शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सीमा नैतामांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:50 IST

पत्नी अवंतिकाच्या मृत्यूला महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम या जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार मृताचे पती अमोल इंगळे दोन्ही भाऊ सागर व सुमीत देशमुख यांनी राजरपेठ पोलिसांत नोंदविली.

ठळक मुद्देडेंग्यूने मृत्यू : मृताच्या कुटुंबीयांची राजापेठमध्ये तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पत्नी अवंतिकाच्या मृत्यूला महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम या जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार मृताचे पती अमोल इंगळे दोन्ही भाऊ सागर व सुमीत देशमुख यांनी राजरपेठ पोलिसांत नोंदविली.तक्रारीनुसार, अवंतिका या प्रसूतीसाठी तीन महिन्यांपासून त्यांच्या माहेरी राहत होत्या. दरम्यान १० आॅक्टोबर रोजी अवंतिका यांना ताप आला. प्रसूतिपूर्व उपचार डॉ. शोभा पोटोडे यांच्याकडे घेत असल्याने त्यांना तेथे दाखल करण्यात आले. तेथे रक्त तपासणीअंती डेंग्यूचे निदान झाले. उपचारादरम्यान १३ आॅक्टोबर रोजी अवंतिकाची प्रसूती होऊन त्यांनी बाळाला जन्म दिला.महापालिकेचीच हलगर्जीबाळाचा जन्म हा तिला डेंग्यू असताना झाला. बाळाच्या जन्मानंतर अवंतिकाला रक्तचापाचा त्रास होऊ न त्यांची प्रकृती खालावली. डॉ. पोटोडे यांच्याकडे श्वसनयंत्रणा उपलब्ध नसल्याने अवंतिकाला डॉ. बोंडे यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. बोंडे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असताना त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. अवंतिका यांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे डॉ.शिरभाते यांनी स्पष्ट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आई व बाळाने परस्परांना एकदाही न पाहता मातेचा मृत्यू झाला, असे रुदन तक्रारीतून करण्यात आले.महापालिकेच्या हालगर्जीपणामुळे परिसरात साफसफाई झाली नाही. रहिवाशांनी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नैताम आणि नगरसेवकांना वारंवार विनंती केली; तथापि साफसफाई झाली नाही. साफसफाई न झाल्यामुळेच माझी पत्नी अवंतिका दगावली. त्यामुळे तिच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय देण्यात यावा, अशी विनंती तक्रारीतून करण्यात आली आहे.तक्रार प्राप्त झाली; तथापि ती तक्रार आरोग्य विभागाशी संबंधित असल्याने पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. त्यांच्या अभिप्रायानंतर गुन्हे दाखल करायचे की कसे, याबाबत निर्णय घेतला जाईल.- किशोर सूर्यवंशी,ठाणेदार, राजापेठ