शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

तिवसा-अमरावती जिल्हा परिषद सिंचन उपविभागाचे पुनर्गठन

By admin | Updated: January 14, 2016 00:15 IST

जिल्हा परिषद सिंचन उपविभाग तिवसा आणि अमरावती उपविभागाच्या कार्यक्षेत्राचे नव्याने पुर्नगठण करण्याचा ठराव ११ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पारीत करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचा निर्णय : सर्वसाधारण सभेत ठराव पारितअमरावती : जिल्हा परिषद सिंचन उपविभाग तिवसा आणि अमरावती उपविभागाच्या कार्यक्षेत्राचे नव्याने पुर्नगठण करण्याचा ठराव ११ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पारीत करण्यात आला आहे. या निर्णयामुळे धामनगांवचा तालुक्याचा समावेश तिवसा सिंचन विभागाच्या उपविभागात होता. या ठरावा प्रमाणे चांदुर रेल्वे येथे नव्याने सिंचन विभागाचा उपविभाग सुरू करण्याचा ठराव शासनास पाठविण्यात येणार आहे.सध्या सिंचन विभागाचे ५ उपविभाग आहेत. १२ जानेवारी रोजी पारीत करण्यात आलेल्या ठरावानुसार जिल्हा परिषद अंर्तगत तिवसा हा तालुका भातकुली या महसुली विभागाला जोडला आहे. तसेच जिल्हा परिषद सिंचन उपविभागा तिवसा अंतर्गत चांदुर रेल्वे, धामनगांव रेल्वे, ही तिन तालुके येतात. अमरावती व भातकुली तालुक्यातील बराचसा भाग हा भौगोलिक दुष्टया तिवसा विधानसभा क्षेत्राला जोडलेला आहे. सिंचन उपविभाग अमरावती अंतर्गत भातकुली अमरावती व नांदगांव खंडेश्र्वर ही तिन तालुके येतात चांदुर रेल्वे , धामणगांव रेल्वे, व नांदगाव खंडेश्र्वर हा महसुली विभाग एक असून या तालुक्याचे विधानसभा क्षेत्र सुध्दा एकच आहे.त्यामुळे सिंचन विभाग उपविभाग हे उपविभाग चांदुर रेल्वे येथे स्थापित करूण सिंचन उपविभाग चांदुर रेल्वे अंतर्गत चांदुर रेल्वे , धामणगांव रेल्वे, व नांदगाव खंडेश्र्वर ही ३ तालुके जोडण्यात यावी असा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्य मोहन सिंगवी यांनी सर्वसाधारण सभेत मांडला या प्रस्तावास प्रवीण घुईखेडकर, मोहन पाटील उमेश केने, रंजना उईके, ज्योती आरेकर, आदीनी अनुमोदन दिले.आणि हा ठराव आवाजी मताने पारीत केला आहे. याला बसपाचे सदस्य अभिजित ढेपे यांनी मात्र विरोध दर्शविला मात्र याला न जूमानता हा ठराव पारीत झाल्याचे पीठासिन सभापती सतिश उईके यांनी जाहीर केले.