्हा जमीन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचेही ते म्हणाले. यावेळी खासदार अडसूळ यांच्यासह सर्वच उपस्थितांनी आदिवासींची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. रात्री ३ वाजतापर्यंत सर्व मंडळी केलापाणी येथे ठाण मांडून होती.नोकरी मिळणार, सहकार्य कराबच्चू कडू यांनी ‘व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसितांना जमीन मिळवून देण्यासाठीचा शासननिर्णय महत्त्वाचा आहे. पेसा अंतर्गत भरती करण्यासाठी आदिवासी बांधवांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. त्यातून नोकरी मिळवून देण्याचीही प्रशासनाची तयारी आहे’, असे मत व्यक्त केले. पुनर्वसित बांधवांनी या निर्णयाचा आदर राखून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी केले.