शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निधी मागणीचे प्रस्ताव पाठविले, ४९० जोडप्यांचे प्रोत्साहन अनुदान अडले

By जितेंद्र दखने | Updated: January 23, 2024 18:53 IST

लग्नानंतर संसारोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासह नव्याने संसार थाटण्यासाठी हे अनुदान आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या कामी येते.

अमरावती : जातीभेद निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे जोडप्यांना ऑक्टोबर २०२१ पासून ५० हजारांच्या अनुदानापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे नोंदणी विवाह केलेले ४९० जोडप्या शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहे.

लग्नानंतर संसारोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासह नव्याने संसार थाटण्यासाठी हे अनुदान आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या कामी येते. मात्र, दोन ते अडीच वर्षापासून अनुदानच मिळाले नसल्याने, या योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. बहुतेक वेळा आंतरजातीय विवाह करणारे जोडपे कुटुंबापासून वेगळे राहतात. नव्याने संसार थाटण्यासाठी त्यांना अनुदानाचा आधार असतो. काही आर्थिक परिस्थिती बेताची आहे. नोंदणी विवाहानंतर अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या काहींना मुले झाली तरी अद्याप अनुदान मिळाले नाही. शासनाकडे वारंवार पाठपुरावा अनुदान मिळाले नाही. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे १९५८ पासून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदान दिले जाते. यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जनजाती बौद्ध विशेष मागास वर्गातील पुरुष किंवा महिलांनी सवर्ण हिंदू लिंगायत जैन सिंह धर्मातील पुरुष किंवा महिलेशिवाय केल्यास ५० हजाराचे प्रोत्साहन अनुदान दिले जाते.

आंतरजातीय विवाहाच्या संख्येत वाढसमाजकल्याण विभागाकडे ऑक्टोबर २०२१ पासून ४९० जोडप्यांनी नोंदणी विवाहानंतर अर्ज केले. तत्पूर्वी वर्षाला ७० ते ८० जोडपे प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज करायचे. परंतु, आंतरजातीय विवाहाच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ पर्यत १२५ नवीन जोडप्यांनी अर्ज केले.

पाठपुरावा सुरू असला तरी अद्याप अनुदान नाहीआंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. परंतु, सतत पाठपुरावा सुरू आहे. ऑक्टोबर २०२१ पासून अनुदान आले नाही. अनुदान उपलब्ध होताच पात्र लाभार्थ्याना निकषानुसार लाभ दिला जाईल-राजेंद्र जाधवर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी.जि.प. अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती