शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

सीमा नैतामांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:50 IST

पत्नी अवंतिकाच्या मृत्यूला महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम या जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार मृताचे पती अमोल इंगळे दोन्ही भाऊ सागर व सुमीत देशमुख यांनी राजरपेठ पोलिसांत नोंदविली.

ठळक मुद्देडेंग्यूने मृत्यू : मृताच्या कुटुंबीयांची राजापेठमध्ये तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पत्नी अवंतिकाच्या मृत्यूला महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम या जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार मृताचे पती अमोल इंगळे दोन्ही भाऊ सागर व सुमीत देशमुख यांनी राजरपेठ पोलिसांत नोंदविली.तक्रारीनुसार, अवंतिका या प्रसूतीसाठी तीन महिन्यांपासून त्यांच्या माहेरी राहत होत्या. दरम्यान १० आॅक्टोबर रोजी अवंतिका यांना ताप आला. प्रसूतिपूर्व उपचार डॉ. शोभा पोटोडे यांच्याकडे घेत असल्याने त्यांना तेथे दाखल करण्यात आले. तेथे रक्त तपासणीअंती डेंग्यूचे निदान झाले. उपचारादरम्यान १३ आॅक्टोबर रोजी अवंतिकाची प्रसूती होऊन त्यांनी बाळाला जन्म दिला.महापालिकेचीच हलगर्जीबाळाचा जन्म हा तिला डेंग्यू असताना झाला. बाळाच्या जन्मानंतर अवंतिकाला रक्तचापाचा त्रास होऊ न त्यांची प्रकृती खालावली. डॉ. पोटोडे यांच्याकडे श्वसनयंत्रणा उपलब्ध नसल्याने अवंतिकाला डॉ. बोंडे यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. बोंडे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असताना त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. अवंतिका यांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे डॉ.शिरभाते यांनी स्पष्ट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आई व बाळाने परस्परांना एकदाही न पाहता मातेचा मृत्यू झाला, असे रुदन तक्रारीतून करण्यात आले.महापालिकेच्या हालगर्जीपणामुळे परिसरात साफसफाई झाली नाही. रहिवाशांनी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नैताम आणि नगरसेवकांना वारंवार विनंती केली; तथापि साफसफाई झाली नाही. साफसफाई न झाल्यामुळेच माझी पत्नी अवंतिका दगावली. त्यामुळे तिच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय देण्यात यावा, अशी विनंती तक्रारीतून करण्यात आली आहे.तक्रार प्राप्त झाली; तथापि ती तक्रार आरोग्य विभागाशी संबंधित असल्याने पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. त्यांच्या अभिप्रायानंतर गुन्हे दाखल करायचे की कसे, याबाबत निर्णय घेतला जाईल.- किशोर सूर्यवंशी,ठाणेदार, राजापेठ