शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात चांगल्या रस्त्याचे नूतनीकरण

By admin | Updated: April 22, 2015 23:57 IST

मेळघाटातील अतिदुर्गम भागाचा संपर्क थेट मुख्यालयापर्यंत व्हावा यासाठी रस्ते बनविण्याचे काम युती शासनाच्या काळात सुरु झाले होते.

पैशांची उधळपट्टी : अतिदुर्गम भागाकडे दुर्लक्षधारणी : मेळघाटातील अतिदुर्गम भागाचा संपर्क थेट मुख्यालयापर्यंत व्हावा यासाठी रस्ते बनविण्याचे काम युती शासनाच्या काळात सुरु झाले होते. त्यानंतर १५ वर्षांत अतिदुर्गम भागाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या काळात जुन्याच मार्गावर नवीन रस्ते तयार करण्याचे अफलातून प्रकार सुरु आहे. जे रस्ते जिल्हा परिषद यंत्रणेने काही महिन्यांपूर्वी तयार केले तेही डांबरीकरण. त्यावर पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने डांंबरीकरण करण्याचा प्रताप रचला, याला म्हणतात चमत्कार. असे चमत्कार घडले आहे टेमकी, हरदोली आणि सालई मार्गावर. या गावात अल्पावधीत दुसऱ्यांदा डांबरीकरणाचे काम झाल्याचे कोणालाही नवल वाटले नाही. याऊलट हा नियमच असेल असा विचार करुन लोकांनी तोंड बंद ठेवलेत. पंतप्रधान ग्राम सडक योजनेने रचला इतिहासगावागावांत रस्ते पोहोचावे व पावसाळ्याच्या काळात लोकांना दवाखाण्यापर्यंत येण्यासाठी अडचण निर्माण होऊ, नये यासाठी पतंप्रधान ग्राम सडक योजना ग्रामीण भागात राबविण्यात आली. यालाच पीएमजीएसवाय म्हणून ओळख मिळाली. या योजनेंतर्गत ज्या गावांत मुळातच रस्ते अस्तित्वात नाही अशा गावांची निवड करण्याचा नियम आहे. मात्र या योजनेत पूर्वीपासूनच अस्तित्वात असणाऱ्या गावातील रस्ते नूतनीकरणाचे काम सुरु आहे.पूर्वीच अस्तित्वात असणारे डांबरी रस्त्यावर पुन्हा नव्याने डांबरीकरणाचे व पुलाच्या निर्मितीचे कामे हाती घेण्यात आल्याचे चित्र मेळघाटात पहावयास मिळत आहे. सध्या पीएमजीएसवाय योजनेअंतर्गत धारणमहू ते ठाकरमल, सावऱ्या काटा ते गडगा मालूर, खारी ते सालई, बिजुधावडी ते हातीदा, चाकर्दा ते पाटीया या रस्त्याचे काम युध्दस्तरावर सुरु आहे. पूर्वीचे डांबरीकरण रस्त्याचे काय झाले हा संशोधनाचा विषय आहे. याकडे गुण नियंत्रण विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.जुन्याच रस्त्यावर पुन्हा नव्याने रस्ते बांधणे यालाच म्हणतात का अच्छे दिन, असा सवाल आता मेळघाटातील आदिवासी जनताही विचारु लागली आहे. यामुळे आता युती शासनात बसलेल्या नेत्यांनी मेळघाटातील रस्त्यांचा इतिहास जाणून घ्यावा व त्यावर उपचार शोेधावा, अशी मागणी येथील आदिवासी जनता करीत आहे. असेच चालत राहिल्यास आवश्यकत असलेली स्थळे विकासापासून दूर राहण्याची शक्यता आहे.जनप्रतिनिधीच बेपत्ता तर रडावे कुणाकडे ?मेलघाटात काँग्रेस पक्षाला उतरवून भाजपने पुन्हा सत्ता प्राप्त केली. पंचायत समितीचे अनुभव असणाऱ्या प्रभुदास भिलावेकरसारख्या युवा उमेदवाराला भाजपने निवडून आणले. परंतु मागील ६ महिन्यांपासून त्यांनी मेळघाटत जनसंपर्क यात्रामध्येच आपले लक्ष घातले आहे. त्यांच्या या संकल्प यात्रेने लोकांना ते मिळेनासे झाले आहे. धारणी, चिखलदरा व अचलपूर या तीनही तालुक्यांतील लोक त्यांनी आपली गाऱ्हाणी ऐकविण्यास शोेधत आहेत. मात्र ते दूर-दूर जात असल्याने आता कुणाकडे रडावे, असा सवाल जनता करीत आहे. जनप्रतिनिधीच जागेवर मिळत नसले तर मेळघाटातील चमत्कार तरी कसे थांबणार?