शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

मेळघाटात चांगल्या रस्त्याचे नूतनीकरण

By admin | Updated: April 22, 2015 23:57 IST

मेळघाटातील अतिदुर्गम भागाचा संपर्क थेट मुख्यालयापर्यंत व्हावा यासाठी रस्ते बनविण्याचे काम युती शासनाच्या काळात सुरु झाले होते.

पैशांची उधळपट्टी : अतिदुर्गम भागाकडे दुर्लक्षधारणी : मेळघाटातील अतिदुर्गम भागाचा संपर्क थेट मुख्यालयापर्यंत व्हावा यासाठी रस्ते बनविण्याचे काम युती शासनाच्या काळात सुरु झाले होते. त्यानंतर १५ वर्षांत अतिदुर्गम भागाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या काळात जुन्याच मार्गावर नवीन रस्ते तयार करण्याचे अफलातून प्रकार सुरु आहे. जे रस्ते जिल्हा परिषद यंत्रणेने काही महिन्यांपूर्वी तयार केले तेही डांबरीकरण. त्यावर पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने डांंबरीकरण करण्याचा प्रताप रचला, याला म्हणतात चमत्कार. असे चमत्कार घडले आहे टेमकी, हरदोली आणि सालई मार्गावर. या गावात अल्पावधीत दुसऱ्यांदा डांबरीकरणाचे काम झाल्याचे कोणालाही नवल वाटले नाही. याऊलट हा नियमच असेल असा विचार करुन लोकांनी तोंड बंद ठेवलेत. पंतप्रधान ग्राम सडक योजनेने रचला इतिहासगावागावांत रस्ते पोहोचावे व पावसाळ्याच्या काळात लोकांना दवाखाण्यापर्यंत येण्यासाठी अडचण निर्माण होऊ, नये यासाठी पतंप्रधान ग्राम सडक योजना ग्रामीण भागात राबविण्यात आली. यालाच पीएमजीएसवाय म्हणून ओळख मिळाली. या योजनेंतर्गत ज्या गावांत मुळातच रस्ते अस्तित्वात नाही अशा गावांची निवड करण्याचा नियम आहे. मात्र या योजनेत पूर्वीपासूनच अस्तित्वात असणाऱ्या गावातील रस्ते नूतनीकरणाचे काम सुरु आहे.पूर्वीच अस्तित्वात असणारे डांबरी रस्त्यावर पुन्हा नव्याने डांबरीकरणाचे व पुलाच्या निर्मितीचे कामे हाती घेण्यात आल्याचे चित्र मेळघाटात पहावयास मिळत आहे. सध्या पीएमजीएसवाय योजनेअंतर्गत धारणमहू ते ठाकरमल, सावऱ्या काटा ते गडगा मालूर, खारी ते सालई, बिजुधावडी ते हातीदा, चाकर्दा ते पाटीया या रस्त्याचे काम युध्दस्तरावर सुरु आहे. पूर्वीचे डांबरीकरण रस्त्याचे काय झाले हा संशोधनाचा विषय आहे. याकडे गुण नियंत्रण विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.जुन्याच रस्त्यावर पुन्हा नव्याने रस्ते बांधणे यालाच म्हणतात का अच्छे दिन, असा सवाल आता मेळघाटातील आदिवासी जनताही विचारु लागली आहे. यामुळे आता युती शासनात बसलेल्या नेत्यांनी मेळघाटातील रस्त्यांचा इतिहास जाणून घ्यावा व त्यावर उपचार शोेधावा, अशी मागणी येथील आदिवासी जनता करीत आहे. असेच चालत राहिल्यास आवश्यकत असलेली स्थळे विकासापासून दूर राहण्याची शक्यता आहे.जनप्रतिनिधीच बेपत्ता तर रडावे कुणाकडे ?मेलघाटात काँग्रेस पक्षाला उतरवून भाजपने पुन्हा सत्ता प्राप्त केली. पंचायत समितीचे अनुभव असणाऱ्या प्रभुदास भिलावेकरसारख्या युवा उमेदवाराला भाजपने निवडून आणले. परंतु मागील ६ महिन्यांपासून त्यांनी मेळघाटत जनसंपर्क यात्रामध्येच आपले लक्ष घातले आहे. त्यांच्या या संकल्प यात्रेने लोकांना ते मिळेनासे झाले आहे. धारणी, चिखलदरा व अचलपूर या तीनही तालुक्यांतील लोक त्यांनी आपली गाऱ्हाणी ऐकविण्यास शोेधत आहेत. मात्र ते दूर-दूर जात असल्याने आता कुणाकडे रडावे, असा सवाल जनता करीत आहे. जनप्रतिनिधीच जागेवर मिळत नसले तर मेळघाटातील चमत्कार तरी कसे थांबणार?