शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

वांझोट्या भुईमूगाचा अहवालही खोटा

By admin | Updated: June 18, 2017 00:02 IST

केवळ अस्मानीच नव्हे, तर सुलतानी संकटदेखील शेतकऱ्यांच्या पाठीमागे हात धुऊन लागले आहे. भुईमूगाला शेंगाच लागल्या नाहीत.

कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या : तालुका कमेटीची कंपनीसोबत मिलीभगतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केवळ अस्मानीच नव्हे, तर सुलतानी संकटदेखील शेतकऱ्यांच्या पाठीमागे हात धुऊन लागले आहे. भुईमूगाला शेंगाच लागल्या नाहीत. याची तक्रार करणाऱ्या तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांवर चौकशी करणाऱ्या समितीचीच तक्रार करण्याची वेळ आली. कंपनीच्या प्रतिनिधीसोबत मिलीभगत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोऱ्या पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या घेऊन खोटा अहवाल सादर केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.तिवसा तालुक्यातील मौजा मार्डी शिवारात काही शेतकऱ्यांनी अंकुर कंपनीच्या तीएजी-२४ या वाणाचे भुईमूग बियाण्याची पेरणी केली. त्याची उगवणशक्ती समाधानकारक आहे. मात्र या भुईमूगाला जेमतेम तीन ते चारच शेंगा लागल्या. लगतच्या शेतांचीही पाहणीअमरावती : त्यामुळे हे बियाणे सदोष असल्याची तक्रार पिंपळखुटा येथील सुधाकर नारायनराव लुटे यांनी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे ६ जून रोजी केली. त्यानुसार तालुकास्तर समितीव्दारा १७ मे रोजी लुटे व लगतच्या तीन शेतांची पाहणी केली. यासमितीत संशोधक डी.व्ही चंदनकर, तंत्र अधिकारी ए.पी.गांवडे, तालुका कृषी अधिकारी ए.एस.मस्करे, कृषी अधिकारी डी.एन.गिऱ्हे, दुकानदार प्रतिनिधी दर्शन मुंधडा, कंपनी प्रतिनिधी डी.आर. खंडारे यांच्यासह शेतकरी सुधाकर लुटे, हेमंत उइके व गजानन वानखडे आदींची यावेळी समितीच्या सचिवांनी कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्याचा आरोप लुटे यांनी कृषी विकास अधिकाऱ्याकडे दाखल तक्रारीत केला आहे. यावेळी सर्वांसमोर तिवसा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत अहवाल देतो, असे सर्वांसमोर सांगितले. त्यांच्याशी सातत्याने संपर्क केला असता त्यांनी बोलावून कित्येकदा परत पाठविले. प्रत्यक्षात १५ दिवसांनी म्हणजेच ३ जून रोजी अहवाल दिला. त्यामध्येदेखील प्रत्यक्ष स्थिती व अहवालात नमूद केलेल्या स्थितीत मोठी तफावत असल्याचा आरोप लुटे यांनी केला.शेतकऱ्यांचा आरोपसमितीव्दारा १७ जूनला पाहणी केली. त्यावेळी अहवाल दिला नाही. मात्र कोऱ्या कागदावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्यात.समितीच्या पाहणीच्या वेळी भुईमूग पिकाला ३ ते ४ पक्वव ७ ते ८ अपरीपक्व(अंडे) असताना १५ ते २५ पक्क्या शेंगा असल्याचे अहवालात चुकीचे नमूद केले आले.प्रत्यक्षात भुईमुगाचे क्षेत्र ०.८० हेक्टर असताना १.८३ हेक्टर दाखविण्यात आले.असा आहे अहवालसदर पीक वाढण्याच्या अवस्थेत आहे. फेब्रुवारी, मार्च व एप्रिलमधील अधिकच्या तापमानामुळे पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. शेंगांची संख्या प्रतिझाड १५ ते २५ दरम्यान आहे. अंकुर, दाजरी व महाबीज तीएजे-२४ या वाणाची पेरणी असलेल्या क्षेत्राची पाहणी केली. व्हेजीटेटीव्ह ग्रोथवर अधिकच्या तापमानामुळे परिणाम झाला आहे. सदर बियाणे दोषरहित असल्याचे समितीचे मत आहे.तालुकास्तरीय समितीने तक्रारीनुसार पाहणी केली. शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यामुळे उपविभागीय कृषी अधिकारी मोर्शी यांच्याकडे अहवालाची शहानिशा करण्यास सांगितले आहे.- उदय काथोडे,कृषी विकास अधिकारीतालुकास्तर समितीने पाहणी केली. त्यावेळी कोऱ्या कागदावर आमच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. अहवाल देण्यासाठी विनाकारण चकरा मारायला लावल्या. प्रत्यक्षात स्थिती व अहवाल यांच्यात तफावत आहे.- सुधाकर लुटे,शेतकरी, पिंपळखुटा