शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊंच्या लेकींचे शासनाला निवेदन

By admin | Updated: September 23, 2016 00:09 IST

लक्ष-लक्ष मराठ्यांच्या क्रांती मूकमोर्चात युवती व महिलांचा विक्रमी सहभाग लक्षवेधक होता.

मराठा एकजुटीची क्रांती : लक्ष मराठे-दक्ष मराठे, युवतींचा विक्रमी सहभाग अमरावती : लक्ष-लक्ष मराठ्यांच्या क्रांती मूकमोर्चात युवती व महिलांचा विक्रमी सहभाग लक्षवेधक होता. नेहरु मैदानातून निघालेला मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकात विसावला. यावेळी शासनाला सादर करावयाच्या निवेदनाचे वाचन करण्यात आले. काही युवतींनी स्वयंस्फुर्तीने भावना व्यक्त केल्या. त्यानंतर अमुल्या कृष्णकुमार सोळंके, जानकी नितीन यावलीकर, अनुष्का संजय रडके व पुनम रामकृष्ण चिखलकर या जिजाऊंच्या चार लेकींनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना आठ मागण्यांचे निवेदन सादर केले. कोपर्डी येथे घडलेल्या नृशंस घटनेतील सर्व नराधम गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा.अ‍ॅट्रासिटी कायद्याचा दुरूपयोग टाळण्यासाठी कायद्यामध्ये त्वरित सुधारणा करा, कायद्याचा गैरवापर करुन मानसिक छळ करणाऱ्यांना कठोर दंड करण्यासाठी कायद्यात सुधारणा आवश्यक शेतमालास योग्य तो सन्मानपूर्वक भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय द्या व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू करा. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सरसकट शासकीय मदत करावी व या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या.मराठा समाजाला शिक्षण व रोजगार क्षेत्रात त्वरित आरक्षण द्या.मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरावर किमान दोन हजार विद्यार्थी क्षमतेचे स्वतंत्र वसतिगृह शासनाच्या स्वतंत्र विभागाकडून उभारण्यात यावे व चालविण्यात यावे.शासनाच्या रोजगार वा उच्च शिक्षण विभागामार्फत मराठा युवकांकरिता स्वतंत्र स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात व चालविण्यात यावे.मराठा समाजाच्या महानायकाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी व अशी बदनामी करणाऱ्या व्यक्ती व संघटनांचे उदात्तीकरण शासनाने थांबवावे.अशी मागणी मोर्चावेळी करण्यात आली. या निवेदनावर तेजस्विनी चौधरी, शिवाणी चव्हाण, सावी बंड, अवंती चौधरी, साक्षी मुंढे, भक्ती तेटू, स्वामिनी वऱ्हाडे, आकांक्षा सोनवणे या युवतीच्या स्वाक्षऱ्या आहेत. ‘ड्रोन’मधून पुष्पवृष्टीनेहरु मैदानातून निघालेला मराठा समाजाचा मूकमोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकात स्थिरावला. चहुबाजुने गर्दीच गर्दी अन् भगवामय वातावरण निर्माण झाले होते. या मोर्चावर ड्रोन कॅमेरातून मोर्चावर पुष्पवृष्टी करण्यात आली. हा प्रसंग टिपण्यासाठी अनेकांचे कॅमेरे, मोबाईल आकाशाच्या दिशेने सरसावले. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सादर करण्यात आलेले निवेदन मोर्चाच्या समारोपाच्यावेळी वाचून दाखविण्यात आले. विराट गर्दीमुळे गर्ल्स हायस्कूल चौक तुंबला होता. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंचे पूजन करून काश्मिरातील उरी येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात आली. मात्र, मोर्चावर ‘ड्रोन’मधून झालेली पुष्पवृष्टी ही आकर्षणाचे केंद्र ठरली होती.मोर्चासोबतच स्वच्छता, शहराच्या इतिहासात प्रथममोर्चात सहभागी झालेल्या मराठा बांधवांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाऊचचे स्टॉल लावण्यात आले होते. हे रिकामे पाऊच स्वयंसेवकांनी त्वरित गोळा केले. तिवसा तालुक्याच्यावतीने अनेक ट्रॅक्टर ट्रॉली या कामी होत्या. तासभऱ्यात पाण्याच्या बॉटल व रिकामे पाऊच उचलून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. मोर्चानंतर स्वच्छता ही अमरावतीकरांनी प्रथमच अनुभवली .अगदी तासभऱ्यात शहर स्वच्छ करण्यात आले. सर्वसामान्य मराठे,स्वयंसेवक आणि महापालिका यंत्रणेने दोन तासात शहर स्वच्छ क ेले.