शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

पत्रकार भवनाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:21 IST

स्थानिक वॉलकट कम्पाऊंडमध्ये उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी थाटात पार पडले.

ठळक मुद्देभूमिपूजन ते उद्घाटन : पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक वॉलकट कम्पाऊंडमध्ये उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी थाटात पार पडले. भूमिपूजन अन् उद्घाटन असा दुहेरी संगम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, हे विशेष.पत्रकार भवनाच्या लोकार्पणानंतर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रवीण पोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, अनिल बोंडे, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती. महानगर पालिकेचे आयुक्त हेमंत पवार, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, राहुल गडपाले, उद्योजक नरेंद्र भाराणी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, माधवराव अंभोरे, राजेंद्र काळे, विनोद घुईखेडकर, शौकत अली मीर साहेब, महापालिका स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत आदी व्यासपीठावर होते.पत्रकारिता क्षेत्रात ४० वर्षांपासून अविरत सेवा देणारे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे आणि दिलीप एडतकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विलास मराठे, मनपा आयुक्त हेमंत पवार, माहिती व जनसंपर्क, नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, राहुल गडपाले, उद्योजक नरेंद्र भाराणी यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, लोकशाही सरकार निरंकुश असणे योग्य ठरत नाही म्हणूनच माध्यमांच्या अंकुशाचे महत्त्व मोठे आहे. सरकार माध्यमांना सर्वतोपरी सहकार्य करीत असले तरी त्यामागे निरपेक्ष कर्तव्याची भावना आहे. पत्रकारितेत अनेक बदल झाले असून बदलांच्या आव्हानांचा सामना करीत प्रसार माध्यमे समाजहिताचे कार्य करीत आहे. पत्रकारांच्या अनेक समस्या असून त्या शासन वेळीच सोडवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अनिल अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय ओडे, त्रिदीप वानखडे, सुरेंद्र चापोरकर, संजय शेंडे, उल्हास मराठे, सुनील धर्माळे, चंदू सोजतिया, मनोहर परिमल, पद्मेश जयस्वाल, सुधीर भारती, संजय बनारसे, चेतन ठाकूर, विवेक दोडके, योगेश देवके, प्रेम कारेगावकर आदींनी अथक परिश्रम घेतले.